पुणेकरांनो लक्ष द्या! कासारसाई धरणाचा विसर्ग वाढणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणे | १९ ऑगस्ट २०२५, रात्री ८:३० :- पुणे जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणक्षेत्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर कासारसाई धरण ९९.२९% भरलेले असून, धरण व्यवस्थापनाने पाणीसाठा नियंत्रणासाठी विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या धरणातून १४८० क्युसेक्स पाणी सोडले जात आहे, मात्र आज रात्री १० वाजल्यापासून हा विसर्ग वाढवून १७७६ क्युसेक्स केला जाणार आहे. पाऊस कायम...
चीन भारताच्या तीन मोठ्या गरजा पूर्ण करणार – द्विपक्षीय संबंधात नवा अध्याय
भारत आणि चीन या आशियातील दोन महासत्ता देशांमध्ये गेल्या काही काळात तणावपूर्ण परिस्थिती होती. मात्र आता या दोन्ही देशांनी पुन्हा एकदा संबंध सुधारण्यासाठी पावले उचलली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताच्या तीन महत्त्वाच्या गरजा चीन पूर्ण करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या तीन गरजांमध्ये प्रामुख्याने आर्थिक सहकार्य, औद्योगिक गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा विकासाचा समावेश असल्याचे सांगितले जाते. भारताला आगामी काळात ऊर्जा, तंत्रज्ञान...
पुरस्थितीवर महापालिकेची सतत नजर : नागरिकांसाठी तातडीच्या मदतसेवा सज्ज
पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील अनेक धरणे १०० टक्के भरल्याने आणि सततच्या पावसामुळे नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आपली संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ मदतसेवा सुरू करण्यात आल्या आहेत. महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला असून, नागरिकांना आवाहन केले आहे की आपत्कालीन परिस्थितीत त्वरित 020-67331111 / 020-28331111 या...
एलपीएफचा अनोखा उत्सव : स्वातंत्र्य, सेवा आणि शिक्षणाचा संगम – पुण्यात ४ महत्त्वाचे सोहळे एकत्र साजरे
पुणे : लीला पूनावाला फाउंडेशन (एलपीएफ) ने १६ ऑगस्ट २०२५ रोजी एक ऐतिहासिक क्षण घडवला. ७९ वा स्वातंत्र्य दिन, फाउंडेशनचा उल्लेखनीय ३० वर्षांचा प्रवास, ‘इन्स्पिरा’ न्यूजलेटरची ६५ वी आवृत्ती आणि रक्तदान मोहीम – हे चार महत्त्वपूर्ण सोहळे एकत्र साजरे करून एलपीएफने एकतेचा, सेवाभावाचा आणि प्रगतीचा सुंदर संगम घडवून आणला. 🔹 भव्य आयोजन हा कार्यक्रम भारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्स,...
ज्ञानोबा-तुकाराम जयघोषात दुमदुमला टाळगाव-चिखली परिसर महापालिकेच्या शाळेत रंगला भक्ती, एकात्मता आणि परंपरेचा अद्भुत संगम
पिंपरी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५० वी) जयंती वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळेत भक्तिमय वातावरणात भव्य पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने टाळगाव-चिखली परिसरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळा व महाविद्यालय परिसरातून ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत टाळ-मृदुंगाच्या गजरासह टाळ-चिपळ्यांचा नाद आणि विद्यार्थ्यांच्या अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. ‘ज्ञानोबा माऊली’ आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत सहभाग घेतला होता. महिला बचत गटांच्या सदस्यांनी, स्थानिक समाजसेवकांनी, वारकरी बांधवांनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली. वारकरी परंपरेतील पालखी सोहळा जसा श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे, तसाच तो एकात्मता आणि सामाजिक बंध दृढ करणारा सोहळा ठरला. पालखी सोहळ्याचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, समाज विकास विभाग उपायुक्त ममता शिंदे, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण कुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपिठाचे संचालक ह. भ. प. राजू महाराज ढोरे ,डॉ. स्वाती मुळे आणि शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यांच्या नियोजनामुळे आणि समन्वयामुळे संपूर्ण मिरवणूक सोहळा शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.
ऐतिहासिक लालमहल चौकात दहीहंडीचा जल्लोष; पुण्यात ‘डीजे-मुक्त दहीहंडी’ची नवी परंपरा सुरू
पुणे – गोकुळाष्टमीचा जल्लोष आणि गोविंदा-रे गोपाळाच्या जयघोषाने ऐतिहासिक लालमहल चौक पुन्हा एकदा थरारून गेला. हजारो पुणेकरांच्या उपस्थितीत पुणीत बालन ग्रुपने ‘डीजे-मुक्त दहीहंडी’चा अनोखा उपक्रम राबवून एक नवा आदर्श घालून दिला. ढोल-ताशा, बॅंड, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि गोविंदांच्या उत्साहाने परिसर दुमदुमून गेला. या सोहळ्यात राधेकृष्ण ग्रुपच्या खेळाडूंनी सात थर रचत दहीहंडी फोडण्याचा बहुमान पटकावला. पुण्यातील २६ सार्वजनिक मंडळांनी मिळून संयुक्त...
पंतप्रधान नरेंद्र मोदींची बेंगळुरूमध्ये मेट्रो सफर; आर. व्ही. रोड ते इलेक्ट्रॉनिक सिटी ‘यलो लाईन’चे लोकार्पण
बेंगळुरू | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळुरूमध्ये नव्या ‘यलो लाईन’ मेट्रो मार्गाचं लोकार्पण करताच, स्वतः या मेट्रोमधून प्रवास करून नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी आर. व्ही. रोड (रगिगुड्डा) येथून प्रवास सुरू करत, नव्याने उद्घाटन झालेल्या इलेक्ट्रॉनिक सिटी मेट्रो स्टेशनपर्यंत सफर केली. या प्रवासात त्यांनी सहप्रवाशांशी संवाद साधत, मेट्रोमुळे होणाऱ्या वेळेची बचत आणि सोयीसुविधांबाबत चर्चा केली. यलो लाईन मेट्रो प्रकल्प हा...
देवभूमीला नवसंजीवनी — ५ पवित्र ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी ८८२ कोटींचा भव्य आराखडा!
मुंबई | महाराष्ट्रातील ५ पवित्र ज्योतिर्लिंगांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. एकूण ₹८८२ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करून धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन आणि स्थानिक विकासाला एकाच वेळी चालना देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे केवळ मंदिर परिसराचा विकासच होणार नाही, तर भाविकांच्या सोयीसुविधा, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही गती मिळणार आहे. विकासाचा व्याप: या आराखड्यात...
मावळातील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर: वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर
मुंबई, ७ ऑगस्ट — मावळ तालुक्यातील वडगाव-कान्हे आणि लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालयांच्या आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीस मावळचे आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत कान्हे उपजिल्हा रुग्णालयात सुरू झालेल्या प्राथमिक आरोग्यसेवांबरोबरच लवकरच येथे सिटी-स्कॅन, एम.आर.आय, कॅथलॅब यांसारख्या अत्याधुनिक सुविधा...
दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया; निवडणुकीसाठी उत्साहात कार्यकर्ते
नागपूर :– आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकांसाठी दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध राजकीय पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्ते आज स्थानिक कार्यालयात एकत्रित झाले होते, जिथे त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या प्रक्रियेदरम्यान, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि उमेदवारांचे समर्पण स्पष्टपणे दिसून आले. अनेक स्थानिक नेते आणि समर्थक यांनी आपल्या उमेदवारांना शुभेच्छा देताना फोटो घेतले, ज्यामुळे...





