महाराष्ट्र
संत तुकाराम महाराज पालखीचे पिंपरी-चिंचवडमध्ये स्वागतासाठी महापालिकेची जय्यत तयारी! शहरात धार्मिक वातावरणाची अनुभूती
पिंपरी-चिंचवड, दि. १८ जुलै: आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन घेतल्यानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी परतीच्या प्रवासाला निघाली आहे. शनिवारी, १९ जुलै रोजी पालखी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालखीचे भव्य स्वागत, सुरक्षितता व सेवा-सुविधांची तयारी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केली जात आहे. पालखीचे स्वागत व नियोजन महात्मा फुले महाविद्यालयाजवळ पिंपरी येथे पालखीचे स्वागत करण्यात येणार आहे....
स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड शहराची भरारी – शहराचा देशात सातवा, राज्यात पहिला क्रमांक
पिंपरी- केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेतलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहराचा देशात ७ वा तर राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याचबरोबर ७ स्टार गार्बेज फ्री सिटी व वॉटर प्लस असे पुन्हा एकदा मानांकन मिळविले आहे. गतवर्षी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये शहराचा देशात १० वा तर राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त झाला होता. यावेळी शहराचा राज्यात पहिल्यांदाच प्रथम क्रमांक आला आहे. दिल्ली येथे...
विधानभवनात चिघळले वातावरण! भाजपा-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये तुफान मारामारी; गोंधळावर राजकीय नेत्यांची संतप्त प्रतिक्रिया
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान एक अत्यंत गंभीर आणि लज्जास्पद प्रकार घडला आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये विधानभवनाच्या लॉबीमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका चिघळला की थेट मारहाणीत रूपांतर झाले. यामध्ये पडळकर गटाचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले आणि आव्हाड यांच्या गटाचे नितीन देशमुख यांच्यात धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याची माहिती...
चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू; ‘एकी हेच बळ’चा उत्तम प्रत्यय!
चाकण – शिक्रापूर रस्त्यावर अनेक महिन्यांपासून खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नव्हते. स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन सातत्याने आवाज उठवल्यानंतर अखेर प्रशासनाने जाग घेतली असून आजपासून खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केली जात असून, नागरिकांच्या एकतेमुळेच हे शक्य झाले आहे. ‘एकी हेच बळ’ या उक्तीचा प्रत्यय...
नवनगर प्राधिकरणाच्या प्रॉपर्टी ‘फ्री होल्ड’ करण्यासाठी राज्य सरकार सज्ज – लवकरच कॅबिनेटमध्ये ऐतिहासिक निर्णयाची शक्यता!
🔸 आता मिळकतींवर तुमचे संपूर्ण हक्क असणार! ८५ हजारांहून अधिक मिळकतधारकांना दिलासा🔸 भाजपा आमदार महेश लांडगे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी होण्याच्या मार्गावर🔸 ‘रेड झोन’मुक्ती, पुनर्विकास आणि शासकीय इमारतींचा हस्तांतरण प्रस्तावही मंजुरीच्या दिशेने पिंपरी-चिंचवड शहरासाठी आणि विशेषतः नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय लवकरच होणार आहे. प्राधिकरणाच्या प्रॉपर्टी ‘फ्री होल्ड’ करण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली...
पनवेलकरांना दिलासा! महापालिकेकडून ‘अभय योजना’ जाहीर – करदात्यांना ९०% पर्यंत शास्तीमाफीचा लाभ
पनवेल महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पनवेल महापालिकेने मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांसाठी "अभय योजना" जाहीर केली असून, या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना २५ ते ९० टक्क्यांपर्यंत शास्तीमाफी (दंडमाफी) दिली जाणार आहे. ही योजना चार टप्प्यांत राबवली जाणार असून, १८ जुलै ते १५ ऑगस्ट २०२५ या पहिल्या टप्प्यात कर भरल्यास नागरिकांना थकबाकीवरील शास्तीवर ९०% सूट मिळणार...
अपहरणाचा थरार छत्रपती संभाजीनगरमध्ये; अकरा वर्षाच्या चिमुरडीला पाच जणांनी कारमध्ये ओढलं, नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
छत्रपती संभाजीनगर : शहराच्या मध्यवर्ती भागात एका अकरा वर्षाच्या मुलीच्या अपहरणाचा धक्कादायक प्रयत्न झाला असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गारखेडा परिसरातील नाथप्रांगण येथे एका खासगी क्लासेसमधून बाहेर पडलेल्या चिमुरडीला संध्याकाळी साडेआठच्या सुमारास सॅन्ट्रो कारमधून आलेल्या पाच जणांनी ओढून गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. या घटनेची साक्षदर्शी घटना म्हणजे — चिमुरडीला घेण्यासाठी आलेल्या कारचालकाने ही...
शिवसेनेच्या निष्ठेची प्रेरणा बाळासाहेबांकडूनच मिळाली – अंबादास दानवे यांची भावनिक प्रतिक्रिया
विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेतील आपली टर्म संपत असताना दिलेल्या वक्तव्यात अत्यंत भावनिक आणि ठाम भूमिका मांडली आहे. "मी कार्यकर्ता आहे, शिवसैनिक आहे. मी इथे येणार नसलो तरी माझ्या बाकीच्या मॅचेस चालू राहतील," असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी शिवसेनेप्रतीची निष्ठा अधोरेखित केली. दानवे यांनी सांगितले की, "शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला २००० साली बोलावले होते. शहरप्रमुख पदासाठी...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्र्यांसह विधानमंडळाच्या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती विधान भवनात!
विधान भवन, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला, जेव्हा विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्रीमंडळातील विविध मंत्री यांच्यासह विधानपरिषदेचे सदस्य एकत्र आले. या प्रसंगी घेतलेल्या सामूहिक छायाचित्रात...
धुळेच्या औद्योगिक विकासाला नवे पंख! ‘लॉजिस्टिक हब’ उभारणीस मुख्यमंत्री फडणवीस यांची गती
मुंबई – धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे धुळे विधानसभा मतदारसंघाच्या विविध मुद्द्यांवर बैठक पार पडली. या बैठकीत शहराच्या नागरी सुविधा, उद्योग विस्तार आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. धुळे येथे औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ‘लॉजिस्टिक हब’ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आणि आर्थिक...




