Breaking News

Home Breaking News Page 8

“प्रत्येकाला आपल्या मातृभाषेविषयी आपुलकी असते… महाराष्ट्रात मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे” – अजित दादांचा ठाम निर्धार

0

मुंबई – “मराठी ही महाराष्ट्राच्या मातीची ओळख आहे. इथे राहणाऱ्यांनी मराठी भाषा बोलणं केवळ गरजेचं नाही, तर ही आपली जबाबदारी आहे,” असे ठाम उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना काढले. त्यांच्या या विधानामुळे मराठी भाषेच्या महत्त्वावर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे. अजित दादा पुढे म्हणाले, “प्रत्येकालाच आपल्या मातृभाषेविषयी प्रेम, अभिमान आणि आत्मीयता असली पाहिजे. आपण ज्या भूमीत राहतो,...

देशभक्तीचा महायोद्धा हरपला – ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शोकसंदेश – 'भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अनमोल हिरा निखळला' मुंबई, 4 एप्रिल – भारतीय चित्रपटसृष्टीला राष्ट्रभक्तीची ओळख देणारे, "भारतकुमार" म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने हिंदी सिनेसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात सांगितले, "चित्रपटसृष्टीतून देशभक्ती आणि भारतीय संस्कृती जनमानसावर ठसवणाऱ्या...

गिरगावमध्ये गुढीपाडवा शोभायात्रेत मराठी अस्मितेचा नारा! ‘आमच्या महाराष्ट्रात ताटात काय खायचे ते आम्हीच ठरवणार’ फलकावरून अमराठींना इशारा?

0

मुंबई आणि उपनगरांमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वादाची ठिणगी पुन्हा एकदा पेटली आहे. गुढीपाडवा शोभायात्रांमध्ये याचे पडसाद उमटले असून, गिरगावमध्ये एका वादग्रस्त फलकावरून हा विषय अधिक चर्चेत आला आहे. गिरगावमध्ये 'आमच्या महाराष्ट्रात मराठी माणसांनी ताटात काय खायचे हे फक्त आम्हीच ठरवणार' असा मजकूर असलेला फलक झळकल्याने वाद निर्माण झाला आहे. 'आम्ही गिरगावकर' संस्थेने हा फलक लावत आपली ठाम भूमिका स्पष्ट केली...

पुणे व महाबलेश्वरमध्ये जोरदार पाऊस; मोसमाची सततची दखल! पुणे-दोन दिवसांत १२३ मिमी, महाबळेश्वर १६० मिमी – वाढती धोक्यांची खबर!

0

पुणे | विशेष प्रतिनिधी :- महाराष्ट्रात दक्षिण-पश्चिम मोसमाने जोर धरला असून, २४ तासांत पुणे जिल्ह्यात साशंक पाऊस नोंदला गेला ज्यामुळे राज्यानंतर पुढे होणाऱ्या बर्‍याच ठिकाणांवर लोकजीवन प्रभावित झाले आहे लोनावळा: २४ तासांत १२३ मिमी; गिरीवण: ८४ मिमी; भोर: ८० मिमी; पुणे शहरात एनडीए: ४६.५ मिमी, शिवाजीनगर: ३०.५ मिमी, चिंचवड: २८ मिमी; तम्हिणी घाट‌: २२० मिमी, भीरा: १५३ मिमी, शिरगाव: १८० मिमी   महाबळेश्वर – पावसाने घेतला वेग साताऱ्याच्या प्रसिद्ध हिल स्टेशनला २४ तासांत १६० मिमी पाऊस; आसपासच्या खंडाल-कोकणात मात्र २००–२५० मिमी पावसाची नोंद .   IMD–चं गंभीर इशारे: ऑरेंज...

मुळा-मुठा नदीला आलेला पुराचा वेग; पुणेकरांना सतर्कतेचा इशारा

0

पुणे – पुण्यातील कल्याणी नगर-मुंढवा परिसरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीला आलेले पाणी पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बंडगार्डन बंधाऱ्यावरून तब्बल ९०,००० क्युसेक पाणी नदीत सोडण्यात आले असून, यामुळे नदी काठच्या भागांत पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणांची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करावा लागतो आणि याचा थेट परिणाम पुण्यातील...

गुन्हेगारीवर पोलिसांचा घणाघात! – हडपसर येथील सराईत गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी तडीपार आदेश

0

पुणे | १० मे २०२५ :- हडपसर पोलिसांनी पुन्हा एकदा सराईत गुन्हेगारांवर कारवाई करत दोन गंभीर गुन्ह्यांत अडकलेल्या एका गुन्हेगारास दोन वर्षांसाठी पुणे शहर व परिघातून तडीपार केले आहे. या कारवाईने हडपसर परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे, तर गुन्हेगारी प्रवृत्तींना स्पष्ट इशारा दिला गेला आहे की, गुन्हेगारीला माफी नाही. गुन्ह्यांचा इतिहास: सदर आरोपीवर हडपसर पोलीस ठाणे येथे खालीलप्रमाणे गंभीर गुन्हे...

पावसाचा कहर! दिवे घाटात ढगफुटी, पिंपरीत वाहने वाहून गेली, पुणे शहरात शासकीय इमारती जलमय

0

पुणे | १४ जून २०२५ – राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवे घाट परिसरात ढगफुटीसदृश पावसामुळे प्रचंड पाणी साचून निसर्ग रौद्र रूपात अवतरला. दिवे घाटात मुसळधार पावसामुळे ओढे, धबधबे आणि पाण्याचे प्रवाह एकदम ओसंडून वाहू लागले. काही धबधब्यांनी इतकं रौद्र रूप धारण केलं की...

*जालना येथील अंतरवली गावात घडलेल्या वादग्रस्त अधीक्षक तुषार दोषी ह्यांची पुण्यातील झालेल्या बदली वर पुनःश्च बदली……*

0

राज्यातील मराठा आरक्षणाचा साठी आवाज उठवाणारे मनोज जरांगे पाटील उपोषणा करिता बसले असताना वादग्रस्त आयपीएस अधिकारी तुषार दोशी अंतरवाली सराटीमध्ये एक सप्टेंबरला ला आंदोलन कर्त्यांना पंगावण्यासाठी लाठीचार्ज झाला होता. तेव्हा तुषार दोषी हे जालन्याचे पोलिस अधीक्षक होते. त्यांच्यावर ह्या केलेल्या लाठीचार्ज साठी दोषी असल्याचे आरोप झाल्यानंतर तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच आय पी स...

मा.श्री. जे.पी. नड्डा जी ! यांनी प्रभू श्रीरामांच्या मुर्तीचं पूजन करत गणरायाची आरतीही केली. यावेळी मा. नड्डा जी यांचं श्रीराम मंदिराची प्रतिकृती भेट देत स्वागतपर सन्मान केला.

0

नेते, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. जे.पी. नड्डा जी यांनी आज आपल्या श्री साई मित्र मंडळाला भेट दिली. यावेळी मा. नड्डा जी यांनी प्रभू श्रीरामांच्या मुर्तीचं पूजन करत गणरायाची आरतीही केली. यावेळी मा. नड्डा जी यांचं श्रीराम मंदिराची प्रतिकृती भेट देत स्वागतपर सन्मान केला. प्रदेशाध्यक्ष मा.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्यासह मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो गणेशभक्त उपस्थित होते.

मीरा-भाईंदरमधील मराठी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तातडीने बदली; प्रशासनाच्या भूमिकेवर उठले अनेक प्रश्न!

0

मीरा-भाईंदर परिसरात मराठी भाषेच्या प्रश्नावर मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समिती यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले आंदोलन चिघळल्यामुळे संपूर्ण परिसरात राजकीय खळबळ उडाली. या आंदोलनाला परवानगी नाकारण्याच्या निर्णयामुळे तणाव वाढला आणि मराठी जनतेमध्ये तीव्र रोष व्यक्त झाला. मंगळवारी (८ जुलै २०२५) रोजी नियोजित मोर्चाला पोलिसांकडून परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेल्या नागरिकांना, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलकांना अटक...

Copyright ©