0
0
0
0
0

सामाजिक

Home सामाजिक Page 49

रेल्वे ट्रॅकवर ठेवलेल्या गॅस सिलेंडर प्रकरणाला वर्ष पूर्ण, तपास अद्याप निष्कर्षापर्यंत नाही!

पुणे शहरात जवळपास एक वर्षापूर्वी एक भीषण दुर्घटना अटळ होती, परंतु शताब्दी एक्स्प्रेसच्या लोको पायलटने वेळीच सतर्कता दाखवून शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवले. उरुळी कांचन परिसरातील रेल्वे ट्रॅकवर लाल रंगाचा एलपीजी गॅस सिलेंडर ठेवलेला दिसताच त्यांनी तत्काळ इमर्जन्सी ब्रेक लावले आणि मोठा अनर्थ टळला. मात्र या धक्कादायक प्रकरणाचा तपास अजूनही निष्कर्षापर्यंत पोहोचलेला नाही. घटना कशी घडली? 29 डिसेंबर 2024 रोजी रात्री 10.42...

८ महिन्यांत ६१ हजारांहून अधिक नागरिकांना उच्च रक्तदाब, तर ३९ हजारांना डायबिटीसचा धक्का!

पुणे: वेगवान जीवनशैली, वाढता ताण आणि अनियमित आहारामुळे पुणेकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या ८ महिन्यांत तब्बल ६१,७३२ नागरिकांना उच्च रक्तदाब असल्याचे निदान झाले आहे. त्याच कालावधीत ३९,९७० नागरिकांना मधुमेह असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे आकडे शहरातील जीवनशैली किती धोकादायक पातळीवर पोहोचली आहे, याचे गंभीर चित्र समोर आणतात. शहरातील ७,२२,३२७ नागरिकांची तपासणी...

मुंबईतील हॉस्पिटल रिक्रूटमेंट घोटाळा उघड! HBT ट्रॉमा सेंटरवरील बनावट डॉक्टर नियुक्ती प्रकरणाची BMC कडून उच्चस्तरीय चौकशी सुरू

मुंबई : जोगेश्वरी (पूर्व) येथील HBT ट्रॉमा केअर सेंटरमध्ये मोठा रिक्रूटमेंट घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. बनावट डॉक्टर, बोगस नियुक्त्या, मुलाखतीशिवाय भरती, तसेच पगार हडप केल्याच्या गंभीर तक्रारी समोर येताच रुग्णसेवेशी निगडित या संवेदनशील विभागातील कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ६० ते ७० डॉक्टर मुलाखतीशिवाय नियुक्त? तक्रारीनुसार ऑक्टोबर...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंतप्रधानांकडून बाबासाहेबांना अभिवादन!

आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देत त्यांना अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या निमित्ताने देशभरात सामाजिक न्याय, समानता आणि संविधान मूल्यांची पुन्हा एकदा जागरूकता निर्माण होताना दिसली. पंतप्रधानांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करत “राष्ट्रनिर्मितीसाठी बाबासाहेबांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही राष्ट्रहिताचे कार्य अधिकजोमाने करत राहू,” असे सांगितले. त्यांच्या...

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे आक्रमक; संतोष जुवेकरही आंदोलनात सहभागी — नाशिकमध्ये घोषणांनी दुमदुमला परिसर

नाशिकमध्ये तपोवन परिसरातील वृक्षतोडीच्या प्रस्तावाला आता प्रचंड विरोधाळ उठला असून, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना आज रस्त्यावर उतरली. “झाडे वाचवा, तपोवन वाचवा” अशा मजकुराचे फलक, बॅनर आणि पोस्टर हातात घेऊन झालेल्या या आंदोलनाने परिसराचा माहोल अक्षरशः तापवला. आजच्या आंदोलनात मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यासह प्रसिध्द अभिनेते संतोष जुवेकर प्रत्यक्ष हजर होते. कलाकार, पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते अशा मोठ्या...

कोरेगाव भिमा येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन दिन आयोजनाचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आढावा

पुणे : कोरेगाव भिमा येथे विजयस्तंभास अभिवादनाकरिता येणाऱ्या अनुयायांसाठी प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षीही योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या  बैठकीत दिले. यावेळी बार्टीचे महासंचालक श्री. सुनील वारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप गिल्ल, पोलीस सह आयुक्त सोमय मुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती  ज्योती कदम, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे तसेच सार्वजनिक...

शेकडो दिव्यांग बांधवांनी घेतली मतदानाची शपथ आणि १००% मतदान करण्याचा केला निर्धार…

पिंपरी : “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून,याद्वारे प्रतिज्ञा करतो की,आम्ही आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती आणि शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता, किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू,” अशी शपथ दिव्यांग बांधवांनी अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप व्यवस्थापन प्रमुख तृप्ती सांडभोर यांच्या उपस्थितीत घेऊन येत्या महानगरपालिका निवडणुकीत १०० टक्के मतदान...

पाकिस्तानी ड्रामा ‘Meri Zindagi Hai Tu’ रिलीज होताच बवाळ; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, मोठा वाद पेटला

पाकिस्तानात नुकताच प्रदर्शित झालेला लोकप्रिय ड्रामा ‘Meri Zindagi Hai Tu’ सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. रिलीज होताच या ड्रामाने सोशल मीडियावर आणि धार्मिक संघटनांमध्ये मोठा वाद निर्माण केला आहे. कथानकातील काही प्रसंग धार्मिक भावना दुखावणारे असल्याचा आरोप करत विरोधकांनी शोवर टीकेचा झंझावात सुरू केला आहे. ड्रामाच्या ट्रेलरपासूनच वादाची चिन्हे दिसू लागली होती; मात्र पूर्ण एपिसोड प्रसारित झाल्यावर टीकेची लाट...

“‘कोणताही धर्म शांतता भंग करण्याची शिकवण देत नाही’ — सामाजिक सौहार्दावर दिला महत्वाचा संदेश”

देशात धर्म, समाज आणि सांस्कृतिक विविधता हा अभिमानाचा विषय मानला जातो. अशा पार्श्वभूमीवर एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात “कोणताही धर्म शांती भंग करण्याची शिकवण देत नाही” हा संदेश देत समाजात एकोपा, प्रेम आणि परस्पर आदराची गरज अधोरेखित करण्यात आली. वक्त्यांनी यावेळी अनेक उदाहरणे देत सांगितले की प्रत्येक धर्म माणसाला मानवतेची, करुणेची आणि शांततेची वाटचाल करण्याचा मार्ग दाखवतो. कार्यक्रमात अनेक समाजघटक, धार्मिक संस्था,...

लेकीच्या लग्नात शिवेंद्रसिंहराजेंचा हृदयस्पर्शी निर्णय; ओल्या दुष्काळग्रस्तांसाठी 10 लाखांचा निधी, सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण

सातारा – आनंद, उत्साह आणि शुभेच्छांनी भरलेल्या भव्य लग्नसोहळ्यातही समाजातील अडचणीत असणाऱ्या लोकांची आठवण ठेवत सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अनोखी सामाजिक जबाबदारी पार पाडली. त्यांच्या या निर्णयाने उपस्थित मान्यवरांसह सर्व सामान्य नागरिकांचीही मने जिंकली आहेत. साताऱ्यातील शेंद्रे येथे राजकुमारी ऋणालीराजे भोसले आणि रविराज देशमुख यांचा विवाहसोहळा अतिशय मंगल वातावरणात पार पडला. राज्यातील अनेक मंत्री, माजी...

Copyright ©