सामाजिक

Home सामाजिक Page 103

जमावबंदी आदेश झुगारून मनसे-शिवसेना मराठी मोर्चा; आयोजकांवर कारवाईची शक्यता!

0

मीरा-भाईंदरमध्ये काल, ८ जुलै मंगळवारी काढण्यात आलेल्या मराठी अस्मितेच्या मोर्चावर आता कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मिळून हा मोर्चा आयोजित केला होता. मात्र, पोलिसांनी पूर्वीच या मोर्च्याला परवानगी नाकारली होती आणि त्याच दिवशी जमावबंदीचे आदेश लागू होते. सदर आदेशांची पायमल्ली करत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि मराठी माणसाच्या...

ज्ञानोबा-तुकाराम जयघोषात दुमदुमला टाळगाव-चिखली परिसर महापालिकेच्या शाळेत रंगला भक्ती, एकात्मता आणि परंपरेचा अद्भुत संगम

0

पिंपरी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५० वी) जयंती वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळेत  भक्तिमय वातावरणात भव्य पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने टाळगाव-चिखली परिसरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळा व महाविद्यालय परिसरातून ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत टाळ-मृदुंगाच्या गजरासह टाळ-चिपळ्यांचा नाद आणि विद्यार्थ्यांच्या अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. ‘ज्ञानोबा माऊली’ आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत सहभाग घेतला होता. महिला बचत गटांच्या सदस्यांनी, स्थानिक समाजसेवकांनी, वारकरी बांधवांनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली. वारकरी परंपरेतील पालखी सोहळा जसा श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे, तसाच तो एकात्मता आणि सामाजिक बंध दृढ करणारा सोहळा ठरला. पालखी सोहळ्याचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, समाज विकास विभाग उपायुक्त ममता शिंदे, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण कुमार मोरे, प्रशासन अधिकारी  संगीता बांगर आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपिठाचे संचालक ह. भ. प. राजू महाराज ढोरे ,डॉ. स्वाती मुळे आणि शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यांच्या नियोजनामुळे आणि समन्वयामुळे संपूर्ण मिरवणूक सोहळा शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.                                                                                                                               

‘महाराष्ट्र केसरी’ पै. पृथ्वीराज मोहोळ ऐश्वर्य कट्ट्यावर रमला – गप्पांचा मैदान गाजला!

0

पुणे : कुस्तीच्या लाल मातीत घाम गाळणारा, परिश्रमाने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणारा आणि युवा पिढीचा प्रेरणास्थान ठरलेला पै. पृथ्वीराज मोहोळ याने ऐश्वर्य कट्ट्यावर गप्पांचा मैदान गाजवला! २१ व्या वर्षी महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवणाऱ्या पै. पृथ्वीराज मोहोळचा 'ऐश्वर्य कट्ट्या'वर विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यासाठी प्रसिद्ध उद्योजक मा. श्री. प्रभाकरअण्णा मोहोळ यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. शरीर सुदृढ ठेवण्याबरोबरच हृदय...

पुण्यात थंडीला तात्पुरता दिलासा; १९ डिसेंबरपासून पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता

0

पुणे | गेल्या आठवडाभरापासून तीव्र थंडीचा सामना करणाऱ्या पुणेकरांना बुधवारी रात्री तात्पुरता दिलासा मिळाला. शहरात किमान तापमान दुहेरी अंकात नोंदवले गेले असून, शिवाजीनगर येथे किमान तापमान १०.९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. मात्र, हवामान तज्ज्ञांच्या मते हा दिलासा अल्पकालीन असून १९ डिसेंबरपासून पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही थंडी २०२५ वर्षाच्या अखेरपर्यंत टिकून राहण्याची चिन्हे आहेत. सध्या पुणे...

बारामतीत अजित पवारांच्या अंत्यसंस्कारांची तयारी अंतिम टप्प्यात; विद्याप्रतिष्ठान मैदानावर शोकाकुल वातावरण

0

बारामती | प्रतिनिधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर होणाऱ्या अंत्यसंस्कारांच्या तयारीला बारामतीतील विद्याप्रतिष्ठान मैदानावर वेग आला असून, संपूर्ण परिसरात शोकमय आणि गंभीर वातावरण आहे. राज्यभरातून हजारो नागरिक, कार्यकर्ते, राजकीय नेते, सामाजिक प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी बारामतीकडे रवाना होत आहेत. विद्याप्रतिष्ठान मैदानात अंत्यदर्शनासाठी विशेष मंडप, सुरक्षा बॅरिकेड्स, वैद्यकीय सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. कोणतीही गैरसोय होऊ...

पुणे स्मार्ट सिटीच्या प्रगत वाहतूक सिग्नल्सच्या व्यवस्थापनाची जबाबदारी; ₹११ कोटी वार्षिक बजेट मंजूर.

0

पुणे, २९ नोव्हेंबर २०२४: स्मार्ट सिटी कंपनीने पुढील पाच वर्षांसाठी पुण्यातील ऍडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ATMS) सिग्नल्सच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात पुणे महानगरपालिकेला (PMC) औपचारिक प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. PMC चे अतिरिक्त आयुक्त प्रिथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले की, या निर्णयावर अंतिम मोहर स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाच्या आगामी बैठकीत लागणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे भवितव्य आणि...

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

0

पिंपरी, दि. १२ मार्च २०२५ – महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या सामाजिक, औद्योगिक आणि शैक्षणिक विकासाचे शिल्पकार होते, स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी सहकार, औद्योगिकरण, कृषी विकास आणि शिक्षण क्षेत्रात महत्वपुर्ण योगदान देऊन विकासाची पायाभरणी केली. त्यांच्या व्यापक विचारांचा वारसा चालवत महाराष्ट्र विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार...

चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगलेला व पॅरोलवरून फरार सराईत चोर बाणेर पोलिसांच्या जाळ्यात, मुंबईतून अटक

0

बाणेर पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या चोरीच्या प्रकरणात शिक्षा भोगलेला आणि दुसऱ्या चोरीच्या गुन्ह्यात पॅरोलवरून फरार असलेल्या सराईत आरोपीला बाणेर पोलिसांनी अटक करून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली असून, सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांची कडक भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी बाणेर पोलीस स्टेशन येथे फिर्यादीने तक्रार दाखल केली होती....

धडाडीचे IAS तुकाराम मुंढे पुन्हा बदलीवर; महाराष्ट्र सरकारने ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या

0

मुंबई – महाराष्ट्र प्रशासनात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळाले असून, राज्य सरकारने पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे धडाडीचे आणि कर्तव्यकठोरतेसाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचे आहे. प्रशासनात नियमांच्या अंमलबजावणीसाठी कडक भूमिका घेणाऱ्या मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. नवीन नियुक्तीचा तपशील तुकाराम मुंढे यांची असंघटित कामगार आयुक्तपदावरून...

बारामतीत नागरिकांशी थेट संवाद; समस्या ऐकून तातडीने सोडवण्याचे निर्देश

0

पुणे जिल्ह्यातील Baramati येथे आज सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या विविध समस्या आणि अडचणी जाणून घेण्यासाठी विशेष भेटीगाठी आयोजित करण्यात आल्या. या संवादादरम्यान नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध प्रश्न मांडले, तर त्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी संबंधित प्रशासनाला तातडीने आवश्यक सूचना देण्यात आल्या. या भेटीत नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, वीज सुविधा, शासकीय योजनांचा लाभ तसेच स्थानिक विकासकामांबाबत विविध मुद्दे...

Copyright ©