Breaking News
भारत ‘रिफॉर्म एक्सप्रेस’वर स्वार; २०२५ हे व्यापक सुधारणांचे ऐतिहासिक वर्ष – पंतप्रधानांचे मोठे विधान
नवी दिल्ली : भारत आज जागतिक पातळीवर आशा, विश्वास आणि संधीचे केंद्र म्हणून उदयास आला आहे. हे यश भारतीय जनतेतील नवोन्मेषाची वृत्ती, तरुणांची ऊर्जा आणि देशवासीयांच्या अटळ आत्मविश्वासामुळे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. जग आज भारताकडे केवळ मोठी अर्थव्यवस्था म्हणून नाही, तर वेगवान सुधारणांचा आदर्श मॉडेल म्हणून पाहत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान म्हणाले की, “मी अनेकांना...
१ ऑगस्ट ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून घोषित करा आमदार अमित गोरखे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
१ ऑगस्ट ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून घोषित करा आमदार अमित गोरखे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त, दिनांक १ ऑगस्ट हा ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याची मागणी आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पुणे येथे झालेल्या खंड प्रकाशन कार्यक्रमात केली. अण्णाभाऊंच्या लेखनाचे व्यापक सामाजिक महत्त्व अधोरेखित करत आमदार गोरखेंनी सांगितले की, “अण्णाभाऊंचे साहित्य हे केवळ शब्द नव्हते,...
पुणे: शाळेतील वाद चिघळला; नववीतील विद्यार्थ्याच्या गळ्यावर काच लावून हल्ला, 14 वर्षीय मुलावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल.
पुण्यातील मांजरी भागात एका शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाच्या वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या गळ्यावर वर्गातच काच लावून हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे शाळा परिसरात खळबळ उडाली असून, आरोपी 14 वर्षीय मुलावर हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपशील: ही घटना 20 नोव्हेंबर रोजी शाळेच्या वर्गात घडली. शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या तयारीवरून दोन विद्यार्थ्यांमध्ये...
“काश्मीरमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांसाठी राज्य सरकारचे मदतीचे हात — आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून हेल्पलाइन सुरू”
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे सध्या जम्मू आणि काश्मीर राज्यात मोठा तणाव निर्माण झाला आहे. या घटनेनंतर अनेक पर्यटक तिथल्या विविध भागांत अडकले आहेत. या संकटग्रस्त काळात महाराष्ट्र शासनाने तत्काळ सक्रिय होत राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरु केला असून, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी मदतीचे हात पुढे केले आहेत. मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून नागरिकांना २४ तास मदत मिळावी यासाठी 022-22027990 हा...
सोमाटणे-वारसोळी टोलनाके प्रकरणावर विधानसभा हादरली! सुनिल शेळके यांनी उपस्थित केला मुद्दा; दादा भुसे यांचे चौकशीचे आदेश
मुंबई, १६ जुलै २०२५ – मुंबई विधानसभेत आज मावळच्या जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा झाली. आमदार सुनिल अण्णा शेळके यांनी सोमाटणे आणि वारसोळी टोलनाक्यांतील अनियमितता, वाहतूक कोंडी, नागरिकांच्या मनस्तापाचा मुद्दा आक्रमकपणे मांडत सरकारचे लक्ष वेधले. यावर मंत्री दादा भुसे यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले. मुख्य मुद्दे: ▪️ सोमाटणे व वारसोळी टोलनाक्यांमधील अंतर फक्त ३१ किमी, नियमांनुसार किमान ६० किमी असणे अपेक्षित▪️ आरबीकडून कामात...
दुर्मीळ श्वसनमार्गातील हेमॅन्जिओमावर वेळेत उपचार; ८ महिन्यांच्या चिमुकलीला मिळाले नवे जीवन
मुंबई | १९ डिसेंबर – जन्मापासून श्वास घेण्यास त्रास सहन करणाऱ्या आठ महिन्यांच्या एका चिमुकलीला मुंबईतील नारायण हेल्थ SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये वेळेवर निदान व उपचारामुळे नवे आयुष्य मिळाले आहे. या बालिकेला अत्यंत दुर्मीळ आणि जीवघेण्या ठरू शकणाऱ्या ग्रेड-३ एअरवे हेमॅन्जिओमा या आजाराने ग्रासले होते. या आजारामुळे तिच्या श्वसनमार्गात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. परिणामी, तिला श्वास घेण्यास तीव्र अडचण,...
नाशिक-रायगडवर चर्चा सुरू, पण भंडाऱ्यात पालकमंत्रिपदाची उलथापालथ; पंकज भोयर यांची नवीन जबाबदारी
भंडारा : महायुती सरकारमध्ये नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाल्याची चर्चा रंगत असतानाच भाजपने अनपेक्षित पाऊल टाकत भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदात मोठा बदल केला आहे. मंत्री संजय सावकारे यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची भंडाऱ्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय सावकारे यांच्या कार्यप्रणालीबद्दल स्थानिक स्तरावर नाराजी होती....
अंबरनाथ पूर्वेत जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य; थेट संवादातून तातडीने निवारण
अंबरनाथ : लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी व्हावा तसेच सर्वसामान्यांच्या अडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने अंबरनाथ पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित भेटीगाठींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्या, मागण्या आणि सूचना मांडत जनसंपर्क कार्यालयात हजेरी लावली. या वेळी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, गटार स्वच्छता, मालमत्ता कर, वीजपुरवठा, आरोग्य सुविधा, शासकीय योजनांचा लाभ तसेच स्थानिक...
सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल : पत्नीला 4 कोटींचा मुंबई फ्लॅट दिला, 12 कोटी व BMW गाडीची मागणी फेटाळली
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष अधिकारांचा वापर करत एका प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाने पतीला आदेश दिला की, तो आपली पत्नीला 4 कोटी रुपये किमतीचा मुंबईतील फ्लॅट अलिमोनी (पोटगी) म्हणून द्यावा. मात्र, पत्नीने केलेली 12 कोटी रुपयांची आर्थिक भरपाई व BMW गाडीची मागणी कोर्टाने स्पष्टपणे फेटाळून लावली. या प्रकरणात पती-पत्नी यांच्यातील विवाह तुटल्यामुळे पत्नीने कोर्टात मोठी आर्थिक...
‘मराठी भाषा गौरव दिन’ आणि ‘मराठी राजभाषा दिन’ यामधील महत्त्वाचा फरक!
मराठी भाषा – अभिमान आणि अस्मितेचे प्रतीक!महाराष्ट्रात दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मराठी साहित्यिक कवीवर्य कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा आणि योगदानाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. यावर्षी हा सोहळा अधिक खास आहे, कारण मराठी भाषेला केंद्र सरकारकडून ‘अभिजात भाषा’ (Classical Language) म्हणून मान्यता...






