‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद; ३.२६ लाख नागरिकांची मोफत तपासणी, ६,८६२ रक्तदात्यांनी दिले योगदान
मुंबई | गणेशोत्सवासारख्या लोकाभिमुख आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या उपक्रमाला राज्यभरातून अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमामुळे लाखो नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीची संधी मिळाली, तर हजारो नागरिकांनी रक्तदान करून समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. अभियानाचा कालावधी आणि राबविण्यात आलेली शिबिरे २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ दरम्यान राज्यातील सर्व...
पुणे अष्टगणेश दर्शन महोत्सव परदेशी पर्यटकांचा पारंपरिक उत्सवात सहभाग
पुणे : दिशा हॉलिडेज आयोजित व पर्यटन संचालनालय, विभागीय पर्यटन कार्यालय, पुणे यांच्या सहकार्याने "पुणे अष्टगणेश दर्शन महोत्सव" दिमाखदार पद्धतीने पार पडला. दिशा हॉलिडेज च्यावतीने युनायटेड किंगडम , ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, मॅदागास्कर, चिली व मलावी येथील पर्यटकांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. महिला पर्यटकांनी साडी व फेटा तर पुरुषांनी फेटा परिधान करून उत्सवात सहभागी होत पुण्याच्या संस्कृतीत रंगून गेले. त्यांनी गुरुजींसह गणेशाची आरती म्हणत पुण्यातील आठ अष्टगणपती – अखिल मंडई मंडळ, तुळशीबाग, गुरुजी तालीम, तांबडी जोगेश्वरी, केसरीवाडा, कसबा, भाऊसाहेब...
लंडनमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र’ उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय
मुंबई : राज्य शासनाने मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी आणि जागतिक स्तरावर मराठी ओळख दृढ करण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या इमारतीला 99 वर्षांच्या करार तत्त्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी शासनाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच कोटी रुपयांचा धनादेश महाराष्ट्र मंडळ लंडनचे ट्रस्टी वैभव खांडगे यांच्याकडे सह्याद्री अतिथिगृह येथे सुपूर्द करण्यात आला आहे. लंडनमधील महाराष्ट्र मंडळाची इमारत महाराष्ट्र...
पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवॉर; गोळीबारात तरुणाचा मृत्यू
पुणे | गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे शहर हादरवणारी मोठी घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात झालेल्या गँगवॉरमुळे वातावरण ढवळून निघाले आहे. या गँगवॉरमध्ये गोळीबार झाला असून, त्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाना पेठेत झालेल्या गोळीबारात वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा...
पश्चिम बंगाल विधानसभेत ममता बॅनर्जींचे निंदनीय वक्तव्य; शिष्टाचार आणि सहकारी संघराज्याची प्रतिष्ठा धोक्यात
काल पश्चिम बंगाल विधानसभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्य आणि केंद्राच्या दरम्यानच्या शिष्टाचारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या वक्तव्यात त्यांनी शासनाच्या नियमावली, विधानसभेतील शिस्त आणि सहकारी संघराज्याच्या तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला जात आहे. विशेषत: त्यांच्या विधानसभेतल्या प्रवचनातून किंवा निवेदनातून विरोधकांवर केलेल्या टीकेत संपूर्ण संघराज्याची प्रतिष्ठा आणि कायदेशीर शिस्त धोक्यात येऊ शकते, असे राजकीय विश्लेषक म्हणतात. यावेळी काही नेते...
पुणे वाहतूक विभागाचा मोठा निर्णय: गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी सिंहगड रोड, धायरी, येरवडा व विश्रांतवाडी परिसरात वाहतूक बदल लागू
पुणे शहरातील सिंहगड रोड, धायरी, येरवडा आणि विश्रांतवाडी परिसरात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी आज वाहतूक विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे, या परिसरातून अनेक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पार पडत असल्याने सामान्य नागरिकांची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष मार्ग बदल लागू करण्यात आले आहेत. सिंहगड रोड व धायरी परिसर:आज एकूण ८६ गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांचे आयोजन आहे. मिरवणूक नऱ्हे, धायरी, उंबऱ्या गणपती...
भारत सागरी महासत्ता होण्यात महाराष्ट्र अग्रगण्य : जेएन पोर्ट टर्मिनल फेज-2 उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
नवी मुंबई : देशाला सागरी अर्थव्यवस्थेत महासत्ता बनविण्याच्या दिशेने महाराष्ट्राने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आहे. जेएन पोर्ट-पीएसए मुंबई टर्मिनल (बीएमसीटी) फेज-2 च्या विस्तारामुळे भारताच्या सागरी क्षमतेत प्रचंड वाढ झाली असून, महाराष्ट्र यामध्ये प्रमुख भूमिका बजावणार आहे. “भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे ठरेल,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उरण (रायगड) येथे केले. महत्त्वाचा सोहळा –...
अजित पवारांवर दादागिरीचे आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
सोलापूरमध्ये घडलेल्या एका घटनेने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) अंजली कृष्णा यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून “दादागिरी” केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री पवारांवर होत आहे. या घटनेला वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी आणि समाजमाध्यमांवरील वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी अजित पवारांचे समर्थन केले तर काहींनी त्यांच्यावर कठोर टीका केली...
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाला गती | ४७० कोटींचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा
पुणे : पुणेकरांसाठी वाहतुकीच्या मोठ्या समस्येत गणला जाणारा कात्रज-कोंढवा रस्ता अखेर वेगाने पूर्णत्वाकडे जाणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पुणे महापालिकेने ठोस पाऊल उचलले आहे. भूसंपादनासाठी आवश्यक असलेले तब्बल ४७० कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यात आले आहेत. यामुळे जागामालकांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया वेगाने होऊन रस्त्याचे काम गतीमान होणार आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मूळतः ८४ मीटरचा आराखडा...
चिंतामणी ते निलगिरी रस्ता दत्तक घेण्याचा ऐतिहासिक निर्णय: अजित पवारांच्या आवाहनाला चिंतामणी ज्ञानपीठाचा सकारात्मक प्रतिसाद, दक्षिण पुण्यात विकासाची नवीन दिशा
पुणे (प्रतिनिधी): राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जनसहभागातून विकास करण्याच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत, चिंतामणी ज्ञानपीठ आणि ऐश्वर्या कट्टा यांनी महानगरपालिकेच्या सहकार्याने आंबेगाव परिसरातील चिंतामणी चौक ते निलगिरी चौक हा महत्त्वाचा रस्ता दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय दक्षिण पुण्यातील विकासाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या ऐतिहासिक उपक्रमाचे उद्घाटन महापालिकेच्या उपायुक्त माधव जगताप, डॉ. विजय थोरात...




