0
0
0
0
0

सामाजिक

Home सामाजिक Page 27

“घड्याळाचा गजर, विकासावर नजर!” – प्रभाग २५ (क) मधून राधिका कुलकर्णींचा निर्धार

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (क) – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई परिसरात विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याचा संकल्प घेऊन ॲड. राधिका उल्हास कुलकर्णी मैदानात उतरल्या आहेत.“सर्वांच्या विकासासाठी एक मत – राधिका साठी!” हा केवळ नारा नसून, सर्वसामान्यांच्या मनातील अपेक्षांचा आवाज बनत आहे. विश्वासाचं नातं जपणारा उमेदवार म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या राधिका कुलकर्णी यांनी प्रभागातील...

सफाई सेवकांचा लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचा संकल्प

पिंपरी, दि. १२ जानेवारी २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मतदान जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत निगडी सेक्टर २६ येथील डॉ. हेडगेवार भवन येथे सफाई सेवकांसाठी विशेष मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या...

मतदान प्रक्रिया सुरळितपणे पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा – आयुक्त श्रावण हर्डीकर

पिंपरी, दि. १२ जानेवारी २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान १५ जानेवारी रोजी व मतमोजणी १६ जानेवारी रोजी होत आहे. ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी महापालिकेची निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी ही प्रक्रिया सुरळितपणे पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिले. निगडी प्राधिकरण...

“जय जवान जय किसान”चा संदेश देणारे लाल बहादूर शास्त्री हे देशासाठी दीपस्तंभ – उप आयुक्त अण्णा बोदडे

पिंपरी – “जय जवान जय किसान” ही क्रांतिकारी घोषणा देत संपूर्ण देशाला नवी दिशा देणारे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री हे केवळ थोर स्वातंत्र्यसैनिकच नव्हे, तर मूल्याधिष्ठित राजकारणाचे प्रतीक होते,” असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण...

मतदान जनजागृतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून व्हिंटेज कार रॅलीचे आयोजन

पिंपरी : लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी प्रत्येक सुजाण नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे, १५ जानेवारी रोजी राज्य शासनाने निवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्या दिवशी सर्वप्रथम शहरातील सर्व मतदारांनी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, आपले मतदान ही आपली जबाबदारी असून आपल्या कर्तव्याचा हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे असे प्रतिपादन निवडणूक निरीक्षक सरिता नरके यांनी केले. पिंपरी चिंचवड...

प्रभाग ८७ मध्ये महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार; आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८७ मध्ये प्रचाराला वेग आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) युतीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती पूजा विश्वनाथ महाडेश्वर यांच्या प्रचारात युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते श्री. आदित्य ठाकरे यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना विजयाचा ठाम विश्वास दिला. या वेळी स्थानिक आमदार श्री. वरुण सरदेसाई, पक्षाचे पदाधिकारी,...

“आता थांबायची वेळ संपली आहे, बदल घडवण्याची वेळ आली आहे!” – अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांचे भावनिक आवाहन

प्रभाग क्रमांक २५ (क) मधील प्रचार सभेत अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत भावनिक आणि प्रेरणादायी भाषण केले. “आज मी तुमच्यासमोर केवळ उमेदवार म्हणून नाही, तर तुमची मुलगी, तुमची बहीण आणि तुमचा विश्वासू प्रतिनिधी म्हणून उभी आहे,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. स्वतःची ओळख करून देताना त्या म्हणाल्या, “मी आहे – अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी. एक...

श्री संत वामनभाऊ महाराजांच्या ५०व्या पुण्यतिथी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती

बीड : श्री क्षेत्र गहिनीनाथ गड, बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री संत वामनभाऊ महाराजांच्या ५०व्या पुण्यतिथी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख उपस्थिती लावून या आध्यात्मिक महापर्वाला गौरव प्राप्त करून दिला. संत परंपरेचा वारसा जपत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला राज्यभरातून भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या पवित्र प्रसंगी मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार मोनिका राजले, श्री...

कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धेचा, संकल्पाचा आणि अस्मितेचा जागता प्रतीक

सोमनाथ : “सोमनाथ स्वाभिमान पर्व हा कोट्यवधी भारतीयांच्या शाश्वत आस्था, साधना आणि अटूट संकल्पाचा जीवंत प्रतिबिंब आहे. पवित्र श्री सोमनाथ मंदिरात या महापर्वाचा सहभागी होणे हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय आणि अमूल्य क्षण आहे,” असे भावनिक शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या पावन प्रसंगी त्यांनी श्री सोमनाथ मंदिरात देशातील १४० कोटी नागरिकांच्या समृद्धी, शांतता आणि कल्याणासाठी...

Copyright ©