Breaking News
पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षाला ₹494 कोटी बँक फसवणूक प्रकरणी अटक; ईडीची मोठी कारवाई.
पुणे: शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील ₹494 कोटींच्या कथित फसवणूक प्रकरणात पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मंगलदास बांदल यांना मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली. ईडीने बांदल यांच्या ठिकाणी छापेमारी करून ₹25 लाख रोख रक्कम जप्त केली आणि ₹50 लाखांच्या मुदतठेवी गोठवल्या आहेत. ईडीने ही तपासणी 2020 साली पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या प्रथम माहिती अहवालाच्या (एफआयआर) आधारे सुरू केली होती....
“महाराष्ट्राला ‘बंगाल’ होऊ देणार नाही; घुसखोरी रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन”
मुंबई : महाराष्ट्रात वाढत्या घुसखोरीच्या घटनांवरून राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तीव्र भाषेत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “महाराष्ट्राला दुसरे बंगाल बनू देणार नाही. घुसखोरी रोखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे.” लोढा म्हणाले की गेल्या काही महिन्यांत पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांनी राज्यातील विविध भागांतून बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना पकडले आहे. हे घुसखोर...
“पुरस्कार मिळो वा न मिळो, कला उत्सवातील प्रत्येक विद्यार्थी आज विजेता आहे” – राष्ट्रीय कला उत्सव २०२५ च्या समारोपात संजय कुमार यांचे प्रेरणादायी प्रतिपादन
पुणे | दि. २4 — राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कलेचे महत्त्व ठळकपणे अधोरेखित करण्यात आले असून, त्याच धोरणाला अनुसरून आयोजित करण्यात आलेला ‘राष्ट्रीय कला उत्सव २०२५’ प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि प्रेरणा देणारा ठरला आहे, असे प्रतिपादन भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी केले. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे पार पडलेल्या समारोप...
पुणे पोलिसांची ‘एनकाउंटर स्पेशल’ धोरण पुन्हा अंमलात – १९ व्या एनकाउंटरने पुन्हा खळबळ!
पुणे | प्रतिनिधी विशेष :- पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गुन्हेगारी टोळ्यांना वचक बसावा यासाठी पुणे पोलिसांनी १९८३ पासून आतापर्यंत तब्बल १९ पोलिस एनकाउंटर केले आहेत. संघटित गुन्हेगारीविरोधातील ही धोरणात्मक कारवाई पुणे मेट्रोपॉलिटन क्षेत्रातील सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे. २०२५ : 'टिपू पठाण टोळी'चा शाहरुख ऊर्फ अट्टी रहिम शेखचा एनकाउंटर गेल्या रविवारी (१६ जून २०२५) सोलापूरमध्ये झालेल्या शाहरुख ऊर्फ अट्टी रहिम...
न्यायालयातील वकिलांच्या युक्तीवादावर चित्रा वाघ यांचा संतापाचा स्फोट! | वैष्णवी हगवणे प्रकरण तापलं | आरोपींना फाशीची मागणी जोरात
पुणे: वैष्णवी हगवणे हत्या प्रकरण पुन्हा एकदा चांगलंच गाजू लागलं आहे. या प्रकरणातील आरोपींच्या बाजूने न्यायालयात मांडण्यात आलेल्या अजब वकिली युक्तीवादामुळे वातावरण पुन्हा पेटलं आहे. या युक्तीवादावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या रोखठोक शैलीत संताप व्यक्त केला आहे. चित्रा वाघ यांनी थेट ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं आहे की, “पोरीला हालहाल करून मारून टाकलंत… अजून मन नाही भरलं...
पिंपरी-चिंचवडकरांसाठी मोठी बातमी! जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत आमदार महेश लांडगे यांची सकारात्मक बैठक
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची आमदार महेश लांडगे यांनी भेट घेऊन पाणी पुरवठा आणि नवीन जलस्रोत निर्मितीवर सखोल चर्चा केली. या चर्चेदरम्यान, शहराच्या भविष्यातील पाणी गरजा लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. पिंपरी-चिंचवडसाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षित करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्य सरकारला पाठवलेल्या...
पुण्याजवळ देशातील पहिलं ‘ADAS टेस्ट सिटी’ उद्घाटित; भारतीय वाहन सुरक्षा क्षेत्राला मोठी गती
पुणे – भारताच्या वाहन सुरक्षा क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला आहे. देशातील पहिलं स्वतंत्र ‘Advanced Driver Assistance Systems (ADAS) टेस्ट सिटी’ पुण्याजवळील तळेगाव-ताके येथे अधिकृतरीत्या उद्घाटित करण्यात आलं. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) यांच्या पुढाकाराने उभारलेलं हे अत्याधुनिक केंद्र ३ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत औपचारिकरीत्या जाहीर करण्यात आलं. ही टेस्ट सिटी तब्बल २० एकरांवर पसरलेली असून, भारतीय...
पुणे मेट्रोच्या वनाज-रामवाडी मार्गाची पूर्ण कार्यक्षमता; येरवडा स्टेशनचे उद्घाटन आज.
पुणे: पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी मार्गावरील येरवडा मेट्रो स्टेशनचे व्यावसायिक संचालन बुधवारी सुरू होत आहे. या स्टेशनची वास्तू ऐतिहासिक दांडी मार्चने प्रेरित असून, ती भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण अध्यायाचे प्रतीक आहे. हे स्टेशन केवळ एक महत्त्वपूर्ण परिवहन दुवा म्हणून काम करणार नाही, तर आपल्या समृद्ध वारशाची आठवण करून देईल. आता वनाज ते रामवाडी मार्ग पूर्णपणे कार्यान्वित होणार असून,...
पश्चिम बंगालमध्ये हिंदूंच्या हक्कांसाठी एकच बुलंद आवाज — भारतीय जनता पक्षाचा निर्धार
हिंदूंच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरलेला एकमेव पक्ष म्हणजे भाजप; तुष्टीकरणाविरोधात ठाम भूमिका घेत आंदोलन उभारण्याचा इशारा पश्चिम बंगालमध्ये वाढत्या धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात भारतीय जनता पक्ष (भाजप)ने आपली भूमिका अधिक ठामपणे मांडली आहे. "हिंदूंना आवाज देणारा, त्यांच्यासाठी लढणारा आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाचा विरोध करणारा एकमेव पक्ष म्हणजे भाजप आहे," असे विधान करत भाजपने पुन्हा एकदा आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेला अधोरेखित...
दहावी-बारावी परीक्षेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय – कॉपी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी!
महाराष्ट्रातील दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये सामूहिक कॉपी करणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाईचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यभरातील परीक्षा केंद्रांमध्ये कडक सुरक्षा आणि नियम लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांचे महत्वपूर्ण निर्णय: ✅ कॉपी करणाऱ्या परीक्षा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द!✅ कॉपीस मदत करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना त्वरित बडतर्फ करण्याचे आदेश!✅ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम...










