T20 World Cup 2026: टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व, गिल बाहेर, अक्षर पटेल उपकर्णधार
नवी दिल्ली | आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय क्रिकेट संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. आज (२० डिसेंबर) झालेल्या निवड समितीच्या बैठकीनंतर बीसीसीआयने पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली. या पत्रकार परिषदेला बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया,...
पुणे महापालिका निवडणुकीआधी राष्ट्रवादीला मोठा धक्का; NCP व NCP (SP) मधील दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पुणे | प्रतिनिधी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट – NCP SP) यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. दोन्ही पक्षांतील अनेक माजी नगरसेवक व प्रमुख नेत्यांनी भारतीय जनता पार्टीत (भाजप) जाहीर प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, राज्य आणि केंद्रात भाजप व राष्ट्रवादी हे मित्रपक्ष असले तरी पुणे महापालिका निवडणूक दोन्ही पक्ष स्वबळावर...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रसार – राजदूत विशाल शर्मा
मुंबई, दि.20 : पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोमध्ये स्थापित करण्यात आल्याने या घटनेला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जगभरातील नागरिकांना डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची तसेच शिक्षण, मानवाधिकार आणि सामाजिक समतेच्या मूल्यांची ओळख करून देणे, हाच या उपक्रमाचा मुख्य...
महिला टी-20 क्रिकेटमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विश्वविजेत्या संघाचा गौरव
मुंबई | विशेष प्रतिनिधी भारताच्या दृष्टिबाधित महिला टी-20 क्रिकेट संघाने जागतिक पातळीवर अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कामगिरी करत विश्वविजेतेपद पटकावले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संघातील खेळाडूंचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ येथे झालेल्या या विशेष समारंभात देशाचा तिरंगा उंचावणाऱ्या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी खेळाडूंना संबोधित करताना सांगितले की, दृष्टिबाधित महिला खेळाडूंनी...
वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना – पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती
मुंबई, दि. 20 : महाराष्ट्रात उत्पादित डाळिंबाचा हंगामातील पहिला कंटेनर मुंबईतील जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना करण्यात आला आहे. कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरून हा कंटेनर रवाना करण्यात आला असून राज्यातील फळनिर्यातीच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, अशी माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. अमेरिका - भारत कृषी-निर्यातविषयक घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर...
राजकीय दिवाळीचा धमाका! अजित पवारांच्या ‘टिकल्यां’नंतर महेश लांडगेंचा ‘सुतळी बॉम्ब’; पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाची जोरदार ताकदप्रदर्शन
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण अक्षरशः तापले असून, यंदाची निवडणूक ‘राजकीय दिवाळी’ ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील बारामती गेस्टहाऊसमध्ये भाजपातील काही माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश घडवून आणत ‘टिकल्या’ वाजवल्या. मात्र, याला तितक्याच जोरदार पद्धतीने प्रत्युत्तर देत भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी आज सर्वपक्षीय तब्बल २२...
सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा शक्तिप्रदर्शन मेळावा; माजी महापौरांसह अनेकांचा जाहीर प्रवेश
सांगली | प्रतिनिधी – सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास उपस्थित राहून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना संबोधित करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, नवचैतन्य आणि संघटनात्मक बळाचे दर्शन घडले. या मेळाव्याच्या निमित्ताने माजी महापौर श्री. मैनुद्दीन बागवान, माजी महापौर श्री. आनंदा देवमाने, तसेच अनेक माजी...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘भारतीय संस्कृतीचे पुरोधा राजा ऋषभ’ या ग्रंथाचे भव्य प्रकाशन
मुंबई – भारतीय संस्कृतीच्या समृद्ध परंपरेचा वेध घेणाऱ्या ‘भारतीय संस्कृतीचे पुरोधा राजा ऋषभ’ या महत्वपूर्ण ग्रंथाचे प्रकाशन आज मुंबई येथे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यिक, इतिहास अभ्यासक, धर्मगुरू तसेच मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते. या पुस्तकात भारतीय संस्कृतीचे आद्य प्रवर्तक मानले जाणारे राजा ऋषभदेव यांचे जीवन, तत्त्वज्ञान, समाजरचना आणि संस्कृती...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज; पारदर्शक व भयमुक्त निवडणुकीसाठी व्यापक तयारी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक, भयमुक्त आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूक प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा सुरळीतपणे पार पडावा, यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक साधने व सुरक्षेची काटेकोर आखणी करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आदर्श आचारसंहितेची...
पुण्यात थंडीला तात्पुरता दिलासा; १९ डिसेंबरपासून पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता
पुणे | गेल्या आठवडाभरापासून तीव्र थंडीचा सामना करणाऱ्या पुणेकरांना बुधवारी रात्री तात्पुरता दिलासा मिळाला. शहरात किमान तापमान दुहेरी अंकात नोंदवले गेले असून, शिवाजीनगर येथे किमान तापमान १०.९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. मात्र, हवामान तज्ज्ञांच्या मते हा दिलासा अल्पकालीन असून १९ डिसेंबरपासून पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही थंडी २०२५ वर्षाच्या अखेरपर्यंत टिकून राहण्याची चिन्हे आहेत. सध्या पुणे...




