हावडा जवळ सिकंदराबाद-शालीमार एक्सप्रेसचे तीन डबे घसरले; प्रवाशांमध्ये चिंता, रेल्वे तातडीने मदतीला धावली.
हावडा, पश्चिम बंगाल- पश्चिम बंगालच्या हावडा येथील नालपूर स्टेशनजवळ आज पहाटे सिकंदराबाद-शालीमार सुपरफास्ट एक्सप्रेस (गाडी क्र. २२८५०)चे तीन डबे घसरले. साऊथ ईस्टर्न रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश चरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये बी१ डब्याचा समावेश आहे. ही घटना सकाळी ५:३१ वाजता घडली, जेव्हा ट्रेन मध्य मार्गावरून खालील मार्गावर जात असताना एका पार्सल व्हॅनसह दोन प्रवासी डबे घसरले. प्रवाशांसाठी मदत कार्य...
महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ७१ तक्रार वजा सूचना प्राप्त
नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद नेमून दिलेल्या समन्वय अधिकारी यांनी भूषविले. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात ...
सत्ताधाऱ्यांचा धुमाकूळ! ‘चड्डी-बनियन गँग’ विरोधात विरोधकांचे विधानभवन पायऱ्यांवर आंदोलन
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'चड्डी बनियन गँग' या नावाने चर्चेला आलेल्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या धुमाकूळवृत्तीविरोधात विरोधकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून त्यांनी तीव्र आंदोलन छेडले असून, जनतेच्या अधिकारांची पायमल्ली करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यात आला आहे. घटनांचे ठळक मुद्दे 🔹 काही मंत्री व आमदार यांनी सार्वजनिक जीवनात संयमाचा अभाव दाखवत प्रशासनावर दबाव टाकणाऱ्या कृती केल्या🔹 राजकीय सत्तेच्या बळावर बिनधास्तपणे...
कस्पटे कुटुंबाला पिस्तुल दाखवणाऱ्या निलेश चव्हाणचा अखेर शिनेमा संपला! नेपाळ बॉर्डरवरून अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांचे मोठे यश!
पिंपरी-चिंचवड – वैष्णवी मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुंबाला संरक्षण देणारा व कस्पटे कुटुंबाला धमकावणारा निलेश चव्हाण याला अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून अटक केली आहे. गेल्या 10 दिवसांपासून फरार असलेल्या निलेशच्या अटकेने प्रकरणात मोठा वळणबिंदू आला आहे. देशभरात शोधमोहीम, पोलिसांची सात पथकं सक्रिय! निलेश चव्हाण याला पकडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या चार आणि पुणे पोलिसांच्या तीन पथकांनी संयुक्तरीत्या देशभर शोधमोहीम राबवली. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान,...
“रामलल्लांच्या पहिल्या तिलकोत्सवासाठी नेपाळच्या जनकपुरहून भाविकांची अयोध्याला भेट; ऐतिहासिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू”.
अयोध्या - अयोध्येतील राम मंदिराच्या पहिल्या तिलकोत्सवासाठी नेपाळमधील जनकपूर येथून सुमारे २५१ भाविक अयोध्येत पोहोचणार आहेत. हा सोहळा येत्या १८ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. तिलकोत्सवासाठी हे भाविक रामलल्लासाठी तिलक आणि विविध भेटवस्तू घेऊन येणार आहेत. जनकपूर हे माता सीतेचे जन्मस्थान मानले जाते, त्यामुळे या भेटीस अत्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. सोहळ्याच्या तयारीसाठी जनकपूर आणि अयोध्येत जय्यत तयारी अयोध्या आणि...
स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दैनंदिन प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक ये-जा करीत असलेल्या या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्राहकांचे हक्क, संरक्षण आणि फसवणूक प्रतिबंध याबाबत व्यापक जनजागृती हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाला जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर, अखिल भारतीय...
मस्ती अंगलट आली! जळगाव पोलिसांची टवाळखोर तरुणांना चोख अद्दल; थेट विवस्त्र करून काढली धिंड
जळगाव | दि. १५ जुलै २०२५ :- शहरात मस्ती आणि टवाळखोरी करणाऱ्या तरुणांच्या टोळक्याला पोलिसांनी थेट धडा शिकवत सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र करून धिंड काढली, ही घटना शहरात चांगलीच गाजत आहे.शिस्तभंग, महिलांवर शेरेबाजी, आणि सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणाऱ्या या तरुणांना जळगाव पोलिसांनी चोख प्रत्युत्तर देत कायद्याचा धाक दाखवला. पोलिसांची धडक कारवाई: गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी काही तरुणांकडून सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन,...
पाकिस्तानला धास्ती; आता भारतीय गाण्यांवरही बंदी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर संताप उसळला असून, २६ निष्पाप नागरिकांच्या मृत्यूनंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात आक्रमक धोरण स्वीकारले आहे. याच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू नदी करार स्थगित केला, अटारी बॉर्डर बंद केली आणि पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. या भारताच्या निर्णायक भूमिकेनंतर पाकिस्ताननेही बिचकून प्रत्युत्तर दिलं असून, आता भारतीय गाण्यांवर थेट बंदी घालण्याचा निर्णय घेतला...
चीन भारताच्या तीन मोठ्या गरजा पूर्ण करणार – द्विपक्षीय संबंधात नवा अध्याय
भारत आणि चीन या आशियातील दोन महासत्ता देशांमध्ये गेल्या काही काळात तणावपूर्ण परिस्थिती होती. मात्र आता या दोन्ही देशांनी पुन्हा एकदा संबंध सुधारण्यासाठी पावले उचलली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताच्या तीन महत्त्वाच्या गरजा चीन पूर्ण करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या तीन गरजांमध्ये प्रामुख्याने आर्थिक सहकार्य, औद्योगिक गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा विकासाचा समावेश असल्याचे सांगितले जाते. भारताला आगामी काळात ऊर्जा, तंत्रज्ञान...
क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या आमिषाने ₹1 कोटींची फसवणूक! खारघर पोलिसांची कारवाई, आरोपीला मुंब्रा येथून केली अटक
पनवेल परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, ज्यामध्ये एका गुंतवणूकदाराला ‘क्रिप्टो करन्सीमध्ये भरघोस परतावा मिळेल’ असे आमिष दाखवून तब्बल ₹1 कोटी 3 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार समोर येताच खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास पनवेल सायबर सेलच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्यात आला होता. तांत्रिक तपासाअंती आणि मोबाइल लोकेशनच्या आधारे तपास...










