सॉफ्टवेअर इंजिनिअर सुनेचा अमानुष प्रकार! गाझियाबादमध्ये सासूला फरफटत नेऊन भिंतीवर आदळलं
८ जुलै २०२५ : गाझियाबाद शहरातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने सगळ्यांना हादरवून सोडलं आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या एका सुनबाईंनी आपल्या सासूवर अमानुष अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित सुनेने सासूला फरफटत नेऊन तिला मारहाण केली आणि नंतर भिंतीवर जोरात फेकल्याचा आरोप आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. वृद्ध सासूची अमानुष मारहाण करून...
मुंबईत भीषण ‘हिट अॅन्ड रन’ अपघात! बँद्रा सी लिंकजवळ ३८ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू; ट्रक चालक अटकेत
मुंबई :- मुंबईत पुन्हा एकदा निष्पाप पादचाऱ्याचा जीव रस्त्यावर गेला. बँद्रा-वर्ली सी लिंक टोल प्लाझाजवळील रस्त्यावर ३८ वर्षीय तुनतुन शहा या पादचाऱ्याला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली, ज्यामुळे जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला होता, मात्र पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी ओळखला बँद्रा पोलिसांनी सांगितले की, अपघातानंतर घटनास्थळी आढळलेला मोबाईल...
आर्थिक क्षेत्रातील ‘हक्क न सांगितलेल्या मालमत्ता निपटारा’ मोहीम नागरिकांसाठी उपयुक्त -जिल्हाधिकारी सौरभ कटियार
आर्थिक क्षेत्रातील 'हक्क न सांगितलेल्या मालमत्ता निपटारा' मोहीम केवळ वित्तीय क्षेत्रासाठीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही अत्यंत उपयुक्त आहे. नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी येथे केले. वित्तीय सेवा विभाग, अर्थ मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या सल्ल्यानुसार राज्यस्तरीय बँकर्स समिती (एसएलबीसी) महाराष्ट्र व जिल्हा अग्रणी बँकेतर्फे राज्यात "हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा" या उपक्रमांतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई उपनगरमधील या शिबिराचा शुभारंभ...
सिद्धिविनायक मंदिरात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नारळ, फुलं, मिठाई यांच्यावर बंदी; भाविकांनी सहकार्याची केली विनंती
मुंबई | प्रतिनिधी – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभरात धार्मिक स्थळांना संभाव्य धोका असल्याचा गुप्तचर अहवाल प्राप्त झाल्यानंतर, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षा कारणास्तव मंदिरात नारळ, फुले, हार, प्रसाद (मिठाई) व इतर अर्पणांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी रविवार, ११ मे २०२५ पासून लागू करण्यात आली आहे. डुरवा आणि जाईची फुले...
उद्योगमंत्री उदय सामंत रुग्णालयात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, प्रकृतीत सुधारणा
मुंबई | महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. गेल्या आठवड्यात नागपूर येथे पार पडलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उदय सामंत यांनी सक्रिय सहभाग घेतला...
मुंबईत उन्हाचा कडाका वाढतोय; हवेच्या गुणवत्तेत घसरण, नागरिकांनी घ्यावी काळजी
मुंबई : मुंबईतील वातावरणात लक्षणीय बदल दिसून येत असून शहरात उन्हाचा कडाका वाढत चालला आहे. तापमानातील चढ-उतारामुळे थंड हवामानाचा प्रभाव कमी होत असून उष्णतेचा प्रभाव वाढत असल्याचे जाणवत आहे. तापमानात वाढ; उन्हाचा प्रभाव जाणवणार भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, ११ मार्च रोजी मुंबईत आकाश स्वच्छ राहील, मात्र दुपारनंतर उष्णतेचा प्रभाव जाणवेल. शहरात साधारणपणे ५ किमी/तास वेगाने सौम्य वारे वाहणार असून आर्द्रतेचे...
“नवी मुंबईतील उरण भागातून बेपत्ता २२ वर्षीय युवती यशश्री शिंदे मृतावस्थेत आढळली; प्रेम प्रकरणात हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय”
महाराष्ट्र: दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली यशश्री शिंदे हिचे मृत शरीर उद्यान पनवेल महामार्गावर आढळले. तिच्या शरीरावर अनेक कटाच्या खुणा आढळल्या आहेत, ज्यामुळे पोलिसांना तिच्या हत्या झाल्याचा संशय आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यशश्री दोन दिवसांपासून बेपत्ता होती, आणि तिच्या कुटुंबाने तिच्या बेपत्ततेची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली होती. नवी मुंबई: नवी मुंबईतील उरण भागातून...
‘संविधान हत्या दिवस’ निमित्ताने लोकशाही रक्षकांचा सन्मान; मा. राज्यपाल व मा. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न
मुंबई: 'संविधान हत्या दिवस' या विशेष दिवसानिमित्त मा. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनजी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एका भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आणीबाणीच्या काळात (१९७५-७७) लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या लोकशाही सेनानींचा गौरव करण्यात आला. लोकशाहीसाठी झुंजणाऱ्यांना मानाचा मुजरा कार्यक्रमात राज्यभरातून आलेल्या शेकडो लोकशाही सेनानींना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या सेनानींनी आणीबाणीच्या...
मुंबईत मुसळधार पावसाने थैमान; १२ तासांत १०० मिमी पावसाची नोंद, दुर्घटनांमध्ये १ जण ठार, ४ जखमी
मुंबई | १७ जून २०२५ :- मुंबईत सोमवारी मान्सूनने जोरदार पुनरागमन केलं असून, दिवसभरात शहरातील विविध भागांमध्ये जवळपास १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. या अवकाळी संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि भिंती कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या. यामध्ये एक मजूर ठार, तर चार जण जखमी झाले आहेत. १२ तासांत १०० मिमी पाऊस; मुंबई जलमय भारतीय हवामान खात्याच्या (IMD) मते, कोलाबा आणि सांताक्रूझ...
एअर इंडिया विमान अपघातानंतर कडक पावले; पुणे-दिल्लीसह ९ फ्लाईट्स रद्द, बर्ड-हिटमुळे एक विमान थांबवले
मुंबई/दिल्ली – एअर इंडिया कंपनीने मोठा निर्णय घेत सुरक्षिततेच्या दृष्टीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा एकूण ९ फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. यामध्ये पुणे-दिल्ली दरम्यानची AI2470 फ्लाईट पक्षी धडकेनंतर ग्राउंड करण्यात आली आहे. तसेच, अहमदाबाद-लंडन AI171 विमान अपघातानंतर कंपनीकडून Boeing 787 Dreamliner विमाने तपासणीसाठी थांबवण्यात येत आहेत. AI2470: पक्षी धडकेनंतर तपासणीसाठी थांबवले विमान दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या AI2470 फ्लाईटला पक्षी धडकला. पुण्यात सुरक्षित लँडिंग...












