महाराष्ट्र
पाकिस्तान बिथरलं! एअर स्ट्राईकनंतर सीमेवर मध्यरात्री अंदाधुंद गोळीबार; भारताने दिलं चोख प्रत्युत्तर
भारताने नुकत्याच केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. देशाच्या संरक्षणासाठी भारतीय लष्कराने उचललेले हे पाऊल निर्णायक ठरले असून, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारताने नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. या कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून सीमारेषेवर सतत आगळिक केली जात आहे. बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील करनाह सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने...
१ जुलैपासून एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकांचे नवे नियम लागू – ग्राहकांच्या खिशाला लागणार आर्थिक फटका!
१ जुलै २०२५ पासून खासगी क्षेत्रातील दोन आघाडीच्या बँकांनी ग्राहकांसाठी महत्त्वाचे आणि थेट परिणाम करणारे नियम बदल जाहीर केले आहेत. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांच्या नव्या अटी आणि सेवा शुल्कामुळे सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक ताण येण्याची शक्यता आहे. एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड नियम बदलले एचडीएफसी बँकेने आपल्या क्रेडिट कार्डधारकांसाठी काही नवे शुल्क लागू केले आहेत. यामध्ये विशेषतः खालील बाबींचा समावेश आहे: गेमिंग...
मोबाईल स्नॅचिंग आणि वाहन चोरी प्रकरणातील मोठा खुलासा – ८.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोन आरोपी ताब्यात
पुणे शहरात दिवसेंदिवस मोबाईल चोरी आणि दुचाकी चोरीच्या घटना वाढताना दिसत असताना, खडकी पोलीस ठाण्याच्या दक्ष आणि धडाकेबाज पथकाने मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. वाकडेवाडी परिसरात जुने कामगार आयुक्त कार्यालयाजवळ झालेल्या जबरी चोरी प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून एकूण ₹८.५० लाख किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, ज्यामध्ये २२ मोबाईल फोन, टॅब आणि ६...
पुणेकरांसाठी मोठा दिलासा! वनाज़-चांदणी चौक व रामवाडी-वाहतूक वाघोली मेट्रो मार्गाला केंद्र सरकारची मंजुरी
वाहतुकीला मिळणार गती, जीवन होणार सुकर – अजित पवार पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील दोन महत्वाच्या मार्गांना केंद्र सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. वनाज़ ते चांदणी चौक (मार्गिका २ अ) आणि रामवाडी ते वाघोली-विट्ठलवाडी (मार्गिका २ ब) या दोन्ही मार्गांच्या कामांवर आता लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. पुण्याचा वेगाने वाढणारा शहरी विस्तार, वाढते वाहतूकभार, आणि पर्यावरणीय दृष्टीने मेट्रो सेवा...
“भगिनी स्व. ऋतुजा राजगे यांना न्याय मिळालाच पाहिजे”; धर्मांतरासाठी दिलेल्या छळामुळे सात महिन्यांच्या गर्भवतीचा आत्महत्या करून अंत
सांगली | संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या गर्भवती स्व. ऋतुजा सुकुमार राजगे आत्महत्या प्रकरणावर आता सामाजिक आणि राजकीय पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भोसरीचे आमदार महेश लांडगे दादा यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दांत म्हटलं की, "भगिनी ऋतुजाला धर्मांतरासाठी छळलं गेलं, हा केवळ कौटुंबिक मुद्दा नाही, तर हा आमच्या संस्कृतीवर घाला आहे. या प्रकरणात कठोरात कठोर शिक्षा झालीच...
काँग्रेस भवनाबाहेर भाजप–काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री; पुणे पोलिसांकडून क्रॉस FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू
पुण्यातील काँग्रेस भवनाबाहेर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीनंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. या घटनेनंतर पुणे शहर पोलीस यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांविरोधात क्रॉस FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. आंदोलनानंतर तणाव वाढला ही घटना राज्य काँग्रेस अध्यक्षांनी केलेल्या राजकीय वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर घडली. आंदोलन संपल्यानंतर काही कार्यकर्ते काँग्रेस भवनाजवळ...
धक्कादायक! महिला डॉक्टरची गाडीत आत्महत्या; सांगली जिल्हा हादरला, निलम गोऱ्हेंची पारदर्शक चौकशीची मागणी
सांगली | सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील विठ्ठलवाडी परिसरात एका महिला डॉक्टरने आपल्या चारचाकी गाडीतच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डॉ. शुंभागी समीर वानखडे (मु.रा. मुंबई) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, त्या मूळच्या मुंबईतील रहिवासी होत्या. गाडीतच सापडल्या रक्ताच्या थारोळ्यात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डॉ. शुंभागी वानखडे यांनी ब्लेडच्या सहाय्याने हाताच्या आणि गळ्याच्या नसा कापून आत्महत्या केली. त्या घरातून "दवाखान्यात...
बावधनमधील पायदळ मार्गांची दयनीय अवस्था; “चालण्यासाठी जागा नाही” – सुजाता गोकळे यांची खंत
पुणे | २ जून २०२५ – पुण्यातील बावधन परिसरात पायदळ नागरिकांसाठी रस्ते म्हणजे एक जीवघेणं संकट बनलं आहे. शहरातील नागरी विकासाच्या नावे वाढणारी अनियोजित व अनियंत्रित बांधकामं, वाहनांच्या वाढत्या संख्येचा ताण, आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सामान्य नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. "बावधनमध्ये चालण्यासाठी जागाच उरलेली नाही," अशी ठाम प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या आणि स्थानिक रहिवासी सुजाता गोकळे यांनी दिली आहे. त्यांनी ही...
जास्तीत जास्त नागरिकांनी 20 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे प्राधिकरणाचे आवाहन
नाशिक : श्रद्धा, पावित्र्य आणि अध्यात्माचा संगम असलेला सिंहस्थ कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणार आहे. यानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणातर्फे बोध चिन्ह स्पर्धेचे (लोगो डिझाईन) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी आता अवघे दहा दिवस राहिले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय...
मुळा-मुठा नदीला आलेला पुराचा वेग; पुणेकरांना सतर्कतेचा इशारा
पुणे – पुण्यातील कल्याणी नगर-मुंढवा परिसरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीला आलेले पाणी पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बंडगार्डन बंधाऱ्यावरून तब्बल ९०,००० क्युसेक पाणी नदीत सोडण्यात आले असून, यामुळे नदी काठच्या भागांत पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणांची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करावा लागतो आणि याचा थेट परिणाम पुण्यातील...









