वाशी, नवी मुंबईत शिवसेना युवा सेनेच्या ‘विजय संवाद मेळावा’ला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद
वाशी, नवी मुंबई | नवी मुंबईतील वाशी येथे आज पार पडलेल्या शिवसेना युवा सेनेच्या 'विजय संवाद मेळावा' या भव्य आयोजनास उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात तरुणांनी दाखवलेला उत्साह, आत्मविश्वास आणि पक्षनिष्ठा पाहता नवी मुंबईतील तरुण पिढी शिवसेनेच्या विचाराशी निष्ठावान असून संघटना बळकट करण्याची ताकद त्यांच्या अंगी असल्याचे स्पष्ट झाले. मार्गदर्शनात ठाम मुद्दे मांडले गेले या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पुढील...
मुंबई पावसाचा कहर! रेड अलर्ट जारी, पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा; ठाणे-रायगड रेड, पुणे-कोल्हापूर ऑरेंज अलर्टवर
दिनांक: १५ जुलै २०२५ | मुंबई :- मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा बसत आहे. सततच्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट, तर ठाणे, रायगड, मुंबई उपनगरासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे.पुणे, सातारा, अहमदनगर ऑरेंज अलर्टवर, तर कोल्हापूर, गडचिरोली, पालघर, सांगली आणि गोंदिया यलो अलर्टवर आहेत. वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम अंधेरी पश्चिमेतील अंधेरी सबवे...
कांदिवलीत गुंडांची मुजोरी; पोलिसांवर हल्ला, व्हिडिओ व्हायरल – रोहित पवारांचा सरकारवर थेट सवाल
मुंबई | प्रतिनिधी :- मुंबईच्या कांदिवली पश्चिम भागातील एकतानगर परिसरात स्थानिक गुंडांच्या दोन गटांमध्ये झालेल्या राड्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या वादाची माहिती मिळताच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरच गुंडांनी हात उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत पोलिसांची कॉलर पकडणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण केल्याचे व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येत असून, हा व्हिडिओ सध्या सोशल...
मीराभाईंदरमध्ये ‘बोल-बच्चन’ टोळीच्या चार सदस्यांना अटक; ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करून लाखोंचे दागिने लंपास.
मीराभाईंदर: मीराभाईंदर-वसई विरार (MBVV) पोलीसांनी 'बोल-बच्चन' टोळीच्या चार सदस्यांना अटक केली आहे, ज्यांनी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या मौल्यवान वस्तू चोरल्या होत्या. या टोळीने नुकतीच एका ५९ वर्षीय महिलेला बोलण्यात गुंतवून तिची १ लाख रुपये किमतीची सोन्याची चेन लंपास केली होती. टोळीची कार्यपद्धती: 'बोल-बच्चन' टोळी ही महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना फसवण्यासाठी वेगवेगळे बहाणे करून त्यांना बोलण्यात गुंतवायची. ते साधारणतः...
मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: पर्यटकांची गर्दी आणि नियोजनाचा अभाव कारणीभूत
मुंबई : थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. गोवा आणि कोकणातील समुद्रकिनाऱ्यांकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या लोंढ्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. वाहनचालक आणि प्रवाशांना यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोंडीची कारणे: १. थर्टी फर्स्टच्या उत्सवासाठी गोवा आणि कोकणाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली आहे. २. महामार्गावरील रस्त्यांच्या डागडुजीचे अपूर्ण काम आणि...
वाघोली-लोहगाव रस्त्याची दुर्दशा: पुणे महापालिकेची निष्क्रियता की उघडपणे भ्रष्टाचार?
रस्ता दुरुस्तीसाठी निदर्शन आंदोलन पुणे: ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च करण्यात येत असताना, प्रत्यक्षातली परिस्थिती मात्र काही आणि भयानक वास्तव काही वेगळंच सांगते. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या वाघोली परिसरातील प्रमुख निवासी संकुले — अथकज विजय विहार, प्राईमेरा होम्स आणि रोहन अभिलाषा — अजूनही मूलभूत रस्ता व ड्रेनेजसारख्या सुविधांपासून वंचित आहेत. वाघोली-लोहगाव रोड ते अग्निशमन केंद्र, अथकज विजय विहार, मोरे कॉर्नर, रोहन...
उल्हासनगर डान्सबारवर कळवा गुन्हे शाखेचा मोठा छापा! २४ बारबालांसह ७ ग्राहक आणि ६ कर्मचाऱ्यांना अटक, शहरात खळबळ
उल्हासनगर (ठाणे) – उल्हासनगर शहरातील एका प्रसिद्ध डान्सबारवर कळवा गुन्हे शाखेने बुधवारी रात्री उशिरा धडक कारवाई केली. या कारवाईत २४ बारबाला, ७ ग्राहक आणि ६ बार कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण उल्हासनगरमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांत चर्चेचा विषय बनला आहे. गुप्त माहितीवरून मोठी धडक कारवाई गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने डान्सबारवर नजर ठेवली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या...
नवी मुंबईसाठी दिलासादायक ठरणारी ऐतिहासिक कामगिरी! हेटवणे पाणीपुरवठा योजनेत CIDCO चा पहिलाच टनेल ब्रेकथ्रू लवकरच
मुंबई | प्रतिनिधी — सिडको (CIDCO) हद्दीतील भागांना भेडसावणारी दीर्घकाळाची पाणीटंचाई लवकरच इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. हेटवणे पाणीपुरवठा वाढ योजनेचे काम वेगाने प्रगतीपथावर असून, पुढील आठवड्यात CIDCO आपल्या सर्व प्रकल्पांमधील पहिल्या-वहिल्या ‘टनल ब्रेकथ्रू’ची नोंद करणार आहे. हा क्षण सिडकोच्या पायाभूत सुविधा विकासातील एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. ही महत्त्वाकांक्षी योजना नवी मुंबई आणि आजूबाजूच्या झपाट्याने वाढणाऱ्या नागरी, औद्योगिक आणि...
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम जनतेमध्ये रुजल्यास प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिशील आणि पारदर्शी होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015च्या अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त राज्यस्तरीय सोहळा' संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, व्यवस्थेने, सरकारने किंवा अधिकाऱ्याने नागरिकांचे अधिकार मानले नाहीत तर नागरिकांना दाद मागण्यासाठी या अधिकारांना अधिनियमाद्वारे बांधले पाहिजे. आमदार असताना मी यासंबंधीची...
नागपूर वीज विकास योजनांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक!
मुंबई | विधान भवन: नागपूर जिल्ह्यातील वीज वितरण आणि प्रकल्प विकास संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात पार पडली. या बैठकीत 'महावितरण' आणि 'महापारेषण'च्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला, तसेच कोराडी आणि खापरखेडा येथील वीज प्रकल्पांवरील पर्यावरण विभागाच्या निर्देशांची अंमलबजावणी आणि भविष्यातील विकास आराखड्यांवर चर्चा करण्यात आली. उर्जाविकासासह पर्यावरण संतुलनावर भर: या बैठकीमध्ये नागपूर जिल्ह्याच्या...













