नवी मुंबईसाठी दिलासादायक ठरणारी ऐतिहासिक कामगिरी! हेटवणे पाणीपुरवठा योजनेत CIDCO चा पहिलाच टनेल ब्रेकथ्रू लवकरच
मुंबई | प्रतिनिधी — सिडको (CIDCO) हद्दीतील भागांना भेडसावणारी दीर्घकाळाची पाणीटंचाई लवकरच इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. हेटवणे पाणीपुरवठा वाढ योजनेचे काम वेगाने प्रगतीपथावर असून, पुढील आठवड्यात CIDCO आपल्या सर्व प्रकल्पांमधील पहिल्या-वहिल्या ‘टनल ब्रेकथ्रू’ची नोंद करणार आहे. हा क्षण सिडकोच्या पायाभूत सुविधा विकासातील एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. ही महत्त्वाकांक्षी योजना नवी मुंबई आणि आजूबाजूच्या झपाट्याने वाढणाऱ्या नागरी, औद्योगिक आणि...
नवी मुंबईचा अभिमान, स्वप्नांचा नवा केंद्रबिंदू! ‘आता संपूर्ण मुंबई नवी मुंबईकडे येणार’ – सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया
नवी मुंबई | प्रतिनिधी — “Congratulations all Navi Mumbaikars. अख्खी मुंबई आता तुमच्याकडे येणार आहे…” अशा शब्दांत नवी मुंबईकरांनी सोशल मीडियावर आनंद, अभिमान आणि आत्मविश्वास व्यक्त केला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रारंभानंतर नवी मुंबईचे महत्त्व केवळ वाढले नसून, तिची ओळखच बदलून गेली आहे. एकेकाळी पश्चिम आणि मध्य उपनगरांतील (तर दक्षिण मुंबईचा उल्लेख न करताच) काही लोकांकडून नवी मुंबईकडे दुर्लक्ष...
विमानतळ प्रकल्पबाधित गावातील प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 24 : पुण्यात अनेक उद्योग येण्यास इच्छुक असून त्यासाठी पुरंदर विमानतळ महत्त्वाचे ठरणार आहे. या विमानतळामुळे पुणे व परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन मिळेल. हे केवळ प्रवासी विमानतळ नसून कार्गो विमानतळही असल्याने नाशवंत मालाच्या व्यापारासाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुरंदर व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असून पुण्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) किमान दोन टक्क्यांची वाढ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रसार – राजदूत विशाल शर्मा
मुंबई, दि.20 : पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोमध्ये स्थापित करण्यात आल्याने या घटनेला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जगभरातील नागरिकांना डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची तसेच शिक्षण, मानवाधिकार आणि सामाजिक समतेच्या मूल्यांची ओळख करून देणे, हाच या उपक्रमाचा मुख्य...
महिला टी-20 क्रिकेटमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विश्वविजेत्या संघाचा गौरव
मुंबई | विशेष प्रतिनिधी भारताच्या दृष्टिबाधित महिला टी-20 क्रिकेट संघाने जागतिक पातळीवर अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कामगिरी करत विश्वविजेतेपद पटकावले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संघातील खेळाडूंचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ येथे झालेल्या या विशेष समारंभात देशाचा तिरंगा उंचावणाऱ्या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी खेळाडूंना संबोधित करताना सांगितले की, दृष्टिबाधित महिला खेळाडूंनी...
वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना – पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती
मुंबई, दि. 20 : महाराष्ट्रात उत्पादित डाळिंबाचा हंगामातील पहिला कंटेनर मुंबईतील जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना करण्यात आला आहे. कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरून हा कंटेनर रवाना करण्यात आला असून राज्यातील फळनिर्यातीच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, अशी माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. अमेरिका - भारत कृषी-निर्यातविषयक घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर...
दुर्मीळ श्वसनमार्गातील हेमॅन्जिओमावर वेळेत उपचार; ८ महिन्यांच्या चिमुकलीला मिळाले नवे जीवन
मुंबई | १९ डिसेंबर – जन्मापासून श्वास घेण्यास त्रास सहन करणाऱ्या आठ महिन्यांच्या एका चिमुकलीला मुंबईतील नारायण हेल्थ SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये वेळेवर निदान व उपचारामुळे नवे आयुष्य मिळाले आहे. या बालिकेला अत्यंत दुर्मीळ आणि जीवघेण्या ठरू शकणाऱ्या ग्रेड-३ एअरवे हेमॅन्जिओमा या आजाराने ग्रासले होते. या आजारामुळे तिच्या श्वसनमार्गात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. परिणामी, तिला श्वास घेण्यास तीव्र अडचण,...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘भारतीय संस्कृतीचे पुरोधा राजा ऋषभ’ या ग्रंथाचे भव्य प्रकाशन
मुंबई – भारतीय संस्कृतीच्या समृद्ध परंपरेचा वेध घेणाऱ्या ‘भारतीय संस्कृतीचे पुरोधा राजा ऋषभ’ या महत्वपूर्ण ग्रंथाचे प्रकाशन आज मुंबई येथे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यिक, इतिहास अभ्यासक, धर्मगुरू तसेच मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते. या पुस्तकात भारतीय संस्कृतीचे आद्य प्रवर्तक मानले जाणारे राजा ऋषभदेव यांचे जीवन, तत्त्वज्ञान, समाजरचना आणि संस्कृती...
रेल्वे सुधारणा निर्णयामुळे मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासात मोठा बदल होणार
मुंबई – शहरातील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षितता आणि सुविधांवर लक्ष केंद्रित करत केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री मा.श्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले जात आहेत. या निर्णयांनुसार मुंबईतील लोकल तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे. प्रवाशांना अधिक सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी प्रवास मिळावा,...
‘करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया!’ – आदित्य ठाकरे यांचे मुंबईकरांना सादरीकरण; “मुंबई अदानीस्तान होऊ देऊ नका” असा थेट इशारा
मुंबई | मुंबई महानगरपालिकेत तब्बल २५ वर्षे सत्ताधारी राहून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मुंबईकरांना अभिमान वाटेल अशी भरीव आणि दूरदृष्टीपूर्ण विकासकामे केली असल्याचे ठामपणे मांडत ‘करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया!’ या संकल्पनेअंतर्गत भव्य सादरीकरण आज वरळी येथील एन.एस.सी.आय. डोम येथे पार पडले. हे सादरीकरण युवासेनाप्रमुख आणि शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी सादर केले. या कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या...




