जोधपूर, राजस्थान — आज जोधपूरमध्ये ‘संविधान बचावो रॅली’च्या निमित्ताने काँग्रेसने पुन्हा एकदा केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या रॅलीला माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेते टीकाराम जूली आणि अनेक काँग्रेस नेत्यांनी संबोधित केले.
माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “RSS आणि BJP चे अनेक नेते सातत्याने संविधानविरोधी विधानं करत आहेत. ही लोकशाहीच्या आत्म्यावर सरळसरळ आघात करण्यासारखी बाब आहे.” त्यांनी सांगितले की, “या लोकांना समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि आरक्षणाची रचना मान्य नाही. ते या मूल्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.”
नेता प्रतिपक्ष टीकाराम जूली यांनीही भाजपवर टीका करताना म्हटले, “जर आपण चुप राहिलो तर संविधान धोक्यात येईल. देशातील सर्व नागरिकांनी उठून उभे राहिले पाहिजे आणि या संविधान विरोधी शक्तींना रोखले पाहिजे.”
या रॅलीला हजारो नागरिकांनी आणि युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संविधानाचे रक्षण करण्यासाठी जनतेत मोठा उत्साह पाहायला मिळाला. रॅलीदरम्यान संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले, आणि ‘संविधान जिंदाबाद’, ‘लोकशाही अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या.
काँग्रेसने दिलेला संदेश: भारतीय संविधान ही देशाची आत्मा आहे. जाती, धर्म, वर्ग, भाषा या सर्व भेदांपलीकडे जाऊन समानतेचा अधिकार देणाऱ्या संविधानाला कोणीही हात लावण्याचा प्रयत्न करेल तर जनतेचा जोरदार प्रतिकार होईल.