ज्ञानोबा-तुकाराम जयघोषात दुमदुमला टाळगाव-चिखली परिसर महापालिकेच्या शाळेत रंगला भक्ती, एकात्मता आणि परंपरेचा अद्भुत संगम
पिंपरी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५० वी) जयंती वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळेत भक्तिमय वातावरणात भव्य पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने टाळगाव-चिखली परिसरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळा व महाविद्यालय परिसरातून ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत टाळ-मृदुंगाच्या गजरासह टाळ-चिपळ्यांचा नाद आणि विद्यार्थ्यांच्या अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. ‘ज्ञानोबा माऊली’ आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत सहभाग घेतला होता. महिला बचत गटांच्या सदस्यांनी, स्थानिक समाजसेवकांनी, वारकरी बांधवांनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली. वारकरी परंपरेतील पालखी सोहळा जसा श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे, तसाच तो एकात्मता आणि सामाजिक बंध दृढ करणारा सोहळा ठरला. पालखी सोहळ्याचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, समाज विकास विभाग उपायुक्त ममता शिंदे, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण कुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपिठाचे संचालक ह. भ. प. राजू महाराज ढोरे ,डॉ. स्वाती मुळे आणि शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यांच्या नियोजनामुळे आणि समन्वयामुळे संपूर्ण मिरवणूक सोहळा शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज; पारदर्शक व भयमुक्त निवडणुकीसाठी व्यापक तयारी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक, भयमुक्त आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूक प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा सुरळीतपणे पार पडावा, यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक साधने व सुरक्षेची काटेकोर आखणी करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आदर्श आचारसंहितेची...
मुंबईत उष्णतेची लाट; आयएमडीचा यलो अलर्ट, तापमान ३८ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता
मुंबई : राज्यात उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट (Heatwave) जाणवण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. India Meteorological Department (आयएमडी) ने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस मुंबई आणि उपनगरांमध्ये आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मंगळवारी मुंबईतील कमाल तापमान सुमारे ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, तर किमान...
उद्योगमंत्री उदय सामंत रुग्णालयात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, प्रकृतीत सुधारणा
मुंबई | महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. गेल्या आठवड्यात नागपूर येथे पार पडलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उदय सामंत यांनी सक्रिय सहभाग घेतला...
कात्रज येथील जमिनीच्या वादातून तरुणाचा निर्घृण खून; २४ तासांत आरोपींना मोहोळ, सोलापूर येथून अटक
पुणे | २६ एप्रिल २०२५ :- कात्रज परिसरात जमिनीच्या वादातून झालेल्या निर्घृण खुनानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, आंबेगाव पोलिसांनी तातडीने हालचाली करत केवळ २४ तासांत आरोपींना मोहोळ, सोलापूर येथून जेरबंद करून मोठे यश मिळवले आहे. ही कारवाई पुणे शहर पोलिस दलाच्या कार्यक्षमतेचे आणखी एक उदाहरण ठरली आहे. पहाटेच्या अंधारात घडली क्रूर घटना दि. २० एप्रिल २०२५ रोजी पहाटे ३:४५...
महानगरपालिका प्रशासनात AI क्रांती; लवकरच ‘डिजिटल गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म’ उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील महानगरपालिका प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिक-केंद्रित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म लवकरच उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या नव्या उपक्रमामुळे नागरी प्रशासनात डिजिटल परिवर्तनाची नवी दिशा मिळणार असून, नागरिकांना सेवा अधिक जलद आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, AI टूल्सच्या माध्यमातून तक्रार निवारण, मालमत्ता...
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कॉस्मेटिक जिहाद’चा थरार! पाकिस्तान बनावटीच्या प्रसाधनांमागे मोठा कट? महेश लांडगे विधानसभेत तुफान आक्रमक
पिंपरी-चिंचवड शहरात मार्च 2025 मध्ये पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधनांचा प्रचंड साठा जप्त झाल्यानंतर राज्यभरात प्रचंड खळबळ उडाली होती. त्या प्रकरणाला आता थेट राष्ट्रसुरक्षेचे स्वरूप प्राप्त झाले असून, हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यावर जोरदार चर्चा रंगली. विधानसभेत बोलताना भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी अतिशय ठाम आणि आक्रमक भूमिका घेतली. “शत्रू आपल्या घराच्या उंबऱ्यावर येऊन ठेपला आहे. पाकिस्तान निर्मित माल आपल्या शहरात पोहोचतोय,...
Vashi ते Sanpada रस्त्यावरील व्हिडीओ व्हायरल, गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर निघाल्याचा प्रकार
नवी मुंबईतील वाशी ते सानपदा रस्त्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कारच्या डिक्कीतून बाहेर आलेला हात दिसल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हिडीओमध्ये एक कार वाशी ते सानपदा रस्त्यावरून जाताना दिसते, आणि तिच्या डिक्कीतून एक मानवी हात बाहेर आलेला स्पष्टपणे दिसतो. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे की,...
मराठी अस्मितेवर गदा? राज ठाकरेंचा गंभीर इशारा! मराठी माणसांवर अन्यायाचा आरोप
राज ठाकरे नेहमीच मराठी माणसाच्या हितासाठी सजग आणि सावधगिरीचा इशारा देत आले आहेत. सध्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये मराठी माणसाला दुय्यम वागणूक मिळतेय, असा आरोप पुन्हा एकदा त्यांनी केला आहे. गेल्या ४ महिन्यांमध्ये अनेक आंदोलनं झाली, पण त्या सगळ्या आंदोलनांमध्ये एक गोष्ट सतत दिसून आली – मराठी माणसाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या एका विशिष्ट पक्षाची सुस्पष्ट उपस्थिती! त्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्यांवर...
भवानी पेठ पोलिस ठाण्याच्या कारवाईत तब्बल १९ आरोपी जेरबंद – अंमली पदार्थ, गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा आळा
पुणे शहर पोलिसांनी भवानी पेठ परिसरात मोठी कारवाई करत तब्बल १९ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत विविध प्रकारचे अंमली पदार्थ, धारदार शस्त्रे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ४२/२०२५ नोंदवण्यात आला असून आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू आहे. भवानी पेठ हे क्षेत्र पूर्वीपासून गुन्हेगारी, मादक पदार्थ आणि अवैध धंद्यांसाठी कुप्रसिद्ध मानले जात होते....






