‘ऊर्जासंपन्न महाराष्ट्र’चा आणखी एक टप्पा पूर्ण! तिल्लारी जलविद्युत प्रकल्पासाठी 1008 कोटींचा सामंजस्य करार – 240 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारणार
मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि हरित भविष्यासाठी घेतल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण पावलांपैकी एक म्हणजे तिल्लारी उदंचन जलविद्युत प्रकल्प. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभाग आणि श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था, वारणानगर यांच्यात आज 240 मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या सामंजस्य करारामुळे केवळ ऊर्जा उत्पादनास गती मिळणार नाही, तर 1008...
*”मुख्य मंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्तआमदार अमित गोरखे यांचे सामाजिक उत्तरदायित्व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांचे योगदान!”
*"मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमित गोरखे यांचे सामाजिक उत्तरदायित्व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांचे योगदान!"* मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा सन्मान करीत व त्यांच्या 'उत्सव नव्हे, उत्तरदायित्व!' या मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणादायी संकल्पनेनुसार आमदार श्री. अमित गोरखे यांनी एक सामाजिक बांधिलकी जोपासली. आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस...
“जोडी तुटायची नाही, साथ सुटायची नाही!” – देवेंद्र फडणवीस व अजित दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व, संयम, आणि विकासदृष्टी या सर्वांचा संगम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन बड्या नेत्यांचा आज वाढदिवस! राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेक मान्यवरांकडून, कार्यकर्त्यांकडून आणि जनतेकडून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत. "जोडी तुटायची नाही, साथ सुटायची नाही" या शब्दांत त्यांच्या सुसंवाद, सहकार्य आणि विकासाच्या धोरणांतील एकरूपतेचं वर्णन अनेकांनी केलं आहे. दोघांनीही एकमेकांवरचा विश्वास,...
माळशिरस तालुक्यातील मरकडवाडी गावात बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी; प्रशासनाने परवानगी नाकारल्याने गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा, गावात संचारबंदी लागू.
सोलापूर, मरकडवाडी: माळशिरस तालुक्यातील मरकडवाडी गावात नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) प्रणालीवर अविश्वास व्यक्त करत गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या मागणीस नकार दिल्याने गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गावातील परिस्थिती बिघडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने २ डिसेंबर ते ५ डिसेंबर २०२४ या कालावधीत गावात संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी आणि कायदा...
पुण्यातील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा; चार पदरी भुयारी मार्ग प्रकल्पासाठी 550 कोटींचा प्रस्ताव सादर
पुणे – पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे भेटीदरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी शहरासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या चार पदरी भुयारी मार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव गडकरी यांच्याकडे सादर केला. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते. हा प्रकल्प शिवाजी...
मावळातील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर: वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर
मुंबई, ७ ऑगस्ट — मावळ तालुक्यातील वडगाव-कान्हे आणि लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालयांच्या आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीस मावळचे आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत कान्हे उपजिल्हा रुग्णालयात सुरू झालेल्या प्राथमिक आरोग्यसेवांबरोबरच लवकरच येथे सिटी-स्कॅन, एम.आर.आय, कॅथलॅब यांसारख्या अत्याधुनिक सुविधा...
“न्यायाच्या सर्वोच्च शिखरावर नागपूरचा ठसा – सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या जिव्हाळ्याच्या शहरात भावूक सत्कार!”
नागपूर – न्यायालयीन क्षेत्रातील सर्वोच्च पद भूषवणाऱ्या सरन्यायाधीश भूषण गवई यांचा नागपूर जिल्हा वकील संघटनेतर्फे भव्य सत्कार समारंभ नुकताच जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडला. या कार्यक्रमात सरन्यायाधीश गवई यांनी नागपूरच्या त्यांच्या वाटचालीतील योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि आपल्या न्यायालयीन कारकिर्दीच्या भावनिक आठवणी शेअर केल्या. गवई म्हणाले, “दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनी आई-वडीलांसह दीक्षाभूमीवर येणं ही जणू श्रद्धेची परंपरा होती. वकिलीच्या...
पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवॉर; गोळीबारात तरुणाचा मृत्यू
पुणे | गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे शहर हादरवणारी मोठी घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात झालेल्या गँगवॉरमुळे वातावरण ढवळून निघाले आहे. या गँगवॉरमध्ये गोळीबार झाला असून, त्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाना पेठेत झालेल्या गोळीबारात वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा...
त्वष्टा कासार वाचनालय, कसबा पेठ, पुणे – माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिन” साजरा
पुणे : त्वष्टा कासार वाचन मंदिर, कसबा पेठ येथे आज माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान कसबा संस्कार वर्गाचे संचालक श्री. अनिल दिवाणजी व सौ. अनघा दिवाणजी उपस्थित राहून कलाम यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून त्यांचे स्मरण केले. कार्यक्रमात कसबा संस्कार वर्गातील ४० मुलांना पुस्तके व खाऊ वाटप करण्यात आले....
हिंजवडी वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास; PMRDA कडून १६६ अतिक्रमणांवर कारवाई!
पुणे (हिंजवडी): पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA)ने हिंजवडी आणि आजूबाजूच्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. रोजच्या जीवघेण्या वाहतूक कोंडीला प्रतिबंध घालण्यासाठी पीएमआरडीएने सखोल पावले उचलत, गेल्या १५ दिवसांत तब्बल १६६ अतिक्रमण हटवून वाहतूक व्यवस्थेला दिलासा दिला आहे. हिंजवडी हा पुण्याचा प्रमुख आयटी हब असल्यामुळे येथे दररोज लाखो कर्मचारी ये-जा करतात. यामुळे रस्त्यांवरील अतिक्रमण, अनधिकृत बांधकामं आणि होर्डिंग्जमुळे प्रचंड...












