मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रासाठी शासनाची नवी कार्यपद्धती – हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदींवर आधारित निर्णय
मुंबई, दि. २ सप्टेंबर : मराठा समाजाच्या दीर्घकाळच्या मागणीला प्रतिसाद देत महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने स्पष्ट कार्यपद्धती जाहीर केली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढलेल्या या शासन निर्णयामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी मा. न्यायमूर्ती...
सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 10 : सैनिकांनी देशासाठी केलेले समर्पण कुठल्याही मूल्यांमध्ये मोजता येत नाही. सैन्यातील खडतर जीवन जगून देशासाठी त्याग करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनातूनही सैनिकांच्या कुटुंबियांना मदत देण्यात येते. हा निधी सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रामगिरी शासकीय निवासस्थानी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम...
मुंबईतील गणेश दर्शनासाठी भाविकांवर रेल्वे ब्लॉक रद्द; मध्य रेल्वेच्या निर्णयामुळे मिळाला दिलासा
मुंबई – मुंबईतील मध्य रेल्वे विभागाने रविवारी रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हर हेड वायरच्या देखभालीसाठी ब्लॉक घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात लाखो भाविक गणपती दर्शनासाठी मुंबईत येतात, हे लक्षात घेता, ब्लॉकमुळे प्रवाशांना अडचण येण्याची शक्यता होती. ‘लोकसत्ता’मध्ये या ब्लॉकबाबत बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मध्य रेल्वेने रविवारीचे ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला. रविवारी...
निवडणूक आचारसंहिता लागू; शहरात महापालिकेची धडक कारवाई, ४,८१९ अनधिकृत राजकीय फ्लेक्स हटवले
पिंपरी-चिंचवड | राज्य निवडणूक आयोगाकडून १५ डिसेंबर २०२५ रोजी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरभरात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली असून, १६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत तब्बल ४,८१९ अनधिकृत व नियमबाह्य राजकीय फ्लेक्स, बॅनर्स आणि जाहिरात साहित्य हटवण्यात आले आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह व...
प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारी अत्यावश्यक -राज्य मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे
मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेतील २०२४ च्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी राज्य मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांची मुख्य माहिती आयुक्त कार्यालयात भेट घेऊन संवाद साधला. या भेटीदरम्यान श्री. राहुल पांडे यांनी माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शासन व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढीस लागल्याचे सांगितले. राज्य मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणाले, महाराष्ट्र राज्यात इतर राज्यांप्रमाणे एकच आयोग नसून प्रत्येक महसूल विभागासाठी स्वतंत्र माहिती आयोग कार्यरत आहे. यामुळे नागरिकांना विभागीय...
पंतप्रधान नरेंद्र मोदींची बेंगळुरूमध्ये मेट्रो सफर; आर. व्ही. रोड ते इलेक्ट्रॉनिक सिटी ‘यलो लाईन’चे लोकार्पण
बेंगळुरू | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळुरूमध्ये नव्या ‘यलो लाईन’ मेट्रो मार्गाचं लोकार्पण करताच, स्वतः या मेट्रोमधून प्रवास करून नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी आर. व्ही. रोड (रगिगुड्डा) येथून प्रवास सुरू करत, नव्याने उद्घाटन झालेल्या इलेक्ट्रॉनिक सिटी मेट्रो स्टेशनपर्यंत सफर केली. या प्रवासात त्यांनी सहप्रवाशांशी संवाद साधत, मेट्रोमुळे होणाऱ्या वेळेची बचत आणि सोयीसुविधांबाबत चर्चा केली. यलो लाईन मेट्रो प्रकल्प हा...
मुंबई रेल्वे स्थानकांवर मराठ्यांचे वादळ, प्रत्येक ठिकाणी एकच आवाज – आरक्षण हक्काचा!
मुंबई : राज्यभरातून मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईकडे धाव घेत आहे. रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली असून, डबाबंद गाड्यांमध्येही मराठ्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतोय. प्रत्येक स्थानकावर "आरक्षण आमचा हक्क आहे, तो आम्ही मिळवणारच!" या घोषणांचा गजर दुमदुमत आहे. छोट्या गावांपासून ते शहरांपर्यंत, हजारो कार्यकर्ते कुटुंबांसह रेल्वेतून मोर्चाकडे रवाना होत आहेत. मुंबईतील दादर, सीएसएमटी, ठाणे, वांद्रे, मानखुर्द या प्रमुख स्थानकांवर मराठा...
शाखा १११ मध्ये शिवशक्तीचा ऐतिहासिक विजय; दीपक सावंत यांना १२,२०६ मतांची घवघवीत आघाडी
मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार दीपक राजाराम सावंत यांनी शाखा क्रमांक १११ मधून दणदणीत विजय मिळवला आहे. तब्बल १२,२०६ मतांच्या भरघोस फरकाने त्यांनी विजय संपादन करत परिसरात शिवशक्तीचा झेंडा फडकावला आहे. या विजयामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे. ढोल-ताशांच्या गजरात,...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील मानाच्या गणपतींना भेट – श्रींच्या चरणी प्रार्थना करून घेतले पुणेकरांचे आशीर्वाद
पुणे : पुण्यातील मानाचे गणपती हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहेत. गणेशोत्सवाला राज्य शासनाने ‘राज्य उत्सवाचा’ दर्जा दिल्याने या सणाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील विविध मानाच्या व ऐतिहासिक गणेश मंडळांना भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले आणि राज्यातील जनतेसाठी प्रार्थना केली. मुख्यमंत्री म्हणाले, “श्री गणेश सर्वांना सुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्य देवो. सर्वांच्या मनोकामना पूर्ण...
रणांगणातील खऱ्या योद्ध्यांचा अढळ निर्धार – उन्हा-पावसाची पर्वा न करता लढणारे मराठे!
एकदा रणात उतरल्यावर मराठा योद्धे कोणत्याही अडचणींची पर्वा करत नाहीत. मग तो कडाक्याचा उन्हाळा असो वा संततधार पाऊस, त्यांच्या ध्येयासाठी लढण्याची जिद्द आणि शक्ती कधीही कमी होत नाही. मराठ्यांच्या रक्तातच धैर्य, पराक्रम आणि चिकाटी ओतप्रोत भरलेली आहे. इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी गड-किल्ले वाचवण्यासाठी कितीही संकटे सोसली, तरी मागे हटले नाहीत. आजही मराठा समाजातील युवक, शेतकरी, सैनिक, क्रीडापटू, तसेच समाजकारणात...




