सामाजिक

Home सामाजिक Page 96

मेट्रोमुळे कोंढव्याला नवी गती; शहराच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार

पुणे | कोंढवा परिसराचा सर्वांगीण आणि वेगवान विकास साधण्यासाठी मेट्रोच्या माध्यमातून कोंढव्याला पुणे शहराच्या इतर भागांशी जोडण्यात येणार असल्याची ठाम ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कात्रज–कोंढवा मार्गाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असून, शिवाजीनगर ते येवलेवाडी मेट्रोमार्गाला मान्यता देण्यात आली आहे. तसेच स्वारगेट ते कात्रज मेट्रोमार्ग कोंढव्यापर्यंत वाढवणे आणि प्रस्तावित पुरंदर विमानतळाशी जोडणारी मेट्रो लाईन कोंढवा परिसराशी संलग्न...

वारजे माळवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ‘निलेश गायवळ टोळी’तील दोन मोक्का गुन्ह्यांतील फरार आरोपी अमोल लाखे बार्शीतून जेरबंद

पुणे, दि. २७ फेब्रुवारी २०२६ : Warje Malwadi Police Station कडून मोठी कारवाई करण्यात आली असून ‘निलेश गायवळ टोळी’शी संबंधित आणि दोन मोक्का गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला फरार आरोपी अमोल दत्तात्रय लाखे (वय २७) यास अटक करण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. दोन मोक्का गुन्ह्यांमध्ये सहभाग सदर आरोपीविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्र. ४१७/२०२५ तसेच...

बदलापूर-नवी मुंबई टनेल रोड पुढील वर्षी खुला होणार; प्रवास वेळ २० मिनिटांवर येणार!

मुंबई: बदलापूर आणि नवी मुंबई यांना जोडणारा महत्त्वाकांक्षी टनेल रोड प्रकल्प पुढील वर्षी खुला होण्याच्या मार्गावर आहे. या टनेलमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, अवघ्या २० मिनिटांत बदलापूरहून नवी मुंबईत पोहोचणे शक्य होणार आहे. महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था अधिक सुकर आणि वेगवान करण्याच्या दिशेने हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. वाहतुकीस नवा पर्याय: मोठा दिलासा! सध्या बदलापूरहून नवी मुंबईला जाण्यासाठी...

पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल!

पुणे शहरात १९ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी होणार आहे. यानिमित्ताने "जय शिवाजी जय भारत" पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून, मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक सहभागी होणार आहेत. यामुळे शहरातील मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. "जय शिवाजी जय भारत" पदयात्रेचा मार्ग 🛑 इंजिनिअरिंग कॉलेज ग्राऊंड → स. गो. बर्वे चौक →...

भारतीय बुद्धिबळाची मान अभिमानाने उंचावली! दिव्या देशमुख यांचा नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भव्य नागरी सन्मान

प्रतिनिधी | नागपूर :- २०२५ च्या FIDE महिला विश्वचषक स्पर्धेची विजेती ठरलेली आणि भारतासाठी अभिमानाची ठरणारी पहिली भारतीय महिला ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुख हिचा आज नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी सन्मान करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रासाठी, विशेषतः विदर्भासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे. या सन्मान समारंभाला मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, आमदार डॉ....

वरळी सीफेसवर संतापजनक प्रकार : पुणे-मुंबई महामार्गावर ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

 छत्री लागल्याचा राग, अंगावर संतापाने हल्ला – गर्दुल्ल्याच्या क्रूर कृत्याने वरळी सीफेस हादरले! मुंबईतील वरळी सीफेसवर शनिवारी (१९ एप्रिल) एका महिलेवर झालेल्या हल्ल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ हातातील छत्री चुकून अंगाला लागल्याने ३५ वर्षीय व्यक्तीने काचेचा तुकडा महिलेच्या पाठीत खुपसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दुपारी दीड वाजताच्या सुमारास अनिता बाळू...

पुणे शहरात रस्ता सुरक्षा अभियान–२०२६ चे आयोजन; वाहतूक जनजागृतीसाठी पोलिसांचा पुढाकार

पुणे शहरात सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने पुणे शहर वाहतूक विभागातर्फे “रस्ता सुरक्षा अभियान – २०२६ व मुद्देमाल वितरण समारंभ” भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे. पुणे शहर पोलीस उपायुक्त (वाहतूक) यांच्या वतीने आयोजित या...

जास्तीत जास्त नागरिकांनी 20 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे प्राधिकरणाचे आवाहन

नाशिक : श्रद्धा, पावित्र्य आणि अध्यात्माचा संगम असलेला सिंहस्थ कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणार आहे. यानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणातर्फे बोध चिन्ह स्पर्धेचे (लोगो डिझाईन) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी आता अवघे दहा दिवस राहिले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय...

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक : जनहिताचे अनेक निर्णय जाहीर

आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत नागरिकांच्या कल्याणाशी थेट संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत विकास, रोजगार, शेती, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात ठोस निर्णय घेण्यात आले. बैठकीत प्रमुखतः ग्रामीण भागातील विकासकामांना गती देणे, शेतकऱ्यांसाठी नव्या योजना लागू करणे आणि नागरी भागातील पायाभूत सुविधांसाठी निधी वाढविण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षेसाठी...

आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीपूर्व मंजूर कामांची माहिती मागवली! तुषार कामठे यांची पारदर्शकतेसाठी ठाम भूमिका — महापालिकेतील घोटाळ्यांवर नव्या चौकशीची मागणी जोरात

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीनंतर अनेक प्रलंबित आणि मंजूर कामांबाबत अनियमिततेचे आरोप पुढे आले आहेत. विशेष म्हणजे, या सर्व संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पुढाकार घेतला आहे. तुषार कामठे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीपूर्व ३० दिवसांत मंजूर झालेल्या सर्व भांडवली कामे...

Copyright ©