0
0
0
0
0

सामाजिक

Home सामाजिक Page 197

मुंबईत मुसळधार पावसाचा फटका; लोकल रेल्वेची गती थांबली, नालासोपारा स्थानक पाण्याखाली

0

मुंबई : मुंबईकरांसाठी जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेन सेवेला पुन्हा एकदा पावसाचा मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आज सकाळी नालासोपारा रेल्वे स्थानक परिसर जलमय झाला. पाणी साचल्यामुळे रेल्वे रुळ पूर्णपणे बुडाले आणि लोकल गाड्यांची गती मंदावली. प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. 🔹 नालासोपारा स्टेशन जलमय नालासोपारा स्थानकावर पावसाचे पाणी इतक्या प्रमाणात साचले आहे...

पुणे : सेठ हिराचंद नेमचंद ट्रस्ट प्रकरणात ‘स्टेटस क्वो’ आदेश ३० ऑक्टोबरपर्यंत वाढविण्याचा धर्मादाय आयुक्तांचा निर्णय

0

पुणे | २८ ऑक्टोबर २०२५ पुण्यातील सुप्रसिद्ध सेठ हिराचंद नेमचंद मेमोरियल ट्रस्ट (PTR No. E-1634) या प्रकरणात महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त अमोल कलोटी यांनी पूर्वी दिलेला “Status Quo” (स्थिती कायम ठेवावी) हा आदेश कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून, या आदेशाची मुदत आता ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या प्रकरणात अर्जदारांच्या वतीने अॅड. योगेश पांडे यांनी बाजू मांडली, तर प्रत्युत्तरदार...

शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे : "कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत शेतीकडे वाटचाल करणे हेच या योजनांचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेस चालना देण्यासाठी जिल्हास्तरावर सुसंगत आणि परिणामकारक योजना राबविण्यात याव्यात," असे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.              उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज "दिशा कृषी उन्नतीची @2029" आणि "कृषी समृद्धी योजना 2025-26" या...

पनवेलकरांना दिलासा! महापालिकेकडून ‘अभय योजना’ जाहीर – करदात्यांना ९०% पर्यंत शास्तीमाफीचा लाभ

0

पनवेल महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पनवेल महापालिकेने मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांसाठी "अभय योजना" जाहीर केली असून, या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना २५ ते ९० टक्क्यांपर्यंत शास्तीमाफी (दंडमाफी) दिली जाणार आहे. ही योजना चार टप्प्यांत राबवली जाणार असून, १८ जुलै ते १५ ऑगस्ट २०२५ या पहिल्या टप्प्यात कर भरल्यास नागरिकांना थकबाकीवरील शास्तीवर ९०% सूट मिळणार...

नागपूर येथील लेखकाकडून तब्बल १०० बनावट बॉम्ब धमक्या; विमाने, रेल्वे आणि सरकारी कार्यालये निशाण्यावर.

0

नागपूर: नागपूरच्या ३५ वर्षीय लेखक जगदीश उईके याने देशातील विविध विमाने, पंतप्रधान कार्यालय आणि महत्त्वाच्या सरकारी अधिकाऱ्यांना तब्बल १०० बनावट बॉम्ब धमक्या दिल्याने नागपूर सायबर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. उईकेने जानेवारीपासून वेळोवेळी ईमेलद्वारे बनावट धमक्या पाठवून संपूर्ण देशभरातील सुरक्षा यंत्रणांना चकवा दिला. अलीकडेच ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात उईकेने ३० ठिकाणी बॉम्ब धमक्यांची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पुन्हा धोक्याची सूचना, नागपुरातून...

जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं..

0

पिंपरी, ९ सप्टेंबर २०२५: पिंपरी चिंचवड महापालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा डॉजबॉल स्पर्धा नुकतीच एच. ए. स्कूल पिंपरी येथे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे व उपायुक्त पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शाळेच्या उपमुख्याध्यापिका सुजाता कोरके, आशा माने तसेच क्रीडाधिकारी रंगराव कारंडे यांनी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे प्रास्ताविक क्रीडा...

पाकिस्तान झिंदाबाद पोस्ट प्रकरण: बंगालमधील तरुण मुंबईत अटकेत, गावात तणावाचे वातावरण

0

मुंबई :- पश्चिम बंगालमधील पुर्व बर्धमान जिल्ह्यातील डानिहाट गावचा रहिवासी शरीफ शेख याला मुंबई पोलिसांनी 'पाकिस्तान झिंदाबाद' अशी फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी अटक केली आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानची बाजू घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ही घटना समोर येताच गावात संतप्त वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांना तातडीने हस्तक्षेप करावा लागला. अटक करण्यात आलेला व्यक्ती कोण आहे?शेख हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा असून,...

महाराष्ट्राचा औद्योगिक विकास आणि सांस्कृतिक जपणूक – विधिमंडळातील महत्त्वाचे क्षण उजळले!

0

मुंबई – महाराष्ट्राने जागतिकीकरणाचा स्वीकार करत मोठ्या औद्योगिक विकासाची दिशा आखली आहे. परंतु, या विकासाच्या प्रवासात राज्याची समृद्ध संस्कृती आणि परंपरा अबाधित ठेवण्यावरही भर देण्यात येत आहे. विधिमंडळात आणि त्याबाहेरही महाराष्ट्राच्या संपन्न वारशाचा गौरव साजरा होत असल्याचे काही महत्त्वाचे क्षण नुकतेच पाहायला मिळाले. औद्योगिक धोरणांची नव्याने मांडणी – महाराष्ट्र जागतिक पटलावर झळकतोय! महाराष्ट्र सरकारने जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवीन औद्योगिक धोरणे...

पुण्यात भटक्या मांजरांच्या संख्येवर नियंत्रणासाठी महापालिकेची १ कोटींची खर्ची; एका मांजरीच्या नसबंदीवर ₹१९०० खर्च.

0

पुणे महानगरपालिकेने भटक्या मांजरांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी २०२२ पासून मांजरांची नसबंदी व लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेसाठी महापालिकेने मागील तीन वर्षांत तब्बल ९९ लाख ६६ हजार ५०० रुपये खर्च केले आहेत. एका मांजरीच्या नसबंदी प्रक्रियेसाठी ₹१९०० खर्च केला जातो. महानगरपालिकेच्या युनिव्हर्सल अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून ही मोहीम राबविली जाते. भटक्या मांजरांना पकडून नसबंदी केल्यानंतर त्यांना लसीकरण केले...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी संवाद; नेतृत्व आणि राष्ट्रनिर्मितीवर प्रेरणादायी मार्गदर्शन

0

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि संवाद हा अविस्मरणीय अनुभव ठरला. या भेटीदरम्यान नेतृत्वगुण, धोरणात्मक निर्णयप्रक्रिया आणि राष्ट्रनिर्मितीतील तरुणांच्या भूमिकेवर सखोल चर्चा झाली. त्यांच्या विचारांची स्पष्टता, दूरदृष्टी आणि प्रेरणादायी शब्दांनी उपस्थितांना नवचैतन्य दिले. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमागील दृष्टीकोन...

Copyright ©