महाराष्ट्र ग्लोबल एज्युकेशन पॉवरहाऊसकडे वाटचाल; UIUC प्रतिनिधीमंडळासोबत उच्चस्तरीय चर्चा
मुंबई: महाराष्ट्र जागतिक शिक्षण व संशोधन क्षेत्रात वेगाने उदयास येत असताना, अमेरिकेतील प्रतिष्ठित University of Illinois Urbana-Champaign (UIUC) च्या उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाचे मुंबईत स्वागत करण्यात आले. प्रा. सुसन मार्टिनिस, सीनियर व्हाइस चान्सलर (रिसर्च अँड इनोव्हेशन) यांच्या नेतृत्वाखालील या प्रतिनिधीमंडळासोबत अर्थपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण चर्चा पार पडली. १८० वर्षांहून अधिक शैक्षणिक परंपरा लाभलेल्या UIUC या जागतिक दर्जाच्या विद्यापीठासोबत महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि औद्योगिक सहकार्याच्या...
मुंबईत देशातील पहिला ‘संगीत रस्ता’ लोकार्पित; किनारी मार्गावरून वाहनचालकांना ‘जय हो’ची सुरेल अनुभूती
मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावर उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्यावहिल्या ‘संगीत रस्त्या’चे आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या अभिनव उपक्रमामुळे मुंबईकरांसह पर्यटकांना आता प्रवास करताना एक अनोखा आणि सुरेल अनुभव मिळणार आहे. या कार्यक्रमाला हंगेरीचे वाणिज्य दूत श्री. फॅरेन जारी, माजी खासदार राहुल शेवाळे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व...
चार वर्षांनंतर बीएमसीला लोकनियुक्त सत्ता; रितू तावडे यांच्याकडे महापालिकेची धुरा, भाजप सर्वात मोठा पक्ष
मुंबई : तब्बल चार वर्षे प्रशासकांच्या नियंत्रणाखाली असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) अखेर लोकनियुक्त सत्तेची पुनर्स्थापना झाली असून भाजपच्या रितू तावडे यांनी महापालिकेच्या कारभाराची धुरा स्वीकारली आहे. 2022 पासून निवडून आलेले सभागृह अस्तित्वात नसल्याने प्रशासकीय पातळीवरच कामकाज सुरू होते. आता जानेवारी 15, 2026 रोजी झालेल्या निवडणुकांनंतर मुंबईकरांना पुन्हा लोकप्रतिनिधी मिळाले आहेत. महापालिकेतील मागील नगरसेवकांचा कार्यकाळ मार्च 2022 मध्ये संपला होता. त्यानंतर...
अंबरनाथ पूर्वेत जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य; थेट संवादातून तातडीने निवारण
अंबरनाथ : लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी व्हावा तसेच सर्वसामान्यांच्या अडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने अंबरनाथ पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित भेटीगाठींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्या, मागण्या आणि सूचना मांडत जनसंपर्क कार्यालयात हजेरी लावली. या वेळी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, गटार स्वच्छता, मालमत्ता कर, वीजपुरवठा, आरोग्य सुविधा, शासकीय योजनांचा लाभ तसेच स्थानिक...
माता रमाबाई नगरमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; जीर्ण पाईपलाईन तातडीने बदलण्याची मागणी
मुंबई :भांडुप पूर्व येथील प्रभाग क्रमांक ११४ मधील माता रमाबाई नगर परिसरात पिण्याच्या पाण्यात दूषित घटक मिसळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नळातून येणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येत असून पाण्याचा रंगही गढूळ दिसत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली...
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर ३० तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प; पाणी-अन्नाविना हजारो प्रवासी अडकले, गॅस टँकर अपघातामुळे अभूतपूर्व कोंडी
मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी झालेल्या गॅस टँकर अपघातानंतर निर्माण झालेली भीषण वाहतूक कोंडी तब्बल ३० तासांहून अधिक काळ कायम राहिली. आडोशी बोगद्याजवळ प्रोपिलीन वायू वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली आणि सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी संपूर्ण वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली. परिणामी हजारो वाहनचालक, कुटुंबे, लहान मुले, वृद्ध आणि कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक...
एकाच टँकरने थांबवला संपूर्ण वेग! मुंबई–पुणे एक्सप्रेस-वे २४ तास बंद; ‘हायटेक इन्फ्रास्ट्रक्चर’वर गंभीर प्रश्नचिन्ह
मुंबई/पुणे : देशातील सर्वात आधुनिक आणि वेगवान महामार्ग म्हणून ओळखला जाणारा मुंबई–पुणे एक्सप्रेस-वे एका अपघातामुळे तब्बल २४ तास ठप्प राहिल्याने राज्याच्या पायाभूत सुविधांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने झालेल्या गॅस गळतीमुळे प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली. परिणामी हजारो वाहनचालक आणि प्रवासी महामार्गावरच अडकून पडले. सुमारे ९२ किलोमीटर...
कर्तृत्वाचा गौरव आणि अभिमानाचा क्षण: गुन्हे शाखेत पदोन्नतीचा सोहळा, ‘पाइपिंग सेरेमनी’त कुटुंबीयांच्या उपस्थितीत सन्मान
मुंबई | प्रतिनिधी पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण सेवेचा गौरव करत आज गुन्हे शाखेतील तीन पोलीस शिपाई यांना पोलीस हवालदार पदावर, तर एका पोलीस हवालदारास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावर पदोन्नती देण्यात आली. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘पाइपिंग सेरेमनी’ कार्यक्रमात पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पदचिन्हे प्रदान या सोहळ्यात अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे यांच्या...
शासकीय सेवेत निर्णयक्षमता, प्राधान्यक्रम व सकारात्मकता महत्त्वाची; मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे प्रतिपादन, इक्बाल सिंग चहल यांच्या सेवेला गौरवपूर्ण निरोप
मुंबई | प्रतिनिधी शासकीय सेवेत कार्यरत असताना केवळ पद नव्हे, तर निर्णय घेण्याची क्षमता, परिस्थितीनुरूप विचार, कामाचा अचूक प्राधान्यक्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन हे अत्यंत महत्त्वाचे गुण असतात. या गुणांच्या आधारेच अधिकारी आपल्या सेवाकाळात वेगळा ठसा उमटवू शकतात, असे मत राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केले. मंत्रालयातील परिषद सभागृहात गृह विभागाचे सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव श्री. इक्बाल सिंग चहल यांच्या...
‘३६ तासांत १२ मुले बेपत्ता’ अफवा ठरली खोटी; मुंबई पोलिसांचा नागरिकांना इशारा, अफवा पसरवणाऱ्यांवर FIRची कारवाई
मुंबई | प्रतिनिधी मुंबईत अवघ्या ३६ तासांत १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाल्यानंतर, मुंबई पोलिसांनी याबाबत ठाम शब्दांत खुलासा करत नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. या खोट्या पोस्ट्समुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई पोलिसांचा अधिकृत खुलासा मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर स्पष्ट करत म्हटले आहे की,“काही...




