महाराष्ट्र
तळोजात ‘भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’चे लोकार्पण; वकिलांसाठी ऐतिहासिक पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
तळोजा | नवी मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने तळोजा, नवी मुंबई येथे स्थापन करण्यात आलेले देशातील पहिले ‘भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’ (BBATRC) हे वकिलांसाठी एक ऐतिहासिक आणि दिशादर्शक केंद्र ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या अत्याधुनिक प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस...
२०२६ कडे वाटचाल: पुण्याला मोठा दिलासा; बहुप्रतिक्षित हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्ग मार्च २०२६ पर्यंत सुरू होण्याची शक्यता
पुणे | पुणे शहरात गेल्या काही वर्षांत खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढली असून, अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पुणे मेट्रोला अपेक्षित प्रतिसाद अद्याप मिळालेला नसला, तरी २०२६ हे वर्ष पुणे मेट्रोसाठी निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. शहरातील सर्वात महत्त्वाचा आणि बहुप्रतिक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर (मेट्रो लाईन-३) मार्ग मार्च २०२६...
महापालिकेकडून मराठी भाषा गौरव दिनी आयोजित काव्य संमेलनाला रसिकांची दाद
पिंपरी : अक्षरांचा सुगंध, शब्दांची लय आणि माय मराठीबद्दलचा अपार अभिमान... अशा उत्साहपूर्ण वातावरणात पिंपरी चिंचवड शहरातील कवींकडून मराठीच्या गौरवशाली परंपरेला काव्यात्मक अभिवादन करण्यात आले. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे पिंपरी चिंचवड महापालिकेने महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर , अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि लोककलाविषयक कार्यक्रमांचे आयोजन केले होते....
घाटकोपर BMC सुविधा सेंटर महिला बचत गटाकडे; सक्षमीकरणातून स्वच्छता व व्यवस्थापनाला नवी दिशा
घाटकोपर, मुंबई : घाटकोपर येथील BMC सुविधा सेंटरला आज भेट देताना एक अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. हे सुविधा केंद्र आता महिला बचत गटाच्या माध्यमातून चालवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली असून, त्यासाठी संबंधित महिलांचे सध्या प्रशिक्षण सुरू आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, शिकण्याची जिद्द आणि आत्मविश्वास पाहून समाधान व्यक्त करण्यात आले. या उपक्रमामागे Brihanmumbai Municipal Corporation (BMC) च्या...
नगरसदस्य, नगरसदस्या यांच्या तक्रारींचा प्राधान्याने निपटारा करून जबाबदारीने काम करा; नागरिकांकडून कडून आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यावरही कार्यवाही करा – महापौर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना….
पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांनी समन्वयाने काम करणे अत्यावश्यक आहे. शहर स्वच्छ, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख ठेवण्यासाठी प्लास्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी, कचरा टाकल्या जाणाऱ्या ठिकाणांचे सुशोभीकरण, अतिक्रमणांवर कारवाई करताना फेरीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्था तसेच पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसह आवश्यक पायाभूत कामे वेळेत पूर्ण करणे यावर विशेष भर देणे आवश्यक आहे. याशिवाय, नागरिक व नगरसदस्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा विहीत वेळेत निपटारा करून प्रशासनाने...
स्थानिक स्वराज्य निवडणुकांदरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांचे मोठे विधान! IIT बॉम्बेवरून दिला ठोस संदेश; राज्यातील शिक्षण व नवोपक्रमाला नवी दिशा
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असताना, राज्याचे मुख्यमंत्री यांनी IIT बॉम्बे संदर्भात महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारे विधान केले आहे. या वक्तव्यानं केवळ शैक्षणिक वर्तुळातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा वाढली असून, राज्य सरकारच्या दीर्घकालीन शिक्षण धोरणाकडेही लक्ष वेधले गेले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, “IIT बॉम्बे हे भारतातील नवोपक्रमाचे हृदय आहे आणि महाराष्ट्राची ओळख जगभरात नेणारे संस्थान...
निलंबन मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन! महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, सरकारला थेट इशारा
मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी हिवाळी अधिवेशनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे राज्यातील महसूल यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात ४ तहसीलदार, ४ मंडल अधिकारी आणि २ तलाठी अशा एकूण १० अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, या निर्णयाविरोधात महसूल विभागातील विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. या निलंबनाच्या निषेधार्थ राज्यभरातील महसूल अधिकारी व...
राज्यातील क्रीडा संस्कृतीला चालना; २०२५-२६ साठी चार मानाच्या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन जाहीर
मुंबई : सन २०२५-२६ या वर्षात विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्यातील क्रीडा क्षेत्राला नवचैतन्य देण्यासाठी आणि युवा खेळाडूंना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले. बैठकीत पुढील स्पर्धांच्या आयोजनाचा निर्णय एकमताने घेण्यात आला : छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा — Ambernath येथे छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा...
देशातील पहिल्या सर्वेक्षण योजनेतून 15 हजार युवकांना प्रशिक्षण आणि पाच हजार रोजगारनिर्मितीचा संकल्प
मुंबई : युवकांचा देश असलेल्या भारतातील तरुण पिढीमध्ये जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘विकसित भारत 2047’ हे स्वप्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला ‘विकसित महाराष्ट्र’चा रोडमॅप साकार करण्यासाठी कौशल्य विकास हा पायाभूत टप्पा आहे. शासनाच्या या संकल्पनेमध्ये युवकांच्या क्षमतेचा कल जाणून घेणारी ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजना देशातील अशी पहिलीच सर्वेक्षण योजना असून रोजगार निर्मितीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याने...
“पीसीयू”चा विक्रमी टप्पा — यूजीसी-एचआरडीसीसोबत सामंजस्य कराराने उच्च शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श!
पिंपरी चिंचवड | उच्च दूरदृष्टी, स्पष्ट ध्येय आणि जलद अंमलबजावणी या त्रिसूत्रीवर पुढे जात पिंपरी चिंचवड विद्यापीठाने (पीसीयू) अवघ्या दोन वर्षांत असा विकास साधला आहे, जो इतर अनेक विद्यापीठांना साध्य करण्यासाठी दोन दशके लागली. याच प्रगतीच्या वाटचालीत आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पीसीयू आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्र (एमएमटीसी) तसेच मानवी संसाधन विकास केंद्र...











