Breaking News
रात्रीच्या घरफोड्यांना आळा! गुन्हे शाखा युनिट-4 ची धडाकेबाज कारवाई — बब्लू चौगुले पकडला; ₹2.67 लाखांचे सोन्याचे दागिने आणि स्प्लेंडर जप्त
पुण्यातील रात्रीच्या घरफोड्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा, युनिट-४ ने एक महत्वपूर्ण कारवाई करत घरफोडी करणारा कुख्यात आरोपी बब्लू चौगुले याला पकडण्यात मोठे यश मिळवले आहे. या आरोपीकडून ₹2,67,200 किमतीचे सोन्याचे दागिने आणि एक काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे चंदननगर परिसरातील अनेक अनसॉल्व्ह घरफोडी प्रकरणांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुप्त बातमीमुळे पोलिसांची धडधडीत तयारी युनिट-४...
वाडिया कॉलेजजवळ पोस्टर प्रकरणानंतर MNVS आणि ABVP मध्ये तणाव; पोलिसात प्रकरण नोंद
पुणे – सोमवारी, पुण्यातील संगमवाडी परिसरातील Nowrosjee Wadia College जवळ पोस्टर लागल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (MNVS) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्यात तणाव निर्माण झाला. पोस्टरवर MNVS, राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI) आणि आंबेडकरी विद्यार्थी संघटना (ASA) यांच्या बहिष्काराची मागणी होती. घटनेनुसार, MNVS कार्यकर्त्यांनी ABVP कार्यालयावर धडक दिली आणि कार्यालयाचे गेट लॉक केले. MNVS सदस्यांनी आत असलेल्या व्यक्तींना बाहेर...
एक दिवसीय प्रशिक्षणात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना कायदेशीर नियमावली व ईव्हीएम यंत्राचे प्रात्यक्षिक
पिंपरी, दि. २६ डिसेंबर २०२५ : लोकशाही प्रक्रियेत मतदान हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनावर नागरिकांचा विश्वास अबाधित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी निवडणूक काळात केवळ मतदानाच्या दिवशी पुरते आपले कार्य मर्यादित नसून, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर दक्ष राहणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणात सर्व शंकांचे निरसन करून, आत्मविश्वासाने निवडणूक कामकाज पार पाडा, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त...
पुण्यात हृदयद्रावक घटना : १३ वर्षीय रोहन बॉंबेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; वन विभागाची व्यापक शोधमोहीम सुरु
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळखेड (आंबेवाडी) गावात रविवारी दुपारी घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलगा रोहन विलास बॉंबे (वय १३ वर्षे) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी साधारण ३.४५ वाजता ही घटना घडली असून, या घटनेने परिसरात भीतीचं आणि शोकाचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रोहन हा शेताच्या परिसरात खेळत असताना झुडपातून अचानक बिबट्याने झडप घालून त्याच्यावर हल्ला केला. जवळच्या...
सांगलीचा प्रणव देशाच्या पातळीवर झळकला! ‘परीक्षा पे चर्चा 2026’ साठी महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थ्याची निवड
सांगली : सांगलीच्या मातीने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली असून महाराष्ट्राच्या लेकराने थेट देशाच्या पातळीवर झेंडा रोवला आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित ‘परीक्षा पे चर्चा 2026’ या उपक्रमासाठी देशभरातून तब्बल 4.5 कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या प्रचंड स्पर्धेतून केवळ 36 विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थी म्हणून सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील...
मुख्यमंत्रिपदावर अनिश्चिततेचे सावट कायम! दिल्ली बैठकीत सकारात्मक चर्चा, अंतिम निर्णय मुंबईत होणार
महाराष्ट्रात ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या महायुतीतील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीला अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही. दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री महायुतीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र, या दोन तासांच्या चर्चेत अंतिम निर्णय झालेला नाही. पुढील बैठक मुंबईत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील सकारात्मक चर्चा: महायुतीचे प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार...
“प्रत्येकाला आपल्या मातृभाषेविषयी आपुलकी असते… महाराष्ट्रात मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे” – अजित दादांचा ठाम निर्धार
मुंबई – “मराठी ही महाराष्ट्राच्या मातीची ओळख आहे. इथे राहणाऱ्यांनी मराठी भाषा बोलणं केवळ गरजेचं नाही, तर ही आपली जबाबदारी आहे,” असे ठाम उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना काढले. त्यांच्या या विधानामुळे मराठी भाषेच्या महत्त्वावर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे. अजित दादा पुढे म्हणाले, “प्रत्येकालाच आपल्या मातृभाषेविषयी प्रेम, अभिमान आणि आत्मीयता असली पाहिजे. आपण ज्या भूमीत राहतो,...
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन
पिंपरी, दि. १२ मार्च २०२५ – महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या सामाजिक, औद्योगिक आणि शैक्षणिक विकासाचे शिल्पकार होते, स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी सहकार, औद्योगिकरण, कृषी विकास आणि शिक्षण क्षेत्रात महत्वपुर्ण योगदान देऊन विकासाची पायाभरणी केली. त्यांच्या व्यापक विचारांचा वारसा चालवत महाराष्ट्र विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार...
वैष्णवी आत्महत्या प्रकरणात खळबळजनक वकिलांचा युक्तिवाद; रोहिणी खडसे यांची संतप्त प्रतिक्रिया – “त्या वकिलाला कानाखाली मारणाऱ्याचा मी सत्कार करीन!”
प्रतिनिधी | मुंबई | हगवणे प्रकरणात मृत वैष्णवी हिच्या चारित्र्यावरच संशय घेणारा आणि आरोपीची बाजू सावरणारा युक्तिवाद काल न्यायालयात करण्यात आला. या युक्तिवादामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून, महिला नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोर्टात आरोपी पक्षाच्या वकिलांकडून अजब तर्क वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येप्रकरणात आरोपी असलेल्या तिच्या पतीसह कुटुंबियांच्या बाजूने बोलताना वकिलांनी चक्क मृत वैष्णवीच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत "नवऱ्याने...
वाहतूक सुरक्षिततेचा संदेश देणारी शिस्तबद्ध मिरवणूक; नायगाव पोलीस परेड मैदानावर अंतिम परेड स्पर्धा उत्साहात
मुंबई — रस्ते सुरक्षा महिना उपक्रमांतर्गत आज नायगाव पोलीस परेड मैदानावर अंतिम परेड स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला @cpmumbaipolice हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, देशप्रेम आणि रस्ते सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली. ग्रेटर मुंबईतील विविध भागांतील एकूण २९ शाळांचे मार्चिंग बँड व परेड पथक या स्पर्धेत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी तालबद्ध...









