शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर उभं शहर पुन्हा सुवर्णकाळाकडे; राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचारमुक्त विकासाचा निर्धार
पिंपरी-चिंचवड हे शहर शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर, जात-धर्माच्या पलीकडे जाऊन, धर्मनिरपेक्ष मूल्यांवर उभं राहिलं आहे. गेल्या २५ वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसवर एकही भ्रष्टाचाराचा ठोस आरोप सिद्ध झालेला नाही. उलट, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना (JNNURM) यांसारख्या महत्त्वाच्या योजनांतून हजारो कोटी रुपयांचा निधी शहरासाठी आणून पिंपरी-चिंचवडला आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेची ओळख मिळवून देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोलाचा वाटा आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक...
“घड्याळाचा गजर, विकासावर नजर!” – प्रभाग २५ (क) मधून राधिका कुलकर्णींचा निर्धार
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (क) – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई परिसरात विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याचा संकल्प घेऊन ॲड. राधिका उल्हास कुलकर्णी मैदानात उतरल्या आहेत.“सर्वांच्या विकासासाठी एक मत – राधिका साठी!” हा केवळ नारा नसून, सर्वसामान्यांच्या मनातील अपेक्षांचा आवाज बनत आहे. विश्वासाचं नातं जपणारा उमेदवार म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या राधिका कुलकर्णी यांनी प्रभागातील...
“आता थांबायची वेळ संपली आहे, बदल घडवण्याची वेळ आली आहे!” – अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांचे भावनिक आवाहन
प्रभाग क्रमांक २५ (क) मधील प्रचार सभेत अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत भावनिक आणि प्रेरणादायी भाषण केले. “आज मी तुमच्यासमोर केवळ उमेदवार म्हणून नाही, तर तुमची मुलगी, तुमची बहीण आणि तुमचा विश्वासू प्रतिनिधी म्हणून उभी आहे,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. स्वतःची ओळख करून देताना त्या म्हणाल्या, “मी आहे – अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी. एक...
कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धेचा, संकल्पाचा आणि अस्मितेचा जागता प्रतीक
सोमनाथ : “सोमनाथ स्वाभिमान पर्व हा कोट्यवधी भारतीयांच्या शाश्वत आस्था, साधना आणि अटूट संकल्पाचा जीवंत प्रतिबिंब आहे. पवित्र श्री सोमनाथ मंदिरात या महापर्वाचा सहभागी होणे हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय आणि अमूल्य क्षण आहे,” असे भावनिक शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या पावन प्रसंगी त्यांनी श्री सोमनाथ मंदिरात देशातील १४० कोटी नागरिकांच्या समृद्धी, शांतता आणि कल्याणासाठी...
मतदान जनजागृतीच्या ब्रँड ॲम्बेसिडर श्रेया बुगडे यांच्या उपस्थितीत दुर्गादेवी टेकडीच्या पायथ्याशी लोकशाहीचा जागर
पिंपरी, दि. १० जानेवारी २०२६ :- अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या माध्यमातून करण्यात येणारी मतदान जनजागृती… ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ अशा जोशपूर्ण घोषणांनी दुमदुमलेला परिसर… आणि लोकशाहीच्या जागृतीसाठी निघालेली शेकडो जणांची प्रभातफेरी…असे उत्साहपूर्ण वातावरण आज सकाळी निगडी येथील दुर्गादेवी टेकडीच्या पायथ्याशी निर्माण झाले होते. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि प्रत्येक मतदाराला मतदानाच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी...
“बटन घड्याळाचे, वेळ बदलण्याचे!” – प्रभाग २५ (क) मधून अॅड. राधिका उल्लास कुलकर्णी मैदानात; राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवणार
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (क) मध्ये राजकीय वातावरण तापले असून, अॅड. राधिका उल्लास कुलकर्णी या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अधिकृतपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह घेऊन त्या थेट मतदारांच्या दारात पोहोचत असून,“बटन घड्याळाचे – वेळ बदलण्याचे!”हा स्पष्ट आणि ठोस विकासाचा संदेश देत आहेत. मतदान दिनांक : १५ जानेवारी २०२६वेळ :...
वॉर्ड क्र. २०१ मध्ये शिवसेनेचा प्रचार शिगेला; रेखा मयुर कांबळे यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
आज वॉर्ड क्र. २०१ मधील शिवसेना उमेदवार रेखा मयुर कांबळे यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आणि मा. आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमामुळे संपूर्ण वॉर्डात राजकीय वातावरण तापले असून शिवसैनिकांमध्ये नवे चैतन्य संचारले आहे. उद्घाटनप्रसंगी परिसरातील शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी...
महानगरपालिका प्रशासनात AI क्रांती; लवकरच ‘डिजिटल गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म’ उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील महानगरपालिका प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिक-केंद्रित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म लवकरच उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या नव्या उपक्रमामुळे नागरी प्रशासनात डिजिटल परिवर्तनाची नवी दिशा मिळणार असून, नागरिकांना सेवा अधिक जलद आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, AI टूल्सच्या माध्यमातून तक्रार निवारण, मालमत्ता...




