भारताची पहिली लांब पल्ल्याची हायपरसोनिक क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी; उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानातील देशांच्या गटात स्थान मिळवले.
नवी दिल्ली : भारताने लांब पल्ल्याच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली असून, ही चाचणी भारतीय संरक्षण तंत्रज्ञानात ऐतिहासिक टप्पा मानली जात आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल माहिती दिली. हे क्षेपणास्त्र १५०० किमीपेक्षा जास्त अंतरावर विविध प्रकारचे वॉरहेड्स नेण्यास सक्षम आहे, ज्यामुळे भारतीय लष्कराच्या क्षमतांमध्ये मोठी भर पडली आहे. भारताच्या संरक्षण तंत्रज्ञानातील ऐतिहासिक कामगिरी या चाचणीमुळे भारत हायपरसोनिक...
के.सी. वेणुगोपालांचा भाजपवर पलटवार : “अमित शहा गुजरातचे गृहमंत्री होते आणि त्यांना अटक झाली होती, आम्हाला नैतिकता शिकवू नका!”
काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेत्यांकडून सतत "नैतिकता" या मुद्द्यावर भाष्य होत असताना, वेणुगोपाल यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उल्लेख करत त्यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, "अमित शहा हे गुजरातचे गृहमंत्री होते आणि त्यांना अटक झाली होती. त्यामुळे भाजपकडून आम्हाला नैतिकतेचे धडे देण्याची आवश्यकता नाही." त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली...
चारोली परिसरात बिबट्याचा वावर! नागरिकांनी घ्यावी काळजी, वनविभाग सज्ज
चारोली बुद्रुक परिसरातील दाभाडे वस्तीमध्ये बिबट्या मादी आणि तिची दोन बछडी आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत वनविभागाने तात्काळ कारवाई सुरू केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. वनविभागाचे अधिकारी श्री. ई. आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच आमचे सहकारी श्री. अनिकेत गायकवाड यांच्या सहकार्याने ट्रॅप कॅमेरे व यंत्रणा...
पावसाळी अधिवेशन २०२५ – आठवडा २, दिवस २ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान भवनात सकाळी आगमन!
मुंबई – महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी १०.४५ वाजता विधान भवनात दाखल झाले. मुंबईतील विधान भवन परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त आणि राजकीय हालचालींना वेग आला आहे. आजच्या दिवशी महत्त्वाचे विधेयक मांडले जाण्याची शक्यता असून, अनेक विरोधी पक्षनेत्यांनी शेतकरी कर्जमाफी, महागाई, पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, महिला सुरक्षेचा मुद्दा आणि बेरोजगारी यावर चर्चा करण्याची...
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रासाठी शासनाची नवी कार्यपद्धती – हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदींवर आधारित निर्णय
मुंबई, दि. २ सप्टेंबर : मराठा समाजाच्या दीर्घकाळच्या मागणीला प्रतिसाद देत महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने स्पष्ट कार्यपद्धती जाहीर केली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढलेल्या या शासन निर्णयामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी मा. न्यायमूर्ती...
शिवसेनेच्या निष्ठेची प्रेरणा बाळासाहेबांकडूनच मिळाली – अंबादास दानवे यांची भावनिक प्रतिक्रिया
विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेतील आपली टर्म संपत असताना दिलेल्या वक्तव्यात अत्यंत भावनिक आणि ठाम भूमिका मांडली आहे. "मी कार्यकर्ता आहे, शिवसैनिक आहे. मी इथे येणार नसलो तरी माझ्या बाकीच्या मॅचेस चालू राहतील," असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी शिवसेनेप्रतीची निष्ठा अधोरेखित केली. दानवे यांनी सांगितले की, "शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला २००० साली बोलावले होते. शहरप्रमुख पदासाठी...
त्वष्टा कासार वाचनालय, कसबा पेठ, पुणे – माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिन” साजरा
पुणे : त्वष्टा कासार वाचन मंदिर, कसबा पेठ येथे आज माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान कसबा संस्कार वर्गाचे संचालक श्री. अनिल दिवाणजी व सौ. अनघा दिवाणजी उपस्थित राहून कलाम यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून त्यांचे स्मरण केले. कार्यक्रमात कसबा संस्कार वर्गातील ४० मुलांना पुस्तके व खाऊ वाटप करण्यात आले....
“जोडी तुटायची नाही, साथ सुटायची नाही!” – देवेंद्र फडणवीस व अजित दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व, संयम, आणि विकासदृष्टी या सर्वांचा संगम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन बड्या नेत्यांचा आज वाढदिवस! राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेक मान्यवरांकडून, कार्यकर्त्यांकडून आणि जनतेकडून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत. "जोडी तुटायची नाही, साथ सुटायची नाही" या शब्दांत त्यांच्या सुसंवाद, सहकार्य आणि विकासाच्या धोरणांतील एकरूपतेचं वर्णन अनेकांनी केलं आहे. दोघांनीही एकमेकांवरचा विश्वास,...
पुण्यातील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा; चार पदरी भुयारी मार्ग प्रकल्पासाठी 550 कोटींचा प्रस्ताव सादर
पुणे – पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे भेटीदरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी शहरासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या चार पदरी भुयारी मार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव गडकरी यांच्याकडे सादर केला. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते. हा प्रकल्प शिवाजी...
मतदान जनजागृतीच्या ब्रँड ॲम्बेसिडर श्रेया बुगडे यांच्या उपस्थितीत दुर्गादेवी टेकडीच्या पायथ्याशी लोकशाहीचा जागर
पिंपरी, दि. १० जानेवारी २०२६ :- अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या माध्यमातून करण्यात येणारी मतदान जनजागृती… ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ अशा जोशपूर्ण घोषणांनी दुमदुमलेला परिसर… आणि लोकशाहीच्या जागृतीसाठी निघालेली शेकडो जणांची प्रभातफेरी…असे उत्साहपूर्ण वातावरण आज सकाळी निगडी येथील दुर्गादेवी टेकडीच्या पायथ्याशी निर्माण झाले होते. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि प्रत्येक मतदाराला मतदानाच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी...












