मुंबई

Home मुंबई Page 50

समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा खुला! मुंबई-नागपूर प्रवासाची नवी क्रांती, वेळ निम्मा होणार

0

मुंबई | प्रतिनिधी :- महाराष्ट्राच्या बहुप्रतिक्षित आणि ऐतिहासिक समृद्धी महामार्गाचे अखेरचे आणि सर्वात जास्त तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेले 76 किमीचे इगतपुरी ते अमाणे (ठाणे) हे अंतर आज, 5 जून 2025 रोजी औपचारिकरित्या वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटनामुळे 701 किलोमीटर लांब असलेला संपूर्ण मुंबई-नागपूर समृद्धी...

माता रमाबाई नगरमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; जीर्ण पाईपलाईन तातडीने बदलण्याची मागणी

0

मुंबई :भांडुप पूर्व येथील प्रभाग क्रमांक ११४ मधील माता रमाबाई नगर परिसरात पिण्याच्या पाण्यात दूषित घटक मिसळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नळातून येणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येत असून पाण्याचा रंगही गढूळ दिसत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली...

ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने देशाने गमावला एक संयमी, सुसंस्कृत आणि दूरदर्शी नेता

0

ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक अढळ, संतुलित आणि मूल्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले आहे. देशाच्या राजकीय, सामाजिक आणि संसदीय क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाचा पट अत्यंत व्यापक आणि प्रेरणादायी आहे. शांत, सौम्य वर्तन, विचारांची परिपक्वता आणि निर्णयक्षम नेतृत्व या त्यांच्या ओळखीच्या खास वैशिष्ट्यांनी त्यांना देशातील सर्वपक्षीय आदर प्राप्त करून दिला होता. आमदार, खासदार, महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष, लोकसभेचे...

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन; मंत्रीमंडळातील मान्यवरांनी जनजागृतीचे केले आवाहन

0

आझाद मैदान, मुंबई मुंबईत आज नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित भव्य आणि जनजागृतीपर प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात राज्यातील मान्यवर मंत्री, कायदेतज्ज्ञ, पोलीस अधिकारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नवीन कायद्यांबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी उभारण्यात आलेले हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली. या विशेष प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मंत्रीमहाशयांनी नवीन कायद्यांची गरज, त्यामागील...

गणेशोत्सवाची गोड बातमी! पगार आधीच, कोकणगावकऱ्यांसाठी टोलमाफी; राज्य सरकारचे दुहेरी गिफ्ट

0

मुंबई : महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नोकरदार, निवृत्तीवेतनधारक आणि गणेशभक्तांना दुहेरी दिलासा दिला आहे. सणाच्या आनंदात कोणतीही आर्थिक किंवा प्रवासातील अडचण येऊ नये, यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पगार पाच दिवस आधीच ऑगस्ट महिन्याचा पगार 1 सप्टेंबरऐवजी 26 ऑगस्ट रोजीच खात्यात जमा होणार आहे. यामुळे सरकारी अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शैक्षणिक संस्था, कृषी व अकृषी विद्यापीठातील अधिकारी...

उल्हासनगरमध्ये शिवसेनेला निर्णायक बळ – वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांचा जाहीर पाठिंबा

0

उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय हालचालींमध्ये शिवसेनेला मोठे बळ मिळाले आहे. वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या नगरसेविका सुरेखा सोनवणे आणि नगरसेवक विकास खरात यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. या दोन्ही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. एकनाथ शिंदे साहेबांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही...

खोट्या यूपीआय पेमेंटचा प्रकार उघड! लोणावळ्यात गर्दीचा गैरफायदा घेत दुकानदारांची फसवणूक; पोलिसांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

0

लोणावळा | पावसाळी पर्यटन हंगामात फसवणूक वाढली पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली आहे. या गर्दीचा गैरफायदा घेत काही फसवणूकखोर दुकानदारांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. बनावट यूपीआय पेमेंट स्क्रीनशॉट दाखवून अनेक दुकानदारांची दिशाभूल करून वस्तू घेण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. सतर्क दुकानदारामुळे टळली मोठी फसवणूक कुमार चौकातील 'वीके वाईन शॉप' या दुकानात बुधवारी (दि. २५ जून) एक...

भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर कृतज्ञतेचा स्वर; देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन ठरले प्रेरणादायी

0

आदरणीय देवेंद्रजी, महानगरपालिका निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या नेत्रदीपक विजयानंतर आपण दिलेल्या लाखमोलाच्या शुभेच्छांबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. आपल्या या सदिच्छांमुळे विजयाचा आनंद खरोखरच द्विगुणित झाला आहे. हा विजय केवळ एक राजकीय यश नसून, जनतेच्या विश्वासाचा आणि आपल्या नेतृत्वावर असलेल्या अढळ श्रद्धेचा कौल आहे. आपले दूरदर्शी नेतृत्व, बहुमूल्य मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांवर असलेली आपली अपार श्रद्धा यामुळेच आज भाजप महाराष्ट्रात नव्या उंचीवर...

राज्यातील १७ हजार गावांना सामुदायिक वन हक्क देण्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भर; आदिवासी विकासासाठी त्वरित कार्यवाहीचे निर्देश

0

मुंबई : राज्यातील १७ हजार गावांना सामुदायिक वन हक्क मिळण्यास पात्र असून, आतापर्यंत ५ हजार गावांना सामुदायिक वन हक्क प्रदान करण्यात आले आहेत. उर्वरित गावांना लवकरात लवकर वन हक्क मिळवून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग व संबंधित यंत्रणांनी प्राधान्याने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षात वन हक्क कायदा २००६ च्या...

मिडनाईट पवना लेक कॉटेज – निसर्गाच्या सान्निध्यात शांततेचा अनुभव, ग्रीष्मकालीन सुट्टीसाठी परिपूर्ण ठिकाण!

0
Midnight Resort

"मिडनाईट पवना लेक कॉटेज" – निसर्गाच्या सान्निध्यात शांततेचा श्वास घ्या!पवना लेकच्या कुशीत अनुभव घ्या विश्रांती, निसर्ग, आणि निवांत क्षणांचा! तुमचं सिटी लाईफमधलं गडबडीतलं जीवन थोडं बाजूला ठेवा आणि निसर्गाच्या सान्निध्यात काही निवांत क्षण घालवा – तेही मिडनाईट पवना लेक कॉटेजमध्ये! पवना लेकच्या नयनरम्य किनाऱ्यावर वसलेलं हे कॉटेज म्हणजे शांतता, सौंदर्य आणि सुखद वास्तव्य यांचा परिपूर्ण संगम! प्रमुख वैशिष्ट्ये: 🌊 दृश्य सौंदर्य:पवना लेकच्या दरीतून...

Copyright ©