रामटेक येथे पंकजाताई मुंडे यांची सदिच्छा भेट; महिला सक्षमीकरण, स्वावलंबन व POSH कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर सखोल चर्चा
मुंबई (रामटेक) : राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा. ना. पंकजाताई मुंडे यांची आज ‘रामटेक’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान राज्यातील महिला सक्षमीकरणाच्या विविध योजना, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाचे धोरणात्मक निर्णय आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी यावर सविस्तर संवाद झाला. बैठकीत ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वयंरोजगार, बचत गट, कौशल्य विकास प्रशिक्षण, लघुउद्योगांना प्रोत्साहन, महिला उद्योजकता...
पुण्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धाडसी छापा! ३२ जणांना अटक, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
पुणे : शुक्रवार पेठेतील शाहू चौकाजवळील अंग्रेवाडा येथे सुरू असलेल्या गुप्त जुगार अड्ड्यावर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात एका महिलेसह ३२ जणांना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून १ लाख ४६ हजार ४२० रुपयांची रोकड व जुगारासाठी वापरण्यात आलेली साधने जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, सुनिल भाऊ मुंडे हा या जुगार क्लबचा प्रमुख असून, इतका मोठा...
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेसाठी सिद्धिविनायक मंदिरात विशेष पूजन; देशरक्षणासाठी देवाला कृतज्ञतेची अर्पणवाणी
मुंबई | ८ मे : भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर यशस्वी क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर देशभरात अभिमान आणि आनंदाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक आणि ठोस कारवाईनंतर आज सकाळी मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात विशेष पूजन आणि आरती आयोजित करण्यात आली आहे. या पूजनामध्ये भारताचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी प्रार्थना केली जाणार असून, यशस्वी मोहिमेसाठी श्री गणेशाचे...
पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक शेती करणारा शेतकरी महत्वाचा- राज्यपाल आचार्य देवव्रत
पुणे – आपल्या देशात रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी नैसर्गिक शेती हा प्रभावी पर्याय असून, पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला फॅमिली डॉक्टरपेक्षाही नैसर्गिक शेती करणारा शेतकरी अधिक गरजेचा ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. शिवाजीनगर येथील कृषि महाविद्यालयात आयोजित एक दिवसीय नैसर्गिक शेती परिषदेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते....
पिंचीच्या मंगळागौर स्नेहमेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; परंपरा, एकजूट आणि स्त्रीशक्तीचा भव्य उत्सव!
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील महिलांसाठी एक खास आणि संस्मरणीय ठरलेला ‘पिंची’ समूहाचा मंगळागौर व नागपंचमी स्नेहमेळावा पारंपरिक उत्साहात आणि महिलांच्या उस्फूर्त सहभागात नुकताच पार पडला. समाजमाध्यमांपासून परिसरातील मैदानांपर्यंत या कार्यक्रमाची रंगत सर्वत्र पाहायला मिळाली. महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक जतन आणि आपुलकीने भरलेल्या या सोहळ्यात हजारो महिलांनी सहभाग घेत महिलांचा जल्लोष अनुभवला. या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती मा. नीलम गोऱ्हे आणि...
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : राज्यात मागील काही दिवसात झालेल्या पूर परिस्थितीमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता नव्याने अभियानाला सुरुवात करण्यात आली असून या अभियानाच्या अंमलबजावणीतून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधान भवन येथील मंत्रिपरिषद सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शीर्षक गीत लोकार्पण कार्यक्रम पार पडला. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात...
भारत सरकारने 156 औषधांचे संयोजन बंद केले; सर्दी, ताप, आणि ऍलर्जीवर परिणाम करणारी औषधे बंद.
मुख्य शीर्षक: केंद्र सरकारने सर्दी, ताप, आणि ऍलर्जीवर परिणाम करणारी 156 औषध संयोजनांवर बंदी घातली नवी दिल्ली: केंद्र सरकारने 156 फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधांचे उत्पादन, विक्री, आणि वितरण बंद केले आहे. यामध्ये सर्दी, ताप, ऍलर्जी, आणि वेदना यावर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी औषधे समाविष्ट आहेत. या औषधांच्या संयोजनांमध्ये मानवाच्या आरोग्यास धोका उत्पन्न होण्याची शक्यता असल्याचे निष्कर्ष निघाले आहेत. FDC औषधे म्हणजे...
महानगरपालिकेच्या शाळेतील लहान लहान विद्यार्थ्यांच्या हातून घडले पर्यावरणपूरक गणपती बाप्पा
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत शाळांमध्ये गणेशोत्सवाचे औचित्य साधून पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाडू माती आणि कागदापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या कल्पनाशक्तीला व कलागुणांना वाव देत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केली. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करणे , पर्यावरणपूरक मूर्तींना प्रोत्साहन देणे, त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, हे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट होते. कार्यशाळेत शिक्षक...
लोणावळ्यात विकासाचा नवा अध्याय सुरू होणार; जिल्हाधिकाऱ्यांचा पाहणी दौरा, रेल्वे उड्डाणपुलाच्या कामास सोमवारपासून सुरूवात!
लोणावळा – पर्यटनाच्या नकाशावर ओळख निर्माण केलेल्या लोणावळा शहरात एक नवीन विकास पर्व सुरू होण्याच्या दृष्टीने गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक व पाहणी दौरा पार पडला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार सुनील शेळके, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत शहरातील विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या दौऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या भांगरवाडी ते नांगरगाव दरम्यानच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामास सोमवारपासून...
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्यावर गाडी घालून गंभीर जखमी – चंद्रपूरमध्ये थरकाप उडवणारी घटना!
चंद्रपूर (बल्लारपूर) – राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चिंतेचा प्रसंग उभा राहिला आहे. बल्लारपूर तालुक्यातील वीसापुर टोल नाक्यावर एका टोल कर्मचाऱ्यावर वाहनचालकाने थेट वाहन घालून जीव घेण्याचा प्रयत्न केला. केवळ टोलची मागणी केल्यामुळे हा प्रकार घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीचा थरार – टोल चुकवण्याच्या प्रयत्नात थेट जीवघेणा हल्ला! ही धक्कादायक घटना रविवारी-सोमवारीच्या मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली. टाटा...












