राजकीय

Home राजकीय Page 7

‘ऊर्जासंपन्न महाराष्ट्र’चा आणखी एक टप्पा पूर्ण! तिल्लारी जलविद्युत प्रकल्पासाठी 1008 कोटींचा सामंजस्य करार – 240 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारणार

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि हरित भविष्यासाठी घेतल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण पावलांपैकी एक म्हणजे तिल्लारी उदंचन जलविद्युत प्रकल्प. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभाग आणि श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था, वारणानगर यांच्यात आज 240 मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या सामंजस्य करारामुळे केवळ ऊर्जा उत्पादनास गती मिळणार नाही, तर 1008...

*”मुख्य मंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्तआमदार अमित गोरखे यांचे सामाजिक उत्तरदायित्व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांचे योगदान!”

*"मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमित गोरखे यांचे सामाजिक उत्तरदायित्व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांचे योगदान!"* मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा सन्मान करीत व त्यांच्या 'उत्सव नव्हे, उत्तरदायित्व!' या मुख्यमंत्र्यांच्या  प्रेरणादायी संकल्पनेनुसार आमदार श्री. अमित गोरखे यांनी एक सामाजिक बांधिलकी जोपासली. आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस...

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रासाठी शासनाची नवी कार्यपद्धती – हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदींवर आधारित निर्णय

मुंबई, दि. २ सप्टेंबर : मराठा समाजाच्या दीर्घकाळच्या मागणीला प्रतिसाद देत महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने स्पष्ट कार्यपद्धती जाहीर केली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढलेल्या या शासन निर्णयामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी मा. न्यायमूर्ती...

हिंजवडी वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास; PMRDA कडून १६६ अतिक्रमणांवर कारवाई!

पुणे (हिंजवडी): पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA)ने हिंजवडी आणि आजूबाजूच्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. रोजच्या जीवघेण्या वाहतूक कोंडीला प्रतिबंध घालण्यासाठी पीएमआरडीएने सखोल पावले उचलत, गेल्या १५ दिवसांत तब्बल १६६ अतिक्रमण हटवून वाहतूक व्यवस्थेला दिलासा दिला आहे. हिंजवडी हा पुण्याचा प्रमुख आयटी हब असल्यामुळे येथे दररोज लाखो कर्मचारी ये-जा करतात. यामुळे रस्त्यांवरील अतिक्रमण, अनधिकृत बांधकामं आणि होर्डिंग्जमुळे प्रचंड...

मराठा समाजासाठी ऐतिहासिक विजय! महायुती सरकारचा आरक्षणविषयक निर्णय लागू, ग्रामपातळीवर कुणबी प्रमाणपत्रासाठी मार्ग मोकळा

महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक दशकांपासून चाललेल्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. आज महायुती सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील अनेक महत्वाच्या मागण्या मान्य केल्या असून, हा दिवस मराठा समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक मानला जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून मराठा समाजाने सातत्याने आरक्षणासाठी आंदोलन केले. या आंदोलनाच्या मागे सामाजिक न्याय, आर्थिक उन्नती आणि समान संधी सुनिश्चित करण्याची महत्त्वाची गरज होती. तत्कालीन मुख्यमंत्री...

पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवॉर; गोळीबारात तरुणाचा मृत्यू

पुणे | गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे शहर हादरवणारी मोठी घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात झालेल्या गँगवॉरमुळे वातावरण ढवळून निघाले आहे. या गँगवॉरमध्ये गोळीबार झाला असून, त्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाना पेठेत झालेल्या गोळीबारात वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा...

के.सी. वेणुगोपालांचा भाजपवर पलटवार : “अमित शहा गुजरातचे गृहमंत्री होते आणि त्यांना अटक झाली होती, आम्हाला नैतिकता शिकवू नका!”

काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेत्यांकडून सतत "नैतिकता" या मुद्द्यावर भाष्य होत असताना, वेणुगोपाल यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उल्लेख करत त्यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, "अमित शहा हे गुजरातचे गृहमंत्री होते आणि त्यांना अटक झाली होती. त्यामुळे भाजपकडून आम्हाला नैतिकतेचे धडे देण्याची आवश्यकता नाही." त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली...

“न्यायाच्या सर्वोच्च शिखरावर नागपूरचा ठसा – सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या जिव्हाळ्याच्या शहरात भावूक सत्कार!”

नागपूर – न्यायालयीन क्षेत्रातील सर्वोच्च पद भूषवणाऱ्या सरन्यायाधीश भूषण गवई यांचा नागपूर जिल्हा वकील संघटनेतर्फे भव्य सत्कार समारंभ नुकताच जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडला. या कार्यक्रमात सरन्यायाधीश गवई यांनी नागपूरच्या त्यांच्या वाटचालीतील योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि आपल्या न्यायालयीन कारकिर्दीच्या भावनिक आठवणी शेअर केल्या. गवई म्हणाले, “दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनी आई-वडीलांसह दीक्षाभूमीवर येणं ही जणू श्रद्धेची परंपरा होती. वकिलीच्या...

मुंबई: पोलीस शिपायाने पोस्टल मतदार चिठ्ठीचे सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले; निवडणूक प्रक्रियेच्या पवित्रतेला धक्का.

मुंबई : निवडणूक प्रक्रियेच्या गोपनीयतेला धक्का देणाऱ्या एका प्रकरणात, मुंबईतील एका पोलीस शिपायावर कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक शस्त्र पोलीस विभागातील पोलीस शिपाई गणेश शिंदे याने पोस्टल मतदार चिठ्ठीचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केल्याने, निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपशील: गणेश शिंदे, बीड जिल्ह्यातील अस्ती मतदारसंघाचा मतदार असून, मुंबईतील ताडदेव येथील...

मावळातील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर: वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर

मुंबई, ७ ऑगस्ट — मावळ तालुक्यातील वडगाव-कान्हे आणि लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालयांच्या आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीस मावळचे आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत कान्हे उपजिल्हा रुग्णालयात सुरू झालेल्या प्राथमिक आरोग्यसेवांबरोबरच लवकरच येथे सिटी-स्कॅन, एम.आर.आय, कॅथलॅब यांसारख्या अत्याधुनिक सुविधा...

Copyright ©