महाराष्ट्र
कासारसाई धरणात पोहण्याचा मोह ठरला जीवघेणा; १९ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू
कुजगाव | मावळ तालुका: पावसाळ्याच्या सुट्टीमध्ये पर्यटनासाठी धरण परिसरात फिरायला गेलेल्या पाच तरुणांपैकी एका १९ वर्षीय युवकाचा पोहण्यासाठी उतरल्यावर धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. २० जुलै) घडली. मृत युवकाचा मृतदेह सोमवारी (दि. २१) दुपारी शोधमोहीमीनंतर बाहेर काढण्यात आला. कुजगाव हद्दीत असलेल्या कासारसाई धरण परिसरात पाच मित्र फिरण्यासाठी गेले होते. या वेळी, थोडी मजा करावी या उद्देशाने एक...
“जोडी तुटायची नाही, साथ सुटायची नाही!” – देवेंद्र फडणवीस व अजित दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व, संयम, आणि विकासदृष्टी या सर्वांचा संगम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन बड्या नेत्यांचा आज वाढदिवस! राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेक मान्यवरांकडून, कार्यकर्त्यांकडून आणि जनतेकडून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत. "जोडी तुटायची नाही, साथ सुटायची नाही" या शब्दांत त्यांच्या सुसंवाद, सहकार्य आणि विकासाच्या धोरणांतील एकरूपतेचं वर्णन अनेकांनी केलं आहे. दोघांनीही एकमेकांवरचा विश्वास,...
उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांचा राजीनामा; महाराष्ट्रातील मोठ्या नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
नवी दिल्ली : देशाचे उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी रात्री उशिरा अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी प्रकृती ठीक नसल्याचे कारण पुढे करत आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. रात्री साधारणतः १० वाजता त्यांनी आपला राजीनामा सादर केला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यावर स्वाक्षरी करणार की नाही, याची अधिकृत घोषणा काही तासांत होण्याची शक्यता...
पुण्यात मोठी कारवाई; १६ बांग्लादेशी घुसखोरांना मायदेशी पाठविण्यात पुणे पोलिसांना यश
पुणे शहरात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १६ जणांना त्यांच्या मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये १५ महिला आणि १ पुरुषाचा समावेश असून, ही कारवाई मंगळवारी (दि. २२ जुलै) पार पडली. या कारवाईसाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखा, गुन्हे शाखेच्या दोन पथकांसह पाच परिमंडळातील तपास पथकांनी समन्वयाने कार्यवाही केली. बुधवारी...
मानवतेचा आदर्श ठरलेली जान्हवी! मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹2.50 लाखांची देणगी
मुंबई : सामाजिक भान आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी याचे उत्तम उदाहरण ठरवत जान्हवी सुधाकर यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी ₹2.50 लाखांचा धनादेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. मुंबईत आयोजित छोटेखानी समारंभात ही देणगी प्रदान करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जान्हवी यांचे मन:पूर्वक आभार मानत त्यांच्या या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. "संकटकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधी गरजूंना दिलासा देतो. अशा...
वसईत लिफ्टमध्ये अडकले भाजप आमदार प्रवीण दरेकर; 20 मिनिटांनी सुखरूप सुटका!
वसई | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार प्रवीण दरेकर हे एका खासगी कार्यक्रमासाठी वसईत आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर खाली उतरताना त्यांना मोठा धक्का बसला, कारण ते जात असलेली लिफ्ट अचानक बंद पडली. ही घटना पाहता क्षणभर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सुमारे २० मिनिटे लिफ्टमध्ये अडकून पडलेल्या आमदार दरेकरांची अखेर सुरक्षारक्षक, बिल्डिंग कर्मचारी आणि स्थानिकांच्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली. ही घटना...
मुंबई विमानतळावर थरार! पावसामुळे रनवेवरून घसरले एअर इंडिया विमान; इंजिनाला मोठे नुकसान, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
मुंबई - कोचीहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडिया विमानाला आज सकाळी धावपट्टीवर उतरताना मोठा अपघात टळला. मुसळधार पावसामुळे रनवे ओला झाल्याने विमान घसरले आणि एका बाजूने थेट गवताळ भागात घुसले. यामुळे विमानाच्या उजव्या इंजिनाचे नॅसेल (बाह्य कवच) तुटले, तसेच रनवेवरील साईनबोर्ड आणि लाईटही तुटले. सुदैवाने, विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. दृश्यंनी उलगडली थरारक क्षणांची कहाणी विमानाच्या मागच्या भागाला गवत चिकटलेले...
शिरूरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांवर हल्ला: तीन जणांनी बस डेपोमध्ये चालकाशी आणि कंडक्टरशी केली अमानुष मारहाण!
शिरूर (पुणे) – एसटी महामंडळाच्या बसचालक आणि कंडक्टरवर लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शिरूर एसटी बस डेपोमध्ये घडली असून, या प्रकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना पुणे ते माजलगाव बससेवेतील असून, प्रवाशांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान थेट हिंसक मारहाणीमध्ये झाले. मिळालेल्या माहितीनुसार, एक...
आळंदीत वाद्यांचा गजर, रांगोळीच्या पायघड्या; माउलींच्या पालखीचे स्वगृही आगमन सोहळा भव्यदिव्य पद्धतीने संपन्न
पंढरपूरातील आषाढी वारीचे यशस्वी समारोपानंतर संत श्री ज्ञानेश्वर माउलींची पालखी आळंदीत पुन्हा एकदा वाद्यवृंदाच्या गजरात आणि भक्तांच्या जल्लोषात स्वगृही परतली. आळंदी नगरीने फुलांच्या उधळणीत आणि रांगोळीच्या पायघड्यांनी पालखीचे जंगी स्वागत केले. शेकडो वारकरी टाळ-मृदुंगाच्या निनादात ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या गजरात सहभागी झाले होते. पालखीच्या मार्गावर भक्तांनी घरासमोर रांगोळ्या रेखाटल्या होत्या तर काही ठिकाणी फुलांची आरास सजवण्यात आली होती. वातावरण भक्तिमय...
‘सावधान रहा, सुरक्षित रहा’ हेच नवे ब्रीदवाक्य – गोपनीय माहिती शेअर न करता स्वतःचा बचाव करा; महिलांसाठी विशेष हेल्पलाईन उपलब्ध
पिंपरी-चिंचवड | सोशल मीडिया हे आजच्या घडीला संवादाचं महत्त्वाचं माध्यम ठरलं असलं, तरी याच माध्यमातून फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग व सावध राहण्याची गरज आहे. सोशल मीडियावर गुप्त माहिती शेअर न करता, योग्य प्रायव्हसी सेटिंग्ज ठेवून, अनोळखी व्यक्तींच्या रिक्वेस्ट टाळून स्वतःचा बचाव करता येतो. मोबाईल क्रमांक, आधार-पॅन कार्ड फोटो, घराचा पत्ता यांसारखी माहिती सार्वजनिक करणे धोकादायक ठरू...




