महाराष्ट्र
महाराष्ट्रातील रस्त्यांची दुरावस्था; जनतेचा संताप उफाळला – “विकासाच्या गप्पा आणि रस्त्यांवरील खड्डे!”
महाराष्ट्रात सध्या सर्वत्र रस्त्यांची दुरवस्था झालेली दिसून येते. शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत खड्ड्यांनी भरलेले रस्ते हे जनतेच्या दैनंदिन जीवनातील मोठं संकट बनले आहेत. वाहतूक कोंडी, अपघात, आणि जीवितहानी या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, या परिस्थितीसाठी केंद्र आणि राज्य सरकारमधील प्रमुख नेते जबाबदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील...
मुंबईत भीषण अपघात : फूड डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाचा BEST बसखाली येऊन मृत्यू
मुंबई : मुंबईच्या प्रभादेवी परिसरात शनिवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय सार्थक जंगम या युवकाचा BEST बसखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अप्पासाहेब मराठे रोडवर ही दुर्घटना घडली. सार्थक जंगम, वय २१, वांद्रे (पश्चिम) येथील सहकारी भंडार येथे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. अपघाताच्या वेळी तो एका डिलिव्हरी कॉलवर जात असताना दुर्दैवीरित्या...
स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करण्याची गरज – राज्यपाल
पुणे : निसर्गोपचार, आयुर्वेद, आपली पूर्वीची जीवनशैली, नैसर्गिक शेती तसेच आपल्या जीवनमूल्यांना पुन्हा अवलंबल्यास स्वस्थ भारत बनवू शकू, असा विश्वास राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केला. या कामात निसर्गोपचार वैद्यक व्यवसायी, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतील, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणे अंतर्गत येवलेवाडीतील निसर्गग्राम येथे आयोजित आठव्या निसर्गोपचार दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय आयुष राज्यमंत्री...
सिंहगड रोड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी! गहाळ झालेले २० मोबाईल शोधून नागरिकांना परत — तांत्रिक विश्लेषणाचा उत्कृष्ट वापर
पुणे — तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल हरवणे ही मोठी समस्या ठरली असताना, सिंहगड रोड पोलीस स्टेशनने पुन्हा एकदा नागरिकांना दिलासा देणारी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. एकूण २० गहाळ मोबाईल शोधून संबंधित नागरिकांना परत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. गहाळ मोबाईलची नोंद अनेक नागरिकांनी ‘LOST AND FOUND’ या शासकीय वेबसाईटवर तसेच CIER पोर्टलवर करून सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या...
मोशीतील लक्ष्मी चौकात भीषण आग लागली; लाखो रुपयांचे नुकसान
मोशी : पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथील लक्ष्मी चौकात रविवारी सायंकाळी मोठी आग लागली. यामध्ये सुमारे दहा दुकानांचे अक्षरशः खून झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे व्यापारी वर्गासोबतच स्थानिक नागरिकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे. अग्निशमन विभागाच्या सूत्रांनुसार, लक्ष्मी चौकातील दुकाने एकाच पत्र्याच्या शेडखाली उभारली गेली होती. रविवारी सायंकाळी...
पोलीस अधिकाऱ्यांच्या उज्वल कार्याचा गौरव!
पुणे | प्रतिनिधी:- पोलीस दलातील उत्कृष्ठ तपास कौशल्य, निष्कलंक सेवा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची दखल घेत केंद्रीय गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदकांचे वितरण समारंभ यंदा दि. १३ जून २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता पोलीस संशोधन केंद्र, पाषाण, पुणे (सी.पी.आर.) येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मा. पोलीस...
शिवचरित्रातून यशाचा मंत्र; पिंपरी-चिंचवडमध्ये डॉ. विजय महाराज तनपुरे यांचे प्रेरणादायी व्याख्यान
पिंपरी, दि. २० फेब्रुवारी २०२६ (माहिती व जनसंपर्क विभाग):“शिव चरित्र म्हणजे समृद्ध, स्वाभिमानी आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची खरी गुरुकिल्ली आहे,” असे प्रभावी प्रतिपादन सुप्रसिद्ध शिवशाहीर Vijay Maharaj Tanpure यांनी केले. Pimpri-Chinchwad महानगरपालिकेच्या वतीने डांगे चौक, चिंचवड येथे गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधक पर्व २०२६’ अंतर्गत ‘यशाचा नवा मंत्र – शिवतंत्र’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते...
मोठा घोटाळा टळला! महाराष्ट्र PWD विभागाच्या खात्यातून 111 कोटींचा फ्रॉड करण्याचा प्रयत्न उधळला
महाराष्ट्रात पुन्हा एकदा सरकारी खात्यावर मोठ्या आर्थिक घोटाळ्याची सावली दाटलेली असताना, सतर्क अधिकाऱ्यांनी वेळेवर कारवाई करून तब्बल 111 कोटी रुपयांचा मेगा फ्रॉड थांबवण्यात यश मिळवले आहे. ही कारवाई केवळ आर्थिक नुकसान टाळणारी नाही तर राज्यातील सायबर सुरक्षेच्या धोक्यांवर मोठा प्रकाश टाकणारी ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही अज्ञात सायबर गुन्हेगारांनी महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकृत खात्यात हॅक करून मोठी रक्कम...
वयाच्या ३० व्या वर्षी कुमार महाराष्ट्र केसरी विक्रम पारखी यांचे निधन; लग्नाआधीच हृदयविकाराच्या झटक्याने मुषी गावात शोककळा.
सविस्तर बातमी: अतिशय दुर्दैवी घटना: मावळ तालुक्यातील मुषी येथील सुप्रसिद्ध कुस्तीपटू विक्रम पारखी यांचे बुधवारी वयाच्या ३० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नियमित व्यायामादरम्यान हा अनपेक्षित प्रकार घडला. अचानक हृदयविकाराचा झटका: १२ डिसेंबर रोजी व्यायाम करताना विक्रम यांना अचानक त्रास होऊ लागला. तातडीने त्यांना पिंपरी-चिंचवड येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. विक्रम पारखी: कुस्तीचे...
“पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले; सीआयएसएफच्या मनुष्यबळाला मंजुरी”
नवी दिल्ली/पुणे, २९/०६/२०२४: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने बांधलेले टर्मिनल लवकरच पुणेकरांसाठी खुले होणार असून, टर्मिनलच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारे सीआयएसएफचे मनुष्यबळ गृहविभागाकडून मंजूर करण्यात आले आहे. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांचे हे फलित असून, मनुष्यबळाच्या मंजुरीसाठी मोहोळ यांनी नुकतीच गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. पुणे विमानतळावरून होणाऱ्या उड्डाणांच्या गरजेला प्रतिसाद देण्यासाठी मोदी...








