Breaking News
“डिजिटल अरेस्ट”च्या नावाखाली ६.२९ कोटींची फसवणूक! पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई; आरोपी पनवेलमधून जेरबंद”
पुणे शहरातील सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी एक अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा सायबर गुन्हा उघडकीस आणत, तब्बल ६ कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पनवेल येथून सापळा रचून अटक केली आहे. हा सायबर गुन्हा पुण्यातील एका जेष्ठ नागरिकास **"डिजिटल अरेस्ट"**च्या नावाखाली घडवून आणण्यात आला होता. आरोपीने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून, व्हॉट्सअॅप कॉलद्वारे फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याविरोधात मनी...
“बटन घड्याळाचे, वेळ बदलण्याचे!” – प्रभाग २५ (क) मधून अॅड. राधिका उल्लास कुलकर्णी मैदानात; राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवणार
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (क) मध्ये राजकीय वातावरण तापले असून, अॅड. राधिका उल्लास कुलकर्णी या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अधिकृतपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह घेऊन त्या थेट मतदारांच्या दारात पोहोचत असून,“बटन घड्याळाचे – वेळ बदलण्याचे!”हा स्पष्ट आणि ठोस विकासाचा संदेश देत आहेत. मतदान दिनांक : १५ जानेवारी २०२६वेळ :...
“राहुल गांधींच्या आजोबांचे आजोबासुद्धा संविधान बदलू शकत नाहीत”: रामदास आठवले यांचे नवी मुंबईत भाषण.
नवी मुंबई - केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नवी मुंबईतील कामोठे येथे झालेल्या भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारसभेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना जोरदार टोला लगावत त्यांचे संविधान बदलण्याचे आरोप फेटाळून लावले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाला कोणीही बदलू शकत नाही, असे आठवले यांनी ठामपणे सांगितले. “राहुल गांधींच्या आजोबांचे आजोबासुद्धा संविधान बदलू शकत नाहीत,” असे ते...
लुधियाना: व्यस्त रस्त्यावर शिवसेना नेत्यावर तलवारीने हल्ला करणाऱ्या दोन निहंग शीखांना अटक
लुधियाना: शुक्रवारी लुधियानाच्या व्यस्त रस्त्यावर शिवसेना (पंजाब) नेते संदीप थापर (५८) यांच्यावर तलवारीने हल्ला करणाऱ्या निहंग शीखांच्या गटाने त्यांना गंभीर जखमी केले. पोलिसांनी सांगितले की, तिन्ही संशयितांची ओळख पटली असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. थापर हे NGO संवेदना ट्रस्टच्या संस्थापक-अध्यक्ष आणि भाजप नेते रवींदर अरोरा यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर कार्यालयातून परतत असताना सिव्हिल हॉस्पिटलजवळ हल्ला झाला. थापर...
दादरच्या रामश्याम वाडीत पिण्याच्या पाण्यात ड्रेनेज पाणी मिसळले; तत्काळ कारवाईने नागरिकांना दिलासा
मुंबई: दादर पश्चिम येथील रामश्याम वाडी परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळल्याची गंभीर बाब समोर आली होती. या घटनेमुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता. दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार, संसर्ग आणि साथीचे रोग पसरण्याची शक्यता लक्षात घेता, या समस्येची तात्काळ दखल घेण्यात आली. प्रकरण लक्षात येताच महापालिका अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधून संबंधित पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू करून...
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; भारताचा ठाम आणि निर्णायक बदला!
नवी दिल्ली | दिनांक – ७ मे २०२५ पहलगाम हल्ल्याचा सर्जिकल प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने इतिहासात अढळ ठसा उमटवणारी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ या गुप्तनामाअंतर्गत भारताने मध्यरात्री पाकिस्तानातील नऊ प्रमुख दहशतवादी तळांवर एकत्रितपणे २४ हवाई हल्ले करत ही ठिकाणे नष्ट केली. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांच्या अड्ड्यांवर ही कारवाई करण्यात आली. सर्जिकल स्ट्राइकची नवी व्याख्या – ‘ऑपरेशन सिंदूर’ पहलगाम येथे...
पुण्यात मोठी कारवाई! १६.८० लाख रुपयांचा २८ किलो गांजा जप्त; दोन आरोपींना अटक
पुणे: अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १६.८० लाख रुपयांचा २८ किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनाक्रम अंमली पदार्थ विरोधी पथक २ चे पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक आणि पथक हे मुंढवा पोलीस ठाणे हद्दीत गस्त...
केरळमध्ये भूस्खलनामुळे 93 जणांचा मृत्यू, डझनभर अजूनही अडकलेले
केरळ राज्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या प्रचंड भूस्खलनामुळे किमान 93 जणांचा मृत्यू झाला आहे आणि डझनभर लोक अजूनही अडकले आहेत. मंगळवारी पहाटे वायनाड जिल्ह्यातील डोंगराळ भागात हे भूस्खलन झाले. बचाव कार्य सुरु आहे, परंतु मुसळधार पाऊस आणि महत्त्वपूर्ण पूल कोसळल्यामुळे अडथळे येत आहेत. राज्याचे मुख्य नागरी अधिकारी व्ही. वेणू यांनी माध्यमांना सांगितले की, "परिस्थिती खूपच गंभीर आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो." 2018...
सायबर फसवणुकीचा पर्दाफाश: सिम्बायोसिसमध्ये प्रवेश देण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणारा सराईत आरोपी थायलंड पळून जाताना अटक!
पुणे :- पुण्यातील नामवंत शैक्षणिक संस्थेच्या नावाचा गैरवापर करून विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा भांडाफोड करत, गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक मोठी कामगिरी बजावली आहे. सिम्बायोसिस कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो असे सांगत ऑनलाइन वेबसाईटद्वारे विद्यार्थ्यांना गंडा घालणारा कुमार कुणाल बिरेंद्रकुमार विद्यार्थी या सराईत गुन्हेगारास थायलंड पळून जाण्याच्या तयारीत असताना कोलकत्ता विमानतळावर अटक करण्यात आली. सायबर फसवणुकीचा मास्टरमाइंड पकडला फसवणूक...
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांना अखेरचा निरोप; उत्राणे गाव शोकसागरात, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांच्या आकस्मिक निधनामुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर येताच कार्यकर्ते, सहकारी आणि नागरिकांमध्ये शोककळा पसरली. आज त्यांच्या मूळगावी बागलाण तालुक्यातील उत्राणे येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. गावात सर्वत्र शांतता आणि हळहळ दिसून येत होती. सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी आणि अंत्यसंस्कारस्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली...











