संभाजीनगरात दुहेरी शोकांतिका! सासूच्या निधनानंतर काही मिनिटांत सूनेचाही मृत्यू — वेदांतनगर हादरले
छत्रपती संभाजीनगर शहरात मंगळवारी दुपारी घडलेली एक दुर्दैवी घटना सर्वांना हळहळवून गेली आहे. वेदांतनगर परिसरात सासूच्या निधनाची बातमी कळताच सुनेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. काही मिनिटांतच दोन पिढ्या हरवल्याने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. मृतांमध्ये रुक्मिणी रूपचंद परदेशी (वय 96) आणि त्यांची सून विजया परदेशी (वय 62) यांचा समावेश आहे. दोघीही विद्यापीठाचे माजी सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी यांच्या आई आणि...
पुण्याजवळ देशातील पहिलं ‘ADAS टेस्ट सिटी’ उद्घाटित; भारतीय वाहन सुरक्षा क्षेत्राला मोठी गती
पुणे – भारताच्या वाहन सुरक्षा क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला आहे. देशातील पहिलं स्वतंत्र ‘Advanced Driver Assistance Systems (ADAS) टेस्ट सिटी’ पुण्याजवळील तळेगाव-ताके येथे अधिकृतरीत्या उद्घाटित करण्यात आलं. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) यांच्या पुढाकाराने उभारलेलं हे अत्याधुनिक केंद्र ३ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत औपचारिकरीत्या जाहीर करण्यात आलं. ही टेस्ट सिटी तब्बल २० एकरांवर पसरलेली असून, भारतीय...
पुणे जिल्ह्यातील नद्यांचे प्रदूषण नियंत्रणासाठी मोठे पाऊल; नवे प्रकल्प राबवणार, स्वच्छतेसह विकासकामांनाही गती
पुणे : जिल्ह्यातील प्रमुख नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाने निर्णायक पावले उचलली आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त बैठकीत नद्यांच्या पाण्यावर प्रक्रिया करून स्वच्छतेकडे वाटचाल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज्य सहकारमंत्री मुरलीधर मोहोल यांनी माहिती दिली की, छोट्या नाल्यांमधील पाणी थेट नद्यांत जाण्यापूर्वी प्रक्रिया होणार...
पुरस्थितीवर महापालिकेची सतत नजर : नागरिकांसाठी तातडीच्या मदतसेवा सज्ज
पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील अनेक धरणे १०० टक्के भरल्याने आणि सततच्या पावसामुळे नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आपली संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ मदतसेवा सुरू करण्यात आल्या आहेत. महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला असून, नागरिकांना आवाहन केले आहे की आपत्कालीन परिस्थितीत त्वरित 020-67331111 / 020-28331111 या...
गोंदिया जिल्ह्यातील अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
गोंदिया जिल्ह्यातील सीएमआर तांदूळ जमा करून ठेवल्याप्रकरणी चौकशी करण्यात येईल. तसेच या प्रकरणातील जिल्हा पुरवठा अधिकारी याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. गोंदिया जिल्ह्यातील सीएमआर तांदुळाच्या साठ्याप्रकरणी सदस्य नाना पटोले यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम यांनी माहिती देताना सांगितले की, सन २०२३–२४ या वर्षासाठी आवश्यक...
बिना सिम के बंद हो जाएंगे WhatsApp, Telegram समेत अनेक मेसेजिंग अॅप्स — केंद्र सरकारचा नवीन “SIM-बाइंडिंग” नियम लागू; जाणून घ्या काय बदलणार आहेत*
भारत सरकारने 30 नोव्हेंबर 2025 रोजी जारी केलेल्या नवीन निर्देशांनुसार, आता व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, Signal, Snapchat, ShareChat, JioChat आणि इतर मेसेजिंग अॅप्ससाठी “SIM-बाइंडिंग” अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमानुसार, आता एखाद्या मोबाइलवर ते अॅप्स चालवण्यासाठी त्या फोनमध्ये कार्यशील आणि नोंदणीकृत सिम कार्ड असणे आवश्यक आहे. जर सिम नसेल, बदलले असेल किंवा काढले गेले असेल, तर अँप आपोआप बंद होईल. नवीन कायदे...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ग्राऊंडवॉटर रिचार्ज स्ट्रक्चर्स अँड इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट’चे प्रकाशन
मुंबई :- सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन आणि एसटीएल यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या **‘ग्राऊंडवॉटर रिचार्ज स्ट्रक्चर्स अँड इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट’**चे प्रकाशन करण्यात आले. ग्रामीण भागातील जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने हा अहवाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे. ग्रामीण भागासाठी दिलासा देणारा अहवाल या अहवालामध्ये महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये उभारण्यात...
भाजपा शहर निवडणुकीची कमान आता आमदार अमित गोरखे यांच्या हाती..!
पिंपरी चिंचवड जिल्हा निवडणूक संचालन समितीच्या संयोजक पदी आमदार अमित गोरखे तर सहसंयोजक म्हणून मोरेश्वर शेडगे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्शभूमीवर निवडणूक कालखंडात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबविणे तसेच उमेदवारांच्या मुलाखती त्यासाठी उमेदवार चयन करणे व निवडणूक प्रचार यंत्रणा कार्यान्वित करणे यासाठी जिल्हा निवडणूक संचालन समितीची भूमिका अत्यंत महत्वाची असते. राजकीय व संघटनात्मक दृष्ट्या अशा...
अभिषेक–रिंकूचा धडाका, न्यूझीलंडसमोर भारताचे 239 धावांचे आव्हान
भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाने दमदार फलंदाजी करत विक्रमी धावसंख्या उभारली आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून तब्बल 238 धावा केल्या असून न्यूझीलंडसमोर 239 धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात युवा फलंदाज अभिषेक शर्मा याने आपल्या तुफानी खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या 35 चेंडूत 84 धावा करताना त्याने 5...




