अमरावतीत धक्कादायक घटना! महिला पोलिसाची सुपारी देऊन हत्या; पतीच निघाला खुनी
अमरावती शहरात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या महिला पोलीस अंमलदार आशा धुळे-तायडे यांच्या गळा दाबून झालेल्या हत्येचे गूढ अखेर उकलले आहे. या खळबळजनक प्रकरणात त्यांच्या पतीनेच पत्नीच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून, प्रेमसंबंधातून ही संतापजनक घटना घडली आहे. आरोपी राहुल तायडे हा राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असून त्याचे गेल्या चार ते पाच वर्षांपासून दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते....
मुंबई महापालिका निवडणूक : मुलुंड पश्चिम प्रभाग १०७ मधून डॉ. नील सोमय्या यांचा उमेदवारी अर्ज दाखल
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, आज भाजपचे युवा नेते डॉ. नील सोमय्या यांनी मुलुंड पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १०७ मधून आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला. या अर्ज दाखल कार्यक्रमावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या, आमदार मिहीर कोटेचा तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर डॉ. नील सोमय्या यांनी माध्यमांशी...
मुंबईत उष्णतेचा कहर! BMC मुख्यालयाजवळ रस्ता वितळला – आयएमडीचा ‘यलो अलर्ट’ जारी
मुंबईकरांसाठी उन्हाळा यंदा अधिक तीव्र वाटू लागला आहे. सोमवारी (८ एप्रिल) तापमान तब्बल ३६.२°C पर्यंत पोहोचले, ज्यामुळे शहरातील अनेक भागांत उष्णतेची तीव्रता जाणवली. मात्र, सर्वाधिक धक्कादायक घटना BMC मुख्यालयाजवळ घडली, जिथे रस्त्याच्या डांबराचा काही भाग वितळल्याचे दिसून आले. तापमानवाढीमुळे मुंबईत भीषण स्थिती! भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला...
स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करण्याची गरज – राज्यपाल
पुणे : निसर्गोपचार, आयुर्वेद, आपली पूर्वीची जीवनशैली, नैसर्गिक शेती तसेच आपल्या जीवनमूल्यांना पुन्हा अवलंबल्यास स्वस्थ भारत बनवू शकू, असा विश्वास राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केला. या कामात निसर्गोपचार वैद्यक व्यवसायी, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतील, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणे अंतर्गत येवलेवाडीतील निसर्गग्राम येथे आयोजित आठव्या निसर्गोपचार दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय आयुष राज्यमंत्री...
पुणेकरांसाठी मोठी बातमी! कात्रज चौकातील वाहतूक पूर्ववत सुरू – ६ जूनपासून सर्व मार्ग खुले
वाहतूक पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय; काम पूर्ण झाल्यानंतर कात्रज चौक पुन्हा सर्व वाहनांसाठी खुला पुणे – कात्रज चौकात सुरू असलेले सेगमेंटल लाँचिंगचे काम पूर्ण झाल्यामुळे, आता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी कात्रज चौक पुन्हा खुला करण्यात आला आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी यासंदर्भात अधिकृत प्रेसनोट प्रसिद्ध केली आहे. दि. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने कात्रज मुख्य...
वाघोली-लोहगाव रस्त्याची दुर्दशा: पुणे महापालिकेची निष्क्रियता की उघडपणे भ्रष्टाचार?
रस्ता दुरुस्तीसाठी निदर्शन आंदोलन पुणे: ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च करण्यात येत असताना, प्रत्यक्षातली परिस्थिती मात्र काही आणि भयानक वास्तव काही वेगळंच सांगते. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या वाघोली परिसरातील प्रमुख निवासी संकुले — अथकज विजय विहार, प्राईमेरा होम्स आणि रोहन अभिलाषा — अजूनही मूलभूत रस्ता व ड्रेनेजसारख्या सुविधांपासून वंचित आहेत. वाघोली-लोहगाव रोड ते अग्निशमन केंद्र, अथकज विजय विहार, मोरे कॉर्नर, रोहन...
मोबाईल हिसकावणाऱ्या आरोपीकडून मोठा छडा; १.९० लाखांचे मोबाईल व दुचाकी पोलिसांनी केली जप्त
पुणे | भारती विद्यापीठ पोलीसांची कारवाई, नागरिकांमध्ये दिलासा पुणे शहरात मोबाईल हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या दक्षतेमुळे एक महत्त्वाचा गुन्हा उघडकीस आला आहे. दिनांक ०१ मे २०२५ रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गुजरवाडी फाटा, महेश कदम यांच्या बंगल्याजवळील गोल्डन स्क्रॅप सेंटरसमोर एक धक्कादायक घटना घडली. फिर्यादी व्यक्ती फोनवर बोलत असताना दोन दुचाकीस्वार अज्ञात इसमांनी त्यांच्या हातातील...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील मानाच्या गणपतींना भेट – श्रींच्या चरणी प्रार्थना करून घेतले पुणेकरांचे आशीर्वाद
पुणे : पुण्यातील मानाचे गणपती हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहेत. गणेशोत्सवाला राज्य शासनाने ‘राज्य उत्सवाचा’ दर्जा दिल्याने या सणाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील विविध मानाच्या व ऐतिहासिक गणेश मंडळांना भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले आणि राज्यातील जनतेसाठी प्रार्थना केली. मुख्यमंत्री म्हणाले, “श्री गणेश सर्वांना सुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्य देवो. सर्वांच्या मनोकामना पूर्ण...
पुण्यात हृदयद्रावक घटना : १३ वर्षीय रोहन बॉंबेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; वन विभागाची व्यापक शोधमोहीम सुरु
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळखेड (आंबेवाडी) गावात रविवारी दुपारी घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलगा रोहन विलास बॉंबे (वय १३ वर्षे) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी साधारण ३.४५ वाजता ही घटना घडली असून, या घटनेने परिसरात भीतीचं आणि शोकाचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रोहन हा शेताच्या परिसरात खेळत असताना झुडपातून अचानक बिबट्याने झडप घालून त्याच्यावर हल्ला केला. जवळच्या...
बोपोडीतील चाळीत मध्यरात्री थरार! | महिलेला धमकी, पतीवर जीवघेणा हल्ला | खडकी पोलिसांकडून तपास सुरू
पुणे (बोपोडी): बोपोडीतील रेल्वे पटरीजवळ असलेल्या कमलाबाई बहिरट चाळीत दि. २५ मे २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. एका ४५ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, अज्ञात इसमाने तिच्या पतीवर थेट जीवघेणा हल्ला करत गंभीर जखमी केले. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटना रात्री २३.२० वाजता घडली. फिर्यादी महिला आपल्या राहत्या घरी असताना सदर इसमाने त्यांच्या...









