मणिपूर पुन्हा पेटले! ६ जणांचे मृतदेह सापडले, मंत्र्यांच्या घरांवर हल्ले; राज्यात तणाव वाढला.
इम्फाळ : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराने उग्र रूप धारण केले आहे. आसाम-मणिपूर सीमेवर अपहरण केलेल्या सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. मृतांमध्ये एका ८ महिन्यांच्या बालकासह महिला आणि अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या घटनेनंतर राज्यात संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले असून मंत्र्यांच्या घरांवरही हल्ले करण्यात आले आहेत. घटनाक्रम: अपहरण झालेल्या व्यक्तींमध्ये मेइती समाजातील सदस्यांचा समावेश होता, ज्यांना आसामच्या जिरीबाम जिल्ह्यातून कूकी...
स्व. हशु अडवाणी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती!
चेंबूर, २६ फेब्रुवारी २०२५: स्व. हशु अडवाणी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात त्यांनी हशु अडवाणी यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाचा गौरव करत त्यांची प्रेरणादायी वाटचाल नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सामाजिक कार्यात हशु अडवाणी यांचा महत्त्वाचा वाटा! ▪️ स्व. हशु अडवाणी हे समाजसेवेचे द्रष्टे नेते होते, त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक...
कांदिवलीत गुंडांची मुजोरी; पोलिसांवर हल्ला, व्हिडिओ व्हायरल – रोहित पवारांचा सरकारवर थेट सवाल
मुंबई | प्रतिनिधी :- मुंबईच्या कांदिवली पश्चिम भागातील एकतानगर परिसरात स्थानिक गुंडांच्या दोन गटांमध्ये झालेल्या राड्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या वादाची माहिती मिळताच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरच गुंडांनी हात उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत पोलिसांची कॉलर पकडणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण केल्याचे व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येत असून, हा व्हिडिओ सध्या सोशल...
दक्षता अन् सुदैवाने मोठा अनर्थ टळला! साउथ मुंबईत BEST ची डबल डेकर इलेक्ट्रिक बस पेटली, प्रवासी सुखरूप; तपास सुरू
मुंबई | मुंबईतील नेहमी गजबजलेल्या सिद्धार्थ कॉलेज सिग्नल, फोर्ट परिसरात मंगळवारी सकाळी सुमारे ९.१५ वाजता, बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अॅण्ड ट्रान्सपोर्ट (BEST) यांची एक इलेक्ट्रिक डबल डेकर बस अचानक आगीच्या भक्षस्थानी पडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब मानली जात आहे. नेमकी घटना कशी घडली? सदर बस भाटिया बाग येथून बॅकबे डेपोकडे जात असताना अचानक बसच्या समोरील डाव्या...
“नवीन कर्मभूमीला वंदन” – काँग्रेस भवनातून देशसेवेचा नवा संकल्प
पुणे | प्रतिनिधी “नवीन कर्मभूमीला वंदन” अशा भावनिक शब्दांत काँग्रेस पक्षात प्रवेशानंतरचा पहिला अनुभव व्यक्त करत आज पुण्यातील ऐतिहासिक काँग्रेस भवनात पहिल्यांदा अधिकृत पाऊल टाकण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा कणा असलेल्या आणि देशाला दिशा देणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या या वास्तूत प्रवेश करताना केवळ अभिमान नव्हे, तर मोठ्या जबाबदारीची जाणीव झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यापूर्वी अनेकदा काँग्रेस भवनला भेट दिली असली, तरी...
पुणे पोलिसांची नवी पहल! पोलीस उप-आयुक्त स्वतः येणार ठाण्यांमध्ये – प्रलंबित तक्रारींवर थेट मार्गदर्शन | नागरीकांनी घ्यावी उपस्थिती
पुणे शहर पोलिसांकडून नागरिकांशी थेट संवाद वाढवण्यासाठी एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेने एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे, ज्यामध्ये पोलीस परिमंडळाचे उप-आयुक्त स्वतः पोलीस ठाण्यांमध्ये हजर राहून प्रलंबित गुन्हे व तक्रारी अर्जांच्या निपटाऱ्यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. पोलीस ठाण्यांना भेट देणार पोलीस उप-आयुक्त हा उपक्रम मंगळवार, २९ जुलै ते गुरुवार, ३१ जुलै २०२५ दरम्यान राबवण्यात येणार...
मराठी अस्मितेवर गदा? राज ठाकरेंचा गंभीर इशारा! मराठी माणसांवर अन्यायाचा आरोप
राज ठाकरे नेहमीच मराठी माणसाच्या हितासाठी सजग आणि सावधगिरीचा इशारा देत आले आहेत. सध्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये मराठी माणसाला दुय्यम वागणूक मिळतेय, असा आरोप पुन्हा एकदा त्यांनी केला आहे. गेल्या ४ महिन्यांमध्ये अनेक आंदोलनं झाली, पण त्या सगळ्या आंदोलनांमध्ये एक गोष्ट सतत दिसून आली – मराठी माणसाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या एका विशिष्ट पक्षाची सुस्पष्ट उपस्थिती! त्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्यांवर...
पुण्यात मुसळधार पावसाचा कहर! रस्ते जलमय, वाहतूक ठप्प, नागरिक त्रस्त…
पुणे – गुरुवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे पुणे शहरात अनेक भाग जलमय झाले असून, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे, तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. भारत हवामान विभागानुसार, १९ जून रोजी सकाळी १२ ते संध्याकाळी...
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रासाठी शासनाची नवी कार्यपद्धती – हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदींवर आधारित निर्णय
मुंबई, दि. २ सप्टेंबर : मराठा समाजाच्या दीर्घकाळच्या मागणीला प्रतिसाद देत महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने स्पष्ट कार्यपद्धती जाहीर केली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढलेल्या या शासन निर्णयामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी मा. न्यायमूर्ती...
उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांचा राजीनामा; महाराष्ट्रातील मोठ्या नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
नवी दिल्ली : देशाचे उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी रात्री उशिरा अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी प्रकृती ठीक नसल्याचे कारण पुढे करत आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. रात्री साधारणतः १० वाजता त्यांनी आपला राजीनामा सादर केला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यावर स्वाक्षरी करणार की नाही, याची अधिकृत घोषणा काही तासांत होण्याची शक्यता...











