जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवली, खोऱ्यात शांतता परत आली, पर्यटन क्षेत्रात मोठी तेजी.
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवली, खोऱ्यात शांतता परत आली, पर्यटन क्षेत्रात मोठी तेजी.
मुंबई महापालिका निवडणूक : मुलुंड पश्चिम प्रभाग १०७ मधून डॉ. नील सोमय्या यांचा उमेदवारी अर्ज दाखल
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, आज भाजपचे युवा नेते डॉ. नील सोमय्या यांनी मुलुंड पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १०७ मधून आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला. या अर्ज दाखल कार्यक्रमावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या, आमदार मिहीर कोटेचा तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर डॉ. नील सोमय्या यांनी माध्यमांशी...
अदानी पॉवर आणि भूतान सरकारमध्ये ६०,००० कोटींचा करार; ५७० मेगावॅट वांगचू जलविद्युत प्रकल्प २०२६ पासून सुरू होणार
नवी दिल्ली | भारतीय ऊर्जा क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत अदानी पॉवर कंपनीने भूतानच्या ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन (DGPC) सोबत ५७० मेगावॅट क्षमतेच्या वांगचू जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामासाठी तब्बल ६०,००० कोटी रुपयांचा करार केला आहे. या करारामुळे भारत-भूतान ऊर्जा सहकार्यात नवा टप्पा सुरू होणार असून, दोन्ही देशांच्या ऊर्जाक्षेत्रातील नातेसंबंध अधिक बळकट होतील. प्रकल्पाचे महत्त्वभूतानच्या पर्वतीय भागात उभारण्यात येणारा हा प्रकल्प २०२६...
पुणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत विकासकामांना वेग; ५४ किमी भुयारी मार्ग, अतिक्रमण निर्मूलन आणि वाहतूक सुधारणा यावर भर
पुणे : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची मानली जाणारी जिल्हा नियोजन समिती (DPC) बैठक आज उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रावहिनी पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील विविध पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, शासकीय योजना आणि प्रलंबित विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून विकासकामांना अधिक गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
‘सत्य’ विरुद्ध ‘सत्ता’! भारतीय राजकारणाच्या वाटचालीवर कन्हैया कुमार यांचे परखड मत
📍 पुणे | १० फेब्रुवारी २०२५ राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून सत्यासाठी असले पाहिजे! असे स्पष्ट मत राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI) चे राष्ट्रीय प्रभारी कन्हैया कुमार यांनी व्यक्त केले. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४व्या भारतीय विद्यार्थी संसदेत ते बोलत होते. यावेळी “भारतीय राजकारणाची विचारसरणी – डावा, उजवा की अस्पष्ट?” या चर्चासत्रात त्यांनी...
ज्ञानोबा-तुकाराम जयघोषात दुमदुमला टाळगाव-चिखली परिसर महापालिकेच्या शाळेत रंगला भक्ती, एकात्मता आणि परंपरेचा अद्भुत संगम
पिंपरी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५० वी) जयंती वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळेत भक्तिमय वातावरणात भव्य पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने टाळगाव-चिखली परिसरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळा व महाविद्यालय परिसरातून ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत टाळ-मृदुंगाच्या गजरासह टाळ-चिपळ्यांचा नाद आणि विद्यार्थ्यांच्या अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. ‘ज्ञानोबा माऊली’ आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत सहभाग घेतला होता. महिला बचत गटांच्या सदस्यांनी, स्थानिक समाजसेवकांनी, वारकरी बांधवांनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली. वारकरी परंपरेतील पालखी सोहळा जसा श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे, तसाच तो एकात्मता आणि सामाजिक बंध दृढ करणारा सोहळा ठरला. पालखी सोहळ्याचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, समाज विकास विभाग उपायुक्त ममता शिंदे, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण कुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपिठाचे संचालक ह. भ. प. राजू महाराज ढोरे ,डॉ. स्वाती मुळे आणि शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यांच्या नियोजनामुळे आणि समन्वयामुळे संपूर्ण मिरवणूक सोहळा शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.
धनश्री रुग्णालयात नव्या वैद्यकीय सोयीसुविधांचा समावेश, रुग्णांसाठी एक मोठे पाऊल!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यातील मोशी येथील ‘धनश्री रुग्णालया’चे डिजिटल उदघाटन संपन्न झाले. धनश्री रुग्णालयाला शुभेच्छा देताना ते म्हणाले, "इथे आलेला प्रत्येक रुग्ण पूर्णतः बरा व्हावा आणि त्याला पुन्हा रुग्णालयात येण्याची गरज पडू नये, असे यश धनश्री रुग्णालयाला लाभो." या रुग्णालयात विविध वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्या रुग्णांसाठी निश्चितच उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महापालिकेच्या वतीने वाहण्यात आली आदरांजली
पिंपरी, दि. २८ जानेवारी २०२६ - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, शहर अभियंता मकरंद निकम,नगररचना उपसंचालक किशोर गोखले,मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण...
श्रीतुळजाभवानी मंदिराच्या विकासाला गती; नवरात्रौत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजनाची घोषणा!
धाराशिव (१७ जून): महाराष्ट्रातील श्रद्धास्थान असलेल्या श्रीतुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी १,८६५ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी तुळजापूर विकास प्रकल्प हाती घेण्यात आला असून, याचे भूमिपूजन येत्या नवरात्रौत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. ही माहिती परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिली. या बैठकीस आमदार कैलास...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ‘संकल्प पत्र’ जाहीर; शेतकरी कर्जमाफीपासून २५ लाख रोजगार निर्मितीपर्यंत, महाराष्ट्राच्या विकासाचे २५ आश्वासन.
मुंबई, १० नोव्हेंबर २०२४ – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे ‘संकल्प पत्र’ मुंबईत जाहीर केले आहे. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि इतर भाजप नेते उपस्थित होते. शहा यांनी सांगितले की, या संकल्प पत्रात महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षांचा विचार करून आश्वासने दिली...













