महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना रचनात्मक कार्यासाठी एकत्र येऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही देशातील सर्वाधिक सक्षम आणि स्थिर असून, सर्व आर्थिक निकषांवर राज्य पात्र ठरत आहे. कर्ज, राजकोषीय तूट, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, सिंचन, वीज, दळणवळण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात राज्याने भरीव काम केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. राज्याची अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू असताना पुढचा काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक असल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील सर्व ...
जाणीव, प्रशिक्षण आणि संशोधन – समृद्ध लोकशाहीचे त्रिसूत्र : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नागपूर : लोकशाही अधिक बळकट आणि समृद्ध करण्यासाठी जाणीव, प्रशिक्षण आणि संशोधन या तीन घटकांचा समन्वय आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या माध्यमातून राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना विधिमंडळातील प्रशिक्षण मिळते, त्यामुळे कायदे कसे बनतात, संसदीय प्रक्रिया कशा प्रकारे चालतात याचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त होते. अशा उपक्रमांमुळे लोकशाही अधिक समृद्ध...
“पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार” – पुणे पुस्तक महोत्सवाला जागतिक स्वरूप देण्याचा निर्धार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
पुणे : पुणे पुस्तक महोत्सवाला मिळणारा वाढता आणि अभूतपूर्व प्रतिसाद पाहता पुणे शहराला ‘पुस्तकांची जागतिक राजधानी’ बनवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, पुढील वर्षी हा महोत्सव ‘जागतिक पुस्तक महोत्सव’ म्हणून आयोजित करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. नॅशनल बुक ट्रस्टच्यावतीने फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी...
राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये लवकरच पदभरती; मनुष्यबळाची कमतरता दूर होणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
नागपूर : राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये दीर्घकाळापासून जाणवत असलेली मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी आकृतीबंधानुसार पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत केली. वित्त विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानपरिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी कृषी विद्यापीठांतील मनुष्यबळाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेला उत्तर देताना...
पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षेखाली समिती नेमणार – मंत्री डॉ.उदय सामंत
नागपूर : पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षेखाली समिती आहे. मात्र लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार विभागीय आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात येईल, असे मंत्री डॉ.उदय सामंत यांनी सांगितले. पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडीबाबत सदस्य भीमराव तापकीर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर मंत्री डॉ. सामंत बोलत होते. मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, पुणे महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियोजन...
पुणे रिंग रोड प्रकल्प, रस्त्याची कामे व मेट्रो कॅरिडोरची कामे प्रगतीपथावर – मंत्री दादाजी भुसे
नागपूर : पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रिंग रोड सह विविध रस्ते व मेट्रो प्रकल्पाची कामे सुरु आहेत. रिंगरोडच्या पूर्व भागाचे काम मे 2028 पर्यंत आणि पश्चिमेकडील भागाचे काम मे 2026 पर्यंत पूर्ण होईल. तसेच हडपसर-लोणी काळभोर मेट्रो कॅरिडॉरच्या कामाची तांत्रिक व्यवहार्यता तपासून कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. सदस्य राहुल कुल यांनी पुणे रिंग रोड व इतर प्रकल्पासंदर्भात...
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : राज्यात मागील काही दिवसात झालेल्या पूर परिस्थितीमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता नव्याने अभियानाला सुरुवात करण्यात आली असून या अभियानाच्या अंमलबजावणीतून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधान भवन येथील मंत्रिपरिषद सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शीर्षक गीत लोकार्पण कार्यक्रम पार पडला. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात...
मुंबईत येणार जगातील सर्वात मोठा GCC (जीसीसी) प्रोजेक्ट; ४५ हजार रोजगार निर्माण होणार मायक्रोसॉफ्टसोबत एआय सहकार्याची मोठी घोषणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई - महाराष्ट्राला GCC (जीसीसी) हब बनवण्याच्या दिशेने हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असून ब्रुकफील्ड कंपनी मुंबईत सुमारे 20 लाख चौरस फूट क्षेत्रावर आशियातील सर्वात मोठे Global Capability Center (GCC) अर्थात जागतिक क्षमता केंद्र उभारणार आहे. या प्रकल्पातून 15,000 थेट आणि 30,000 अप्रत्यक्ष असे एकूण 45,000 रोजगार निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जिओ कन्व्हेशन सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, सीईओ, ANSR , विक्रम आहुजा, ब्रुकफिल्डचे अंकुर गुप्ता यांच्यासोबत बैठकीचे...
३ वर्षांपासून फरार असलेला मोक्का आरोपी अखेर जेरबंद; बंडगार्डन पोलिसांची मोठी कामगिरी
पुणे शहरात गुन्हेगारीविरोधात सुरू असलेल्या कठोर कारवाईत बंडगार्डन पोलीस स्टेशनने मोठे यश मिळवले आहे. मागील तब्बल तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा मोक्का अंतर्गत फरार आरोपी अखेर बंडगार्डन पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. या अटकेमुळे शहरातील संघटित गुन्हेगारी टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे. सदर गुन्हा २५ ऑगस्ट २०२२ रोजी ससून रुग्णालयात घडला होता. मोक्का प्रकरणातील आरोपी असलेले फिर्यादी तुषार हंबीर हे उपचारासाठी...
दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना समर्थ पोलिसांनी अटक; ८.११ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे शहरात दिवसा घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना समर्थ पोलीस स्टेशनने मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मंगळवार पेठ परिसरात दिवसा घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून चोरीचा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी मंगळवार पेठ येथील एका नागरिकाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश...




