महाराष्ट्र
लोणावळा घरफोडी प्रकरणातील मोठा खुलासा! ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत; चार आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार अटकेत
लोणावळा – पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरात घरफोडी प्रकरणाचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश करत तब्बल ३० लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत चार आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींची नावे अशी – 🔹 चंद्रकांत अनंत माने उर्फ चंदू (३२, रा. चाफेकरनगर, चिंचवड गाव)🔹 धनंजय हरीष काळे (२०, रा. भारतनगर झोपडपट्टी)🔹...
खाजगी कंत्राटी PMPML बसेसचा अपघाती ‘ट्रॅक रेकॉर्ड’ धोक्याचा; ३९ महिन्यांत ३८५ पैकी २३७ अपघात कंत्राटी बसांमुळे!
पुणे – पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि PMRDA अंतर्गत ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतुकीचा कणा मानल्या जाणाऱ्या PMPML बस सेवेमध्ये अपघातांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून, विशेषत: खाजगी कंत्राटदारांकडून चालवल्या जाणाऱ्या बससेवांमुळे नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. PMPML च्या अधिकृत आकडेवारीनुसार एप्रिल २०२२ ते १० जून २०२५ या ३९ महिन्यांच्या कालावधीत एकूण ३८५ बस अपघात घडले असून, त्यातील २३७ अपघात...
“एक पृथ्वी, एक आरोग्य” या संकल्पनेतून भक्ती आणि योगाचा संगम! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यात ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रम भव्य उत्साहात संपन्न
पुणे | २१ जून २०२५ | सकाळी ७.३० वा. – जागतिक योग दिनाच्या निमित्ताने पुण्यात आज 'वारकरी भक्तीयोग' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या आध्यात्मिक आणि आरोग्यदायी उपक्रमात हजारो वारकऱ्यांनी योगासने करत 'हरिपाठ' आणि नामस्मरणाने वातावरण भक्तिरसात न्हालं. योग आणि वारीचा संगम – आरोग्य आणि अध्यात्माचं शक्तिशाली साधन मुख्यमंत्री...
मुंबईत MACCIA मुख्यालयाच्या नूतनीकरणाचा भव्य सोहळा; केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन, मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई – महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार आणि आर्थिक क्षेत्राला चालना देणाऱ्या MACCIA (Maharashtra Chamber of Commerce, Industry and Agriculture) या संस्थेच्या नूतनीकृत मुख्यालयाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या भव्य सोहळ्याला उद्योगजगतातील अनेक मान्यवर उपस्थित होते. MACCIA अध्यक्ष ललित गांधी यांचा गौरव या कार्यक्रमात MACCIA चे अध्यक्ष ललित गांधी यांना त्यांच्या...
नवी मुंबई फसवणूक प्रकरण! खारघरमधील ८२ वर्षीय आजीबुवांची तब्बल ४५ लाखांची फसवणूक; जुन्या नाण्यांची देवाणघेवाण आणि बनावट लॉटरीच्या आमिषाने उचापत
खारघर (नवी मुंबई) – सेक्टर २० मधील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांची तब्बल ₹४५ लाखांची फसवणूक दोन स्वतंत्र प्रकारांमध्ये झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुन्या नाण्यांच्या बदल्याच्या नावाखाली आणि बनावट लॉटरीचं आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी खरघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली फसवणूक – जुनी नाणी आणि पाच रुपयांच्या नोटांवर करोडोंचे आमिष! नोव्हेंबर २०२३...
पालखी सोहळ्यासाठी पुणे पोलिसांचा अभिनव उपक्रम! ‘लाईव्ह ट्रॅकिंग वेबसाइट’ सुरु; वाहतुकीसह रस्ता बंदीबाबत रिअल टाइम अपडेट्स
पुणे – वारीची परंपरा, श्रद्धा आणि भक्तीच्या महामार्गावर निघालेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांनी एक विशेष वेबसाईट लॉन्च केली आहे. या वेबसाईटद्वारे नागरिकांना रिअल टाइममध्ये पालखीचा सध्याचा मार्ग, वाहतूक परिस्थिती, रस्ते बंदी आणि डायव्हर्जन्सची माहिती सहज मिळणार आहे. पालखी सोहळा आणि वाहतूक नियंत्रण – एकत्रित प्रयत्न पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “वारी दरम्यान वारकऱ्यांच्या...
एअर इंडिया विमान अपघातानंतर कडक पावले; पुणे-दिल्लीसह ९ फ्लाईट्स रद्द, बर्ड-हिटमुळे एक विमान थांबवले
मुंबई/दिल्ली – एअर इंडिया कंपनीने मोठा निर्णय घेत सुरक्षिततेच्या दृष्टीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा एकूण ९ फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. यामध्ये पुणे-दिल्ली दरम्यानची AI2470 फ्लाईट पक्षी धडकेनंतर ग्राउंड करण्यात आली आहे. तसेच, अहमदाबाद-लंडन AI171 विमान अपघातानंतर कंपनीकडून Boeing 787 Dreamliner विमाने तपासणीसाठी थांबवण्यात येत आहेत. AI2470: पक्षी धडकेनंतर तपासणीसाठी थांबवले विमान दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या AI2470 फ्लाईटला पक्षी धडकला. पुण्यात सुरक्षित लँडिंग...
मुंबईसाठी दिलासा! मुसळधार पावसामुळे तलावांच्या जलसाठ्यात वाढ; साठा २५.१७ टक्क्यांवर
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा वाढून २५.१७ टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने दिली आहे. शहराच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात कमी झाली असली, तरी अजूनही समाधानकारक साठा होण्यासाठी पुढील काही दिवस पावसाची गरज भासत आहे. सध्या तलावांमध्ये किती पाणीसाठा आहे?BMC च्या २० जून रोजीच्या अहवालानुसार, ३,६४,२३३ मिलियन...
पुण्यात मुसळधार पावसाचा कहर! रस्ते जलमय, वाहतूक ठप्प, नागरिक त्रस्त…
पुणे – गुरुवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे पुणे शहरात अनेक भाग जलमय झाले असून, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे, तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. भारत हवामान विभागानुसार, १९ जून रोजी सकाळी १२ ते संध्याकाळी...
केदारनाथ यात्रेत ‘काली फिल्म’चा रौब नकोच! नियमभंग करणाऱ्यांवर चालानाची कठोर कारवाई
केदारनाथ | उत्तराखंड :- "श्रद्धास्थान म्हणजे केवळ पर्यटनाचा भाग नसून एक पवित्र भावना असते," असं सांगत केदारनाथ प्रशासनाने पुन्हा एकदा तीव्र शब्दांत वाहनधारकांना सुनावलं आहे. काही प्रवासी ‘रौब’ दाखवण्यासाठी वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावून आस्थेच्या यात्रेला गालबोट लावत असल्याचं लक्षात आलं आहे. "काली फिल्म" उतरवू – चालानाची फिल्म लावू! प्रशासनाने दिलेला इशारा स्पष्ट आहे :🔹 “रौब वाढवण्यासाठी नव्हे, तर श्रद्धा वाढवण्यासाठी...




