शैक्षणिक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ग्राऊंडवॉटर रिचार्ज स्ट्रक्चर्स अँड इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट’चे प्रकाशन
मुंबई :- सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन आणि एसटीएल यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या **‘ग्राऊंडवॉटर रिचार्ज स्ट्रक्चर्स अँड इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट’**चे प्रकाशन करण्यात आले. ग्रामीण भागातील जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने हा अहवाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे. ग्रामीण भागासाठी दिलासा देणारा अहवाल या अहवालामध्ये महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये उभारण्यात...
पुणेकरांनो लक्ष द्या! कासारसाई धरणाचा विसर्ग वाढणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणे | १९ ऑगस्ट २०२५, रात्री ८:३० :- पुणे जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणक्षेत्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर कासारसाई धरण ९९.२९% भरलेले असून, धरण व्यवस्थापनाने पाणीसाठा नियंत्रणासाठी विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या धरणातून १४८० क्युसेक्स पाणी सोडले जात आहे, मात्र आज रात्री १० वाजल्यापासून हा विसर्ग वाढवून १७७६ क्युसेक्स केला जाणार आहे. पाऊस कायम...
जाणीव, प्रशिक्षण आणि संशोधन – समृद्ध लोकशाहीचे त्रिसूत्र : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नागपूर : लोकशाही अधिक बळकट आणि समृद्ध करण्यासाठी जाणीव, प्रशिक्षण आणि संशोधन या तीन घटकांचा समन्वय आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या माध्यमातून राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना विधिमंडळातील प्रशिक्षण मिळते, त्यामुळे कायदे कसे बनतात, संसदीय प्रक्रिया कशा प्रकारे चालतात याचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त होते. अशा उपक्रमांमुळे लोकशाही अधिक समृद्ध...
रणांगणातील खऱ्या योद्ध्यांचा अढळ निर्धार – उन्हा-पावसाची पर्वा न करता लढणारे मराठे!
एकदा रणात उतरल्यावर मराठा योद्धे कोणत्याही अडचणींची पर्वा करत नाहीत. मग तो कडाक्याचा उन्हाळा असो वा संततधार पाऊस, त्यांच्या ध्येयासाठी लढण्याची जिद्द आणि शक्ती कधीही कमी होत नाही. मराठ्यांच्या रक्तातच धैर्य, पराक्रम आणि चिकाटी ओतप्रोत भरलेली आहे. इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी गड-किल्ले वाचवण्यासाठी कितीही संकटे सोसली, तरी मागे हटले नाहीत. आजही मराठा समाजातील युवक, शेतकरी, सैनिक, क्रीडापटू, तसेच समाजकारणात...
अकोला निवडणुकांत विकासाचा बिगुल! ‘संविधान दिना’ला अकोटमध्ये गर्जले अजित पवार — “अकोट-अकोल्याचा कायापालट आम्ही हमखास करणार”
अकोला जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दमदार भाषण करत संविधान दिनानिमित्त नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. भारताचे संविधान देणारे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आणि “जगातलं सर्वोत्तम संविधान भारताला लाभलं आहे” असे सांगत बाबासाहेबांच्या कार्याचे स्मरण केले. सभेला नागरिक, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांमध्ये मोठी उत्सुकता होती...
विचारांशी तडजोड नाही! अनेक पक्षांच्या ऑफर धुडकावून प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; टिळक भवनमध्ये भव्य सत्कार सोहळा
पुणे | प्रतिनिधी — पुण्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन येथे हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशांत जगताप यांच्यासोबत पुण्यातील...
राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जम्मू कश्मीरकडे रवाना
जम्मू येथील वैष्णो धाम, कालिका धाम येथे होणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा १९ वर्षाखालील मुला-मुलींचा संघ रवाना झाला. या संघाला क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले, क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यापूर्वी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने श्री विठ्ठलराय जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे क्रीडा संकुल, डेरवण (ता....
ज्ञानोबा-तुकाराम जयघोषात दुमदुमला टाळगाव-चिखली परिसर महापालिकेच्या शाळेत रंगला भक्ती, एकात्मता आणि परंपरेचा अद्भुत संगम
पिंपरी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५० वी) जयंती वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळेत भक्तिमय वातावरणात भव्य पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने टाळगाव-चिखली परिसरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळा व महाविद्यालय परिसरातून ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत टाळ-मृदुंगाच्या गजरासह टाळ-चिपळ्यांचा नाद आणि विद्यार्थ्यांच्या अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. ‘ज्ञानोबा माऊली’ आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत सहभाग घेतला होता. महिला बचत गटांच्या सदस्यांनी, स्थानिक समाजसेवकांनी, वारकरी बांधवांनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली. वारकरी परंपरेतील पालखी सोहळा जसा श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे, तसाच तो एकात्मता आणि सामाजिक बंध दृढ करणारा सोहळा ठरला. पालखी सोहळ्याचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, समाज विकास विभाग उपायुक्त ममता शिंदे, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण कुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपिठाचे संचालक ह. भ. प. राजू महाराज ढोरे ,डॉ. स्वाती मुळे आणि शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यांच्या नियोजनामुळे आणि समन्वयामुळे संपूर्ण मिरवणूक सोहळा शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.
महापालिकेच्या तालेरा रुग्णालयात फियाट कंपनीच्या सीएसआर निधीद्वारे उभारलेल्या अत्याधुनिक डायलिसिस सेंटरचे उदघाटन
पिंपरी, दि. २१ ऑगस्ट २०२५ :- पिंपरी चिंचवड महापालिकेचा उद्देश सर्वसामान्य नागरिकांना आधुनिक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. तालेरा रुग्णालयात सुरू झालेले हे डायलिसिस सेंटर म्हणजे त्याच दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सुविधेमुळे मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांना जवळच मिळणा-या या सुविधेमुळे त्यांची धावपळ कमी होण्यास मदत होईल असे प्रतिपादन...
रहस्यमय मृत्यूचे गूढ उलगडले – भिंतीवरचा अर्धवट पासवर्ड ठरला धागा
मुंबई : गोरेगाव ओबेरॉय स्क्वेअर कॉम्प्लेक्समध्ये 14 ऑगस्ट रोजी घडलेल्या 17 वर्षीय प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीच्या मृत्यूने संपूर्ण शहर हादरले होते. 23व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केले जात होते. मात्र, पोलिसांच्या तपासानंतर या मृत्यूचे गूढ उलगडले असून, हा प्रकार आत्महत्या नसून दुर्दैवी अपघात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही तरुणी अकरावीमध्ये शिक्षण घेत होती आणि पुढील उच्च शिक्षणासाठी...







