महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 127

पुणे व महाबलेश्वरमध्ये जोरदार पाऊस; मोसमाची सततची दखल! पुणे-दोन दिवसांत १२३ मिमी, महाबळेश्वर १६० मिमी – वाढती धोक्यांची खबर!

0

पुणे | विशेष प्रतिनिधी :- महाराष्ट्रात दक्षिण-पश्चिम मोसमाने जोर धरला असून, २४ तासांत पुणे जिल्ह्यात साशंक पाऊस नोंदला गेला ज्यामुळे राज्यानंतर पुढे होणाऱ्या बर्‍याच ठिकाणांवर लोकजीवन प्रभावित झाले आहे लोनावळा: २४ तासांत १२३ मिमी; गिरीवण: ८४ मिमी; भोर: ८० मिमी; पुणे शहरात एनडीए: ४६.५ मिमी, शिवाजीनगर: ३०.५ मिमी, चिंचवड: २८ मिमी; तम्हिणी घाट‌: २२० मिमी, भीरा: १५३ मिमी, शिरगाव: १८० मिमी   महाबळेश्वर – पावसाने घेतला वेग साताऱ्याच्या प्रसिद्ध हिल स्टेशनला २४ तासांत १६० मिमी पाऊस; आसपासच्या खंडाल-कोकणात मात्र २००–२५० मिमी पावसाची नोंद .   IMD–चं गंभीर इशारे: ऑरेंज...

पवना धरणातून विसर्गात मोठी वाढ; नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

0

पिंपरी-चिंचवड : पवना धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या साठ्यात मोठी वाढ झाली असून, धरण प्रशासनाने आज (दि. ६ जुलै) सकाळी ८ वाजल्यापासून पवना नदीपात्रात ८०० क्युसेक्सने विसर्ग सुरू केला आहे. यामुळे नदीकाठच्या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. धरण पूरनियंत्रण कक्षाच्या सूचनेनुसार, सध्याचा पाणीसाठा ७४.६४% इतका भरलेला आहे. पाणलोट क्षेत्रात अद्यापही पावसाची स्थिती...

पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ लागू; २२ जानेवारी २०२६ पर्यंत जमावबंदी आदेश जारी

0

पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७ (१) व (३) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून संपूर्ण पुणे ग्रामीण जिल्ह्यात २२ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे. या आदेशानुसार, जिल्ह्यात कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगणे, दगड, शस्त्रे, अस्खे सोडावयाची अस्त्रे...

पुण्यात मुसळधार पावसाचा कहर! रस्ते जलमय, वाहतूक ठप्प, नागरिक त्रस्त…

0

पुणे – गुरुवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे पुणे शहरात अनेक भाग जलमय झाले असून, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे, तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. भारत हवामान विभागानुसार, १९ जून रोजी सकाळी १२ ते संध्याकाळी...

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसच्या वतीने अभिवादन! पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न

0

पुणे, ३० जानेवारी २०२५ – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७७ व्या पुण्यतिथीनिमित्त पुणे शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सत्य, अहिंसा आणि लोकशाही मूल्यांचे पालन करत भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मा.आ. मोहनदादा जोशी यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना...

पुण्यातील बाणेरमध्ये स्पावर पुणे पोलिसांचा छापा; तीन महिलांची सुटका, व्यवस्थापक अटकेत, वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश!.

0

पुणे, ५ डिसेंबर २०२४ – पुणे शहर गुन्हे शाखेने ३ डिसेंबर रोजी बाणेर येथील एका स्पावर छापा टाकून वेश्याव्यवसाय चालवल्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली असून व्यवस्थापकासह एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही धडक कारवाई बाणेर रोडवरील बापूसाहेब मुरकुटे पाटील कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या ‘मून थाई स्पा’ या केंद्रावर करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकाराची...

जम्मू कश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातील पाकिस्तानी नागरिकांच्या सामानाची बांधाबांध, पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली माहिती

0

जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी कडक पावले उचलली आहेत. या हल्ल्यात 26 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यात राज्यातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. या घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देऊन अटारी-वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १ मे २०२५ पर्यंत हा बॉर्डर बंद राहील. पुण्यातील पाकिस्तानी नागरिकांची माहिती पुण्याच्या जिल्हाधिकारी जितेंद्र...

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या दुसऱ्या चाचणीलाही यश

0

पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. दररोज हिंजवडी आयटी पार्कमध्ये नोकरीसाठी जाणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हा मेट्रो प्रकल्प अत्यंत महत्वाचा मानला जातो. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) उभारलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाची दुसरी चाचणी 27 ऑगस्ट रोजी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. या चाचणीत माण डेपो ते बालेवाडी स्टेडियम (स्टेशन क्र. 10) पर्यंत मेट्रो...

“प्रत्येकाला आपल्या मातृभाषेविषयी आपुलकी असते… महाराष्ट्रात मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे” – अजित दादांचा ठाम निर्धार

0

मुंबई – “मराठी ही महाराष्ट्राच्या मातीची ओळख आहे. इथे राहणाऱ्यांनी मराठी भाषा बोलणं केवळ गरजेचं नाही, तर ही आपली जबाबदारी आहे,” असे ठाम उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना काढले. त्यांच्या या विधानामुळे मराठी भाषेच्या महत्त्वावर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे. अजित दादा पुढे म्हणाले, “प्रत्येकालाच आपल्या मातृभाषेविषयी प्रेम, अभिमान आणि आत्मीयता असली पाहिजे. आपण ज्या भूमीत राहतो,...

मतदान केंद्रांवर थेट पाहणी; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा सुरक्षा व्यवस्थेवर कटाक्ष

0

पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शहरात कडक सुरक्षा व्यवस्था राबविण्यात येत असून, मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार सो. यांनी स्वतः विविध मतदान केंद्रांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मतदान प्रक्रिया सुरळीत, शांततामय आणि निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. पाहणीदरम्यान श्री. अमितेश कुमार यांनी बंदोबस्तावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी...

Copyright ©