महाराष्ट्र
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबईत आगमन; छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उत्स्फूर्त स्वागत
मुंबई | महामहिम राष्ट्रपती Droupadi Murmu यांचे आज मुंबई येथे आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी Chhatrapati Shivaji Maharaj International Airport येथे औपचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुष्पगुच्छ प्रदान करून राष्ट्रपतींचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी राज्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. माननीय राज्यपाल Acharya Devvrat, माननीय मुख्यमंत्री Devendra Fadnavis, माननीय उपमुख्यमंत्री Eknath Shinde तसेच माननीय उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांच्यासह...
“भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ वडील आणि मुलाची आत्महत्या: रेल्वे ट्रॅकवर उडी मारून केले जीवन संपविले”
भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली, ज्यामध्ये वडील आणि मुलाने धावत्या लोकल ट्रेनच्या ट्रॅकवर उडी मारून आत्महत्या केली. हा दुर्दैवी प्रकार सकाळी अकरा वाजता घडला. मृतांची ओळख हरीश मेहता (६०) आणि जय मेहता (३०) अशी पटली आहे. हरीश मेहता आणि जय मेहता यांनी अचानक असे टोकाचे पाऊल का उचलले याचा शोध वसई रेल्वे पोलिस घेत आहेत....
पुणे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी : १५ लाखांचे दागिने ११ नागरिकांना परत; नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक
पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याने जबरी चोरी, घरफोडी आणि इतर गुन्ह्यांमध्ये हस्तगत करण्यात आलेले ₹15 लाख किमतीचे 200 ग्रॅम (20 तोळे) वजनाचे सोन्याचे दागिने मूळ मालकांना परत केले आहेत. या उल्लेखनीय कामगिरीमुळे नागरिकांनी पुणे पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. घटनाक्रम: भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांमध्ये विविध भागांमध्ये जबरी चोरी, घरफोडी आणि इतर चोरीचे 11 गुन्हे घडले...
“शेतकऱ्यांची खरी मदत गरजूंनाच मिळावी!” — बच्चू कडूंचं मोठं विधान; कर्जमाफीसाठी लढा अधिक तीव्र होणार!
नागपूर / मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा तापलेलं वातावरण दिसत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी आक्रमक भूमिका घेणारे माजी मंत्री बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी सुरू केलेलं आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आलं आहे. यालयाने आंदोलनाचं ठिकाण रिकामं करण्याचा आदेश दिल्यानंतर कडू यांनी “आम्हाला अटक करा!” असं म्हणत पोलिस ठाण्याकडे मोर्चा वळवला होता. मात्र रस्त्यातच सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट...
बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक -जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे : ‘बजाज पुणे ग्रँड टूर 2026’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेच्या माध्यमातून सायकलिंगला नवसंजीवनी देण्यासोबतच पुणे शहराची ‘सायकलींचे शहर’ म्हणून ओळख पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या स्पर्धेचे आयोजन 19 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत करण्यात येणार असून, ती यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील विद्यापीठे, महाविद्यालये, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यातील विद्यार्थी स्वयंसेवक व प्रेक्षक म्हणून मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. पुणे जिल्हा प्रशासन, सायकलिंग फेडरेशन...
आमदार शंकर जगताप यांच्या प्रयत्नांमुळे श्रीनगरमध्ये अडकलेले १४ प्रवासी सुखरूप पिंपरी-चिंचवडला परतले
पिंपरी-चिंचवड | २६ एप्रिल २०२५ :- पिंपरी-चिंचवडमधील एकाच कुटुंबातील १४ जण श्रीनगरमध्ये अडकले होते, मात्र पिंपरी-चिंचवडचे लोकप्रिय आमदार शंकर जगताप यांच्या अथक प्रयत्नांमुळे त्यांनी सुखरूपपणे परत पुणे पोहोचले. श्रीनगरमधील स्थानिक परिस्थिती आणि तिकीटांच्या अडचणीमुळे या कुटुंबाला परत जाणे कठीण होतं. पण आमदार शंकर जगताप यांच्या मदतीने ते सर्व श्रीनगर ते पुणे हवाई मार्गाने परत येऊ शकले. संकटात असलेल्या प्रवाशांना मदत या...
भाजपा शहर निवडणुकीची कमान आता आमदार अमित गोरखे यांच्या हाती..!
पिंपरी चिंचवड जिल्हा निवडणूक संचालन समितीच्या संयोजक पदी आमदार अमित गोरखे तर सहसंयोजक म्हणून मोरेश्वर शेडगे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्शभूमीवर निवडणूक कालखंडात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबविणे तसेच उमेदवारांच्या मुलाखती त्यासाठी उमेदवार चयन करणे व निवडणूक प्रचार यंत्रणा कार्यान्वित करणे यासाठी जिल्हा निवडणूक संचालन समितीची भूमिका अत्यंत महत्वाची असते. राजकीय व संघटनात्मक दृष्ट्या अशा...
पुणेकरांनो लक्ष द्या! कासारसाई धरणाचा विसर्ग वाढणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणे | १९ ऑगस्ट २०२५, रात्री ८:३० :- पुणे जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणक्षेत्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर कासारसाई धरण ९९.२९% भरलेले असून, धरण व्यवस्थापनाने पाणीसाठा नियंत्रणासाठी विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या धरणातून १४८० क्युसेक्स पाणी सोडले जात आहे, मात्र आज रात्री १० वाजल्यापासून हा विसर्ग वाढवून १७७६ क्युसेक्स केला जाणार आहे. पाऊस कायम...
२४ तासांत दरोडा उघड! मांजरीतील ‘महावीर ज्वेलर्स’ दरोड्यात ३ आरोपी अटकेत, ३ विधीसंघर्षीत बालक ताब्यात; लाखोंचे दागिने हस्तगत
पुणे — पुणे शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे शहर गुन्हे शाखेने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. मांजरी येथील महावीर ज्वेलर्स या सराफ दुकानात झालेला थरारक दरोडा अवघ्या २४ तासांत उघडकीस आणत गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२, युनिट-५ व युनिट-६ यांनी ३ आरोपींना अटक केली असून ३ विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर...
‘छावा’च्या यशासाठी विकी कौशल आणि रश्मिका मंदानाचे साईदरबारी साकडे!
शिर्डीमध्ये घेतले साईबाबांचे दर्शन, चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना 🔹 लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' प्रदर्शनासाठी सज्ज!🔹 १४ फेब्रुवारीला चित्रपटगृहात धडक!🔹 रश्मिका मंदाना आणि विकी कौशल पहिल्यांदाच शिर्डी साई मंदिरात🔹 रश्मिकाच्या पायाला दुखापत असतानाही दर्शनासाठी भक्तिभावाने हजेरी 📍 शिर्डी – बहुप्रतिक्षीत आणि ऐतिहासिक पृष्ठभूमीवर आधारित ‘छावा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, याबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. चित्रपटाच्या यशासाठी चित्रपटाचे मुख्य कलाकार विकी कौशल...












