Breaking News
देशभक्तीचा महायोद्धा हरपला – ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शोकसंदेश – 'भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अनमोल हिरा निखळला' मुंबई, 4 एप्रिल – भारतीय चित्रपटसृष्टीला राष्ट्रभक्तीची ओळख देणारे, "भारतकुमार" म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने हिंदी सिनेसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात सांगितले, "चित्रपटसृष्टीतून देशभक्ती आणि भारतीय संस्कृती जनमानसावर ठसवणाऱ्या...
हडपसर पोलिसांची मोठी कारवाई; दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ११ महागड्या गाड्या जप्त
पुणे – हडपसर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेने दुचाकी चोरीचे ११ गुन्हे उघडकीस आणत तीन सराईत आरोपी आणि दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये सुमारे १२ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यात बुलेट, ड्युक, एफझेड, स्प्लेंडर आणि अॅक्टीवा अशा एकूण ११ दुचाकींचा समावेश आहे. ही उल्लेखनीय कामगिरी मा. पोलिस उप आयुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार...
*जालना येथील अंतरवली गावात घडलेल्या वादग्रस्त अधीक्षक तुषार दोषी ह्यांची पुण्यातील झालेल्या बदली वर पुनःश्च बदली……*
राज्यातील मराठा आरक्षणाचा साठी आवाज उठवाणारे मनोज जरांगे पाटील उपोषणा करिता बसले असताना वादग्रस्त आयपीएस अधिकारी तुषार दोशी अंतरवाली सराटीमध्ये एक सप्टेंबरला ला आंदोलन कर्त्यांना पंगावण्यासाठी लाठीचार्ज झाला होता. तेव्हा तुषार दोषी हे जालन्याचे पोलिस अधीक्षक होते. त्यांच्यावर ह्या केलेल्या लाठीचार्ज साठी दोषी असल्याचे आरोप झाल्यानंतर तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच आय पी स...
मीरा-भाईंदरमधील मराठी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तातडीने बदली; प्रशासनाच्या भूमिकेवर उठले अनेक प्रश्न!
मीरा-भाईंदर परिसरात मराठी भाषेच्या प्रश्नावर मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समिती यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले आंदोलन चिघळल्यामुळे संपूर्ण परिसरात राजकीय खळबळ उडाली. या आंदोलनाला परवानगी नाकारण्याच्या निर्णयामुळे तणाव वाढला आणि मराठी जनतेमध्ये तीव्र रोष व्यक्त झाला. मंगळवारी (८ जुलै २०२५) रोजी नियोजित मोर्चाला पोलिसांकडून परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेल्या नागरिकांना, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलकांना अटक...
पुणेकरांसाठी मोठी बातमी! कात्रज चौकातील वाहतूक पूर्ववत सुरू – ६ जूनपासून सर्व मार्ग खुले
वाहतूक पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय; काम पूर्ण झाल्यानंतर कात्रज चौक पुन्हा सर्व वाहनांसाठी खुला पुणे – कात्रज चौकात सुरू असलेले सेगमेंटल लाँचिंगचे काम पूर्ण झाल्यामुळे, आता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी कात्रज चौक पुन्हा खुला करण्यात आला आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी यासंदर्भात अधिकृत प्रेसनोट प्रसिद्ध केली आहे. दि. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने कात्रज मुख्य...
मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण बैठक — जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डे यांचे स्पष्ट निर्देश
पुणे, मावळ तालुक्यातील विविध विकास कामांबाबत आज एक महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी मा. श्री. जितेंद्र दुड्डे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीत लोणावळा भांगरवाडी पुल, कृपावश नियुक्त्या, भाजी मार्केट, घरकुल योजना, मागासवर्गीय मुलींसाठी वसतिगृह, आदिवासी मुलांसाठी वसतिगृह, आणि अभ्यास प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कामे ठराविक वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश मा. जिल्हाधिकारी दुड्डे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांमध्ये...
कस्पटे कुटुंबाला पिस्तुल दाखवणाऱ्या निलेश चव्हाणचा अखेर शिनेमा संपला! नेपाळ बॉर्डरवरून अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांचे मोठे यश!
पिंपरी-चिंचवड – वैष्णवी मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुंबाला संरक्षण देणारा व कस्पटे कुटुंबाला धमकावणारा निलेश चव्हाण याला अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून अटक केली आहे. गेल्या 10 दिवसांपासून फरार असलेल्या निलेशच्या अटकेने प्रकरणात मोठा वळणबिंदू आला आहे. देशभरात शोधमोहीम, पोलिसांची सात पथकं सक्रिय! निलेश चव्हाण याला पकडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या चार आणि पुणे पोलिसांच्या तीन पथकांनी संयुक्तरीत्या देशभर शोधमोहीम राबवली. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान,...
मराठीचा अभिमान राखा, पण कायदा हातात घेऊ नका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्ट भूमिका!
मुंबई, 4 एप्रिल – मराठी भाषेच्या सन्मानाबाबत राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी बोलण्यास नकार देणाऱ्यांना थप्पड लागेल असे वक्तव्य केल्यानंतर यावर तीव्र चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'मराठीचा आग्रह योग्य, पण कायदा हातात घेणे अयोग्य' – फडणवीस यांची प्रतिक्रिया 🔹 "महाराष्ट्रात मराठी...
*भारताने पहिल्या टी -ट्वेंटी सामनात बेधडक कामागिरी केल्यामुळे दिलासादायक सुरवात……..*
विशाखापट्टणम येथे 23 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी ट्वेंटी सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव ह्याची बेधडक खेळी आणि त्याच्या सोबत मोलाचे योगदान देणारे ईशान किशन आणि रिंकू सिंग ह्यांनी साथ देत विजयाच्या वाटेत धावा करत निर्णायक योगदान दिले. ह्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत जॉश इंग्लिसने पन्नास चेंडूत एकशे दहा धावांची तडफदार खेळी करत भारता पुढे 208 धावांचे...
नवलाख उंबरातील बैलगाडी शर्यतीच्या शौकिनाची भीषण हत्या: अपहरण, खून, जळीतकांड; भाडेकरूला अटक, पोलीस शोध घेत आहेत सहकाऱ्याचा!
भीषण घटना: मावळ तालुक्यातील नवलाख उंबर येथील बैलगाडी शर्यतीच्या शौकिन, पंडित रामचंद्र जाधव (वय 52) यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. त्यांच्या 23 वर्षीय भाडेकरूने त्यांचा गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचे शरीर खेड तालुक्यातील वाहागाव येथे जाळले. घटनेचा तपशील: अपहरण: जाधव यांचे 14 नोव्हेंबर रोजी अपहरण झाले. खून: भाडेकरू सुरज वानखेडे व...















