मुंबई
मुंबईत जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर लाठ्यांनी हल्ला, संभाजी राजेंवरील वक्तव्यामुळे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हल्ला
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP-SP) नेते जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर गुरुवारी स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी राजे यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे हा हल्ला झाला. मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील पक्ष कार्यालयातून बाहेर पडताच आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. संभाजी राजे हे स्वराज पक्षाचे नेते आहेत, आणि आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. या हल्ल्याचा...
BEST बस अपघात प्रकरण: चालकाने बस ‘हत्यार’ म्हणून वापरली का? पोलिसांचा तपास सुरू.
मुंबई : कुर्ला (पश्चिम) येथे सोमवारी रात्री झालेल्या भीषण BEST बस अपघाताने संपूर्ण मुंबई हादरली आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर ४२ जण जखमी झाले. याप्रकरणी बस चालक संजय मोरे यांना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करण्यासाठी न्यायालयाकडे संजय मोरे यांच्या कोठडीची मागणी केली आहे. चालकाच्या हेतूवर संशय: पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, या अपघातामध्ये...
कल्याणमध्ये मनसेचा आक्रमक अंदाज; कोचिंग क्लासच्या संचालकाला थप्पड, विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा आरोप
कल्याण : मुंबईतील कल्याण परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांनी एका कोचिंग क्लासच्या संचालकाला चक्क थप्पड मारली असून, या घटनेमुळे शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. संबंधित क्लासच्या विरोधात विद्यार्थ्यांकडून अनेक तक्रारी आल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट क्लासमध्ये जाऊन संचालकाला जाब विचारला आणि त्यानंतर ही घटना घडली. मनसे पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे की, कोचिंग सेंटरच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून अवास्तव फी घेतली जात आहे. अभ्यासक्रम...
मुंबईत ‘जागतिक महिला दिन २०२६’ उत्साहात साजरा; महिला सन्मान पोर्टलचे अनावरण, सायबर वेलनेस कक्षाचे उद्घाटन
मुंबई, प्रभादेवी : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने प्रभादेवी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यात आला. महिलांच्या सुरक्षेसाठी व सक्षमीकरणासाठी नव्या उपक्रमांची घोषणाही यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, महिला उद्योजिका, तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. उपस्थितांना...
पुण्यात दहशतवाद्याला अटक! ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाच्या नेटवर्कचा पर्दाफाश
पुणे | महाराष्ट्र एटीएसने पुण्यातील कोंढवा भागात मोठी आणि संवेदनशील कारवाई करत अल-कायदाशी संबंध असलेल्या संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. झुबेर हंगरकर असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याच्यावर UAPA (Unlawful Activities Prevention Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पुण्यातील सुरक्षा यंत्रणा व नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. एटीएस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून कोंढवा परिसरावर...
‘३६ तासांत १२ मुले बेपत्ता’ अफवा ठरली खोटी; मुंबई पोलिसांचा नागरिकांना इशारा, अफवा पसरवणाऱ्यांवर FIRची कारवाई
मुंबई | प्रतिनिधी मुंबईत अवघ्या ३६ तासांत १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाल्यानंतर, मुंबई पोलिसांनी याबाबत ठाम शब्दांत खुलासा करत नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. या खोट्या पोस्ट्समुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई पोलिसांचा अधिकृत खुलासा मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर स्पष्ट करत म्हटले आहे की,“काही...
घटनात्मक संघर्षाच्या उंबरठ्यावर देश: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून राज्यपालांच्या अधिकारांवर सर्वोच्च न्यायालयाला १४ प्रश्नांची सरबत्ती.
नवी दिल्ली : देशातील घटनात्मक व्यवस्थेच्या मूलभूत रचनेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्य विधेयकांवरील राज्यपाल व राष्ट्रपतींच्या अधिकारांबाबत १४ महत्त्वाचे प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या दरबारात पाठवले आहेत. हे अत्यंत दुर्लभ अशा संविधानिक अधिकारांचा वापर करत, अनुच्छेद 143(1) अंतर्गत करण्यात आले आहे. ही कारवाई तामिळनाडू राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार प्रकरणातील 8 एप्रिलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आली असून, त्या...
देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला; ‘वर्षा’वर तब्बल तासभर चर्चा, महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर विचारविनिमय
मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 'वर्षा' बंगल्यावर भेट घेतली. या बैठकीत तब्बल तासभर महत्त्वाच्या राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर खलबतं झाली असल्याचे समजते. राज्यातील काही ठळक विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी या भेटीची आवश्यकता भासल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. राजकीय परिस्थितीवर चर्चा: फडणवीस आणि शिंदे यांच्यातील या बैठकीत राज्यातील...
पाहुणचारासाठी गेले आणि मृतदेहात परतले; एका बहिणीचा करुण हंबरडा – ‘सर्व काही उद्ध्वस्त झालं, आता जगायचं तरी कसं?’
मुंबई - जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील अतुल माने, संजय लक्ष्मण लेले आणि हेमंत जोशी या तिघांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजश्री अकुल या मयत अतुल माने यांच्या पत्नीच्या बहिणीने दिलेल्या माहितीने संपूर्ण महाराष्ट्राला हेलावून सोडलं आहे. "ते त्यांच्या पोटात, डोक्यात आणि छातीत गोळ्या झाडत होते – माझ्या बहिणीच्या डोळ्यांसमोर!" राजश्री...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रसार – राजदूत विशाल शर्मा
मुंबई, दि.20 : पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोमध्ये स्थापित करण्यात आल्याने या घटनेला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जगभरातील नागरिकांना डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची तसेच शिक्षण, मानवाधिकार आणि सामाजिक समतेच्या मूल्यांची ओळख करून देणे, हाच या उपक्रमाचा मुख्य...












