महाराष्ट्र
मुंबईकरांसाठी कायमचा धोक्याचा इशारा! मिठी नदीचा रौद्र इतिहास आणि घोटाळ्यांची काळी छाया
मुंबई : मान्सून म्हणजे मुंबईकरांसाठी नेहमीच कसोटीचा काळ. रस्त्यांवरील पाणी, ठप्प झालेली लोकल सेवा आणि तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकलेले प्रवासी हा दरवर्षीचा चित्रपट जणू नित्याचा झाला आहे. याच काळात मुंबईकरांना सर्वाधिक भीती वाटते ती मिठी नदीची. तिचे नाव गोड असले तरी इतिहास मात्र वेगळाच सांगतो. सतत वाढणारा जलस्तर आणि स्थलांतरित नागरिक सध्या मिठी नदीचा जलस्तर 3.9 मीटरपर्यंत पोहोचला आहे. कुर्ला, सायन, चुनाभट्टीसह...
पुणे पोलिसांची कारवाई: १४ लाख रुपयांचे मेफेड्रोन, पिस्तूल जप्त; दोघांना अटक.
पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने (युनिट २) आणि खंडणीविरोधी पथकाने (युनिट २) संयुक्त कारवाईत मोठा गुन्हा रोखत दोन कुख्यात आरोपींना अटक केली. या कारवाईत ₹१४.६ लाख रुपयांचे मेफेड्रोन (एमडी), एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गुन्ह्याची माहिती व आरोपींची ओळख: अटक करण्यात आलेले आरोपी आहेत: बॉबी भगवान सुरवसे (२८) - गजराज...
पुणे पोलिसांची मोठी कामगिरी: कुख्यात वाहन चोराला अटक, ₹10.77 लाख किमतीची चोरीची वाहने जप्त.
पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिसांनी मोठी यशस्वी कारवाई करत दोन कुख्यात वाहन चोरांना अटक केली आहे. आरोपींमध्ये अभिषेक शरद पवार (वय ३६) आणि सुजीत दत्तात्रय कुंभार (वय ३६) यांचा समावेश आहे. हे दोघे पुण्यातील विविध भागांतून वाहन चोरी करून सगळीकडे दहशत निर्माण करत होते. पोलिसांनी त्यांच्या कडून २ चार-चाकी आणि ५ दुचाकी वाहनं जप्त केली असून, या वाहनांची एकूण किंमत ₹10.77...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ‘संकल्प पत्र’ जाहीर; शेतकरी कर्जमाफीपासून २५ लाख रोजगार निर्मितीपर्यंत, महाराष्ट्राच्या विकासाचे २५ आश्वासन.
मुंबई, १० नोव्हेंबर २०२४ – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे ‘संकल्प पत्र’ मुंबईत जाहीर केले आहे. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि इतर भाजप नेते उपस्थित होते. शहा यांनी सांगितले की, या संकल्प पत्रात महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षांचा विचार करून आश्वासने दिली...
आमदार सुनील शेळके यांच्या लोणावळा जनसंवाद दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद! प्रभागनिहाय पाहणी, समस्यांचे निराकरणासाठी पुढाकार
लोणावळा: मावळ तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी व्यापक जनसंवाद दौऱ्याची सुरुवात केली आहे. या दौऱ्याला लोणावळा शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य देणाऱ्या लोणावळा शहरातून या दौऱ्याचा शुभारंभ करण्यात आला. वलवन गावातील महादेव मंदिरासमोर नागरिकांकडून समस्या घेण्यास सुरुवात करत आमदार सुनील शेळके यांनी वलवन गाव, समता नगर, वलवन तलाव या परिसराचा प्रभागनिहाय...
पनवेलकरांना दिलासा! महापालिकेकडून ‘अभय योजना’ जाहीर – करदात्यांना ९०% पर्यंत शास्तीमाफीचा लाभ
पनवेल महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पनवेल महापालिकेने मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांसाठी "अभय योजना" जाहीर केली असून, या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना २५ ते ९० टक्क्यांपर्यंत शास्तीमाफी (दंडमाफी) दिली जाणार आहे. ही योजना चार टप्प्यांत राबवली जाणार असून, १८ जुलै ते १५ ऑगस्ट २०२५ या पहिल्या टप्प्यात कर भरल्यास नागरिकांना थकबाकीवरील शास्तीवर ९०% सूट मिळणार...
पुण्यात उंद्री रस्त्यावर भीषण अपघात टळला; महिला आणि लहान मूल थोडक्यात बचावले, रहिवाशांनी PMC कडे तातडीच्या कारवाईची मागणी
उंद्री (पुणे) – उंद्रीतील नायटी इस्टेट ते कंट्री क्लब दरम्यान मंगळवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेत एक महिला आणि तिचे लहान मूल थोडक्यात जीव वाचवून बचावले. पाण्याचा टँकर जोरात धडक दिल्याने त्यांचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावर पडली. काही सेंकदांचाच फरक होता, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. या घटनेमुळे पुन्हा एकदा उंद्री परिसरातील बेकायदेशीर बांधकामं, रस्त्यांवरील अतिक्रमणं आणि बिनधास्त...
स्व. हशु अडवाणी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती!
चेंबूर, २६ फेब्रुवारी २०२५: स्व. हशु अडवाणी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात त्यांनी हशु अडवाणी यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाचा गौरव करत त्यांची प्रेरणादायी वाटचाल नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सामाजिक कार्यात हशु अडवाणी यांचा महत्त्वाचा वाटा! ▪️ स्व. हशु अडवाणी हे समाजसेवेचे द्रष्टे नेते होते, त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक...
पुण्यात हृदयद्रावक घटना : १३ वर्षीय रोहन बॉंबेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; वन विभागाची व्यापक शोधमोहीम सुरु
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळखेड (आंबेवाडी) गावात रविवारी दुपारी घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलगा रोहन विलास बॉंबे (वय १३ वर्षे) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी साधारण ३.४५ वाजता ही घटना घडली असून, या घटनेने परिसरात भीतीचं आणि शोकाचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रोहन हा शेताच्या परिसरात खेळत असताना झुडपातून अचानक बिबट्याने झडप घालून त्याच्यावर हल्ला केला. जवळच्या...
गणेशोत्सव यंदा राज्योत्सवाच्या थाटामध्ये – महाराष्ट्र सज्ज, ११ कोटींचा निधी मंजूर
|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया || महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक असलेला, भक्तिभाव आणि उत्साहाचा संगम असलेला गणेशोत्सव यंदा अधिक भव्यतेनं आणि अभिमानानं राज्य उत्सवाच्या रूपात साजरा होणार आहे. राज्य सरकारनं तब्बल ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या उत्सवाची तयारी अधिक दिमाखदार करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळं आणि घरगुती आरास स्पर्धा, आकर्षक ड्रोन शो, रोषणाईची सजावट, तसेच विविध सांस्कृतिक...











