0
0
0
0
0

महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 231

“८०० वर्षे जुना महिम किल्ला पुन्हा उजाळणार! अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुनर्स्थापना कामाला अखेर हिरवा कंदील”

मुंबई – अनेक वर्षे रखडलेल्या आणि महापालिका निवडणुकांमुळे नव्याने गती मिळालेल्या महिम किल्ल्याच्या पुनर्स्थापना कामाला अखेर सुरुवात होणार आहे. मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरील हा ऐतिहासिक वारसा वर्षानुवर्षे दुर्लक्ष, अतिक्रमण आणि समुद्री क्षरणामुळे धोक्यात आला होता. आता मात्र महापालिका प्रशासनाने ढिगारा, दगड आणि समुद्रकिनारी साचलेली अडथळे हटवून सुरू होणाऱ्या या कामामुळे किल्ल्याला नवे जीवन मिळणार आहे. 🔹 पुनर्स्थापनेची प्रक्रिया सुरू — VJTI...

पुण्यातील थंडी कायम राहणार; नववर्षात आणखी गारठा वाढण्याचा इशारा – हवामान विभाग

पुणे | प्रतिनिधी — गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि राज्यात जाणवणारी थंडी पुढील काही दिवस कायम राहणार असून, नववर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात गारठा आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. त्यामुळे यंदाचा हिवाळा अधिक काळ टिकणार असून, पुणेकरांना सुखद पण बोचरी थंडी अनुभवायला मिळणार आहे. उत्तरेकडून वाहणारे थंड वारे, स्वच्छ आकाश आणि कोरडे हवामान यामुळे...

मतदार जनजागृती गल्ली, बोळात; विकास पोहचेल तळागळात – महापालिकेची मतदार जनजागृती मोहीम जोमात

शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत येणाऱ्या परिसरात, चौकात, गल्ली, बोळ, चाळ,  झोपडपट्टी, सोसायटी, कार्यालये आदी ठिकाणी जाऊन महापालिकेच्या यंत्रणेद्वारे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.  सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीत मतदानाचे अधिकार बजावण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात करण्यात येत असून महापलिकेच्या आवाहनाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी,...

एक वर्ष जुनी बोलेरो पिकअप चोरी उघडकीस! वाघोली पोलिसांच्या सतर्क कारवाईत सराईत आरोपी जेरबंद

पुणे शहरातील वाघोली पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रतिबंधक पथकाने एक मोठी कामगिरी करत लोणावळा परिसरातून एक वर्षापूर्वी चोरीस गेलेल्या बोलेरो पिकअप टेम्पोचा छडा लावला आहे. या कारवाईत रामनगर, वारजे माळवाडी येथील रहिवासी सुनिल आण्णा कांबळे (वय ४०) या सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे. घटना घडली कशी? दि. १९ जून २०२५ रोजी, वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे यांच्या...

पावसाच्या आगमनाने उघड झाली बीएमसीची अपयशी तयारी, हिंदमाता ते कुर्ला – सगळीकडे जलमय स्थिती

मुंबई | प्रतिनिधी :- मुंबईत मान्सूनने यंदा 26 मे रोजीच दमदार हजेरी लावली, मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अद्याप अपूर्ण असलेल्या पावसापूर्व तयारीमुळे शहर पुन्हा एकदा पाण्याखाली गेलं आहे. हिंदमाता, गांधी मार्केट, कुर्ला, चेंबूर, गोवंडीसह अनेक जुन्या व नव्या जलभरतीच्या ठिकाणी पाणी साचले असून, मेट्रो रेल्वेच्या एक्वा लाईनवरील काही स्थानकांसुद्धा जलमय झाली आहेत. अर्धवट तयारीमुळे मुंबईची मान्सून परीक्षेत पुन्हा नापासबीएमसीने अद्याप...

मानवतेचा आदर्श ठरलेली जान्हवी! मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹2.50 लाखांची देणगी

मुंबई : सामाजिक भान आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी याचे उत्तम उदाहरण ठरवत जान्हवी सुधाकर यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी ₹2.50 लाखांचा धनादेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. मुंबईत आयोजित छोटेखानी समारंभात ही देणगी प्रदान करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जान्हवी यांचे मन:पूर्वक आभार मानत त्यांच्या या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. "संकटकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधी गरजूंना दिलासा देतो. अशा...

पुणे सज्ज ‘तिरंगा यात्रे’साठी! ऑपरेशन सिंदूरच्या यशावर देशभक्तीचा जल्लोष; लष्कराच्या शौर्याला सलाम करण्यासाठी पुणेकरांचा एकत्रित उत्सव

पुणे | भारतीय लष्कराच्या अलीकडील ‘ऑपरेशन सिंदूर’ या अतिशय धाडसी व यशस्वी कारवाईमुळे देशभरात राष्ट्रभक्तीची लाट उसळली आहे. याच ऐतिहासिक मोहिमेला सलाम करण्यासाठी पुणे शहरात एक भव्य आणि अभिमानास्पद ‘तिरंगा यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. तिरंगा यात्रेची माहिती 📅 रविवार, १८ मे २०२५🕓 सायंकाळी ४:०० वाजता📍 छत्रपती संभाजी महाराज स्मारक, डेक्कन ते संत ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे  आयोजकांचे आवाहन...

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ : पहिला आठवडा, सहावा दिवस; विधानभवनात कामकाजाला गती

मुंबई | २८ फेब्रुवारी २०२६ : महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला आठवडा आज सहाव्या दिवशी पूर्ण झाला. Vidhan Bhavan Mumbai येथे विविध शासकीय विषयांवर चर्चा, प्रश्नोत्तरांचा तास आणि लक्षवेधी सूचनांद्वारे कामकाजाला वेग आला. आजच्या दिवशी राज्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदींवर सदस्यांनी सविस्तर मते मांडली. शेती, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण विकास या विषयांवर सखोल चर्चा झाली. विरोधी पक्षांनी काही...

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवार यांना अखेरचा निरोप; बारामतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती

बारामती | प्रतिनिधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आज बारामती, पुणे येथे देशपातळीवरील राजकीय नेतृत्व उपस्थित राहिले. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. नितीन नबीन यांनी बारामतीत दाखल होत दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यातील विविध मंत्री, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि हजारो नागरिक उपस्थित होते....

माता रमाबाई नगरमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; जीर्ण पाईपलाईन तातडीने बदलण्याची मागणी

मुंबई :भांडुप पूर्व येथील प्रभाग क्रमांक ११४ मधील माता रमाबाई नगर परिसरात पिण्याच्या पाण्यात दूषित घटक मिसळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नळातून येणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येत असून पाण्याचा रंगही गढूळ दिसत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली...

Copyright ©