“परवापर्यंतचा हसरा सहवास आज आठवणींतच उरला” – एकनाथ शिंदेंची अजितदादांना भावपूर्ण आदरांजली
मुंबई | प्रतिनिधी परवापर्यंत ज्यांच्या सहवासात हसणं, चर्चा, निर्णय आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठीची स्वप्नं होती, त्या सहवासाला आज कायमचा पूर्णविराम मिळाला आहे. स्व. अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करताना मन असंख्य आठवणींच्या कल्लोळात हरवून गेलं, अशा भावनांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. “दादांना आदरांजली वाहताना त्यांच्यासोबत घालवलेले क्षण, संघर्षाचे दिवस, निर्णयांचे क्षण आणि जनतेसाठी केलेले अथक प्रयत्न...
“महाराष्ट्रातील उत्कृष्ट तपास कार्याचा गौरव! ११ पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान”
पुणे (दि. १३ जून २०२५) – महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलातील उत्कृष्ट कार्यक्षमतेचा सन्मान करत ११ पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान करण्यात आले. पोलीस संशोधन केंद्र, पुणे येथे आयोजित या भव्य समारंभात महाराष्ट्र राज्याच्या मा. पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या पुरस्कारासाठी निवडले गेलेले पोलीस अधिकारी यांनी खून, दरोडा, जबरी...
राष्ट्रीय बाल आरोग्य मोहीम : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भव्य शुभारंभ!
राज्यातील बालकांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी राज्य सरकारने राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत विशेष तपासणी मोहीमेचा शुभारंभ केला आहे. उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते औंध येथील इंदिरा गांधी मॉडेल स्कूलमध्ये या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी मंचावर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,...
स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करण्याची गरज – राज्यपाल
पुणे : निसर्गोपचार, आयुर्वेद, आपली पूर्वीची जीवनशैली, नैसर्गिक शेती तसेच आपल्या जीवनमूल्यांना पुन्हा अवलंबल्यास स्वस्थ भारत बनवू शकू, असा विश्वास राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केला. या कामात निसर्गोपचार वैद्यक व्यवसायी, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतील, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणे अंतर्गत येवलेवाडीतील निसर्गग्राम येथे आयोजित आठव्या निसर्गोपचार दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय आयुष राज्यमंत्री...
महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत राजकीय समीकरणे बदलली; लोक जनशक्ती पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा देत राज्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण दिले आहे. या निर्णयामुळे लोकहिताच्या, विकासाभिमुख आणि सर्वसमावेशक राजकारणाला बळ मिळाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, सामाजिक न्यायासाठी आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर ठामपणे भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र येऊन ही लढाई थेट जनतेसाठी लढली जाणार असल्याचा निर्धार...
“औंधमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत! RBI कॉलनी–सिंध सोसायटीला सतर्क राहण्याचे आवाहन; वनविभाग, RESQ टीम सतत गस्तीवर”
पुणे : औंध परिसरात रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने रहिवाशांमध्ये मोठी भीती आणि संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषतः RBI कॉलनी, सिंध सोसायटी आणि स्पायसर कॉलेज परिसरात या घटनेची सर्वाधिक चर्चा सुरू असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिबट्याचे दर्शन आणि वनविभागाची तातडीची धाव पहाटे बिबट्या पाहिल्याची माहिती मिळताच,✔️ पुणे वनविभाग✔️ RESQ CT टीम दोन्ही तात्काळ घटनास्थळी दाखल...
एसपीपीयूचा मोठा निर्णय! संलग्न महाविद्यालयांची तीन टप्प्यात तपासणी – शैक्षणिक आणि प्रशासकीय ऑडिट सुरू
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) आपल्या संलग्न महाविद्यालयांचे आणि संस्थांचे विस्तृत शैक्षणिक आणि प्रशासकीय ऑडिट हाती घेतले आहे. या आधी 2022 मध्ये फक्त शैक्षणिक ऑडिट करण्यात आले होते, मात्र यावेळी तिन्ही प्रकारच्या अनुषंगिक गोष्टींची सखोल तपासणी केली जाणार आहे. ऑडिटमध्ये कोणकोणते घटक तपासले जाणार? एसपीपीयूच्या प्रो व्हाइस चान्सलर डॉ. पराग कलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ऑडिट प्रशासकीय, शैक्षणिक आणि...
पुण्यात थंडीला तात्पुरता दिलासा; १९ डिसेंबरपासून पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता
पुणे | गेल्या आठवडाभरापासून तीव्र थंडीचा सामना करणाऱ्या पुणेकरांना बुधवारी रात्री तात्पुरता दिलासा मिळाला. शहरात किमान तापमान दुहेरी अंकात नोंदवले गेले असून, शिवाजीनगर येथे किमान तापमान १०.९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. मात्र, हवामान तज्ज्ञांच्या मते हा दिलासा अल्पकालीन असून १९ डिसेंबरपासून पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही थंडी २०२५ वर्षाच्या अखेरपर्यंत टिकून राहण्याची चिन्हे आहेत. सध्या पुणे...
सराईत गुन्हेगार दीपक काटेच्या उपस्थितीवरून विरोधकांचा सवाल; बावनकुळे यांच्या शिष्टमंडळात गुन्हेगाराचा सहभाग उघड
मुंबई | भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शिष्टमंडळात एका सराईत गुन्हेगाराच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत बावनकुळे यांच्या शेजारी दिसणारा व्यक्ती दीपक काटे असून, त्याच्यावर स्वतःच्या चुलत भावाच्या खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. खुन, मारहाण, धमकीसारखे गुन्हे असलेल्या व्यक्तीचा राजकीय गाडीतून वावर दीपक काटे हा एक ‘सराईत गुन्हेगार’...
पुण्यातील थंडी कायम राहणार; नववर्षात आणखी गारठा वाढण्याचा इशारा – हवामान विभाग
पुणे | प्रतिनिधी — गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि राज्यात जाणवणारी थंडी पुढील काही दिवस कायम राहणार असून, नववर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात गारठा आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. त्यामुळे यंदाचा हिवाळा अधिक काळ टिकणार असून, पुणेकरांना सुखद पण बोचरी थंडी अनुभवायला मिळणार आहे. उत्तरेकडून वाहणारे थंड वारे, स्वच्छ आकाश आणि कोरडे हवामान यामुळे...






