“पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार” – पुणे पुस्तक महोत्सवाला जागतिक स्वरूप देण्याचा निर्धार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
पुणे : पुणे पुस्तक महोत्सवाला मिळणारा वाढता आणि अभूतपूर्व प्रतिसाद पाहता पुणे शहराला ‘पुस्तकांची जागतिक राजधानी’ बनवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, पुढील वर्षी हा महोत्सव ‘जागतिक पुस्तक महोत्सव’ म्हणून आयोजित करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. नॅशनल बुक ट्रस्टच्यावतीने फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी...
बिना सिम के बंद हो जाएंगे WhatsApp, Telegram समेत अनेक मेसेजिंग अॅप्स — केंद्र सरकारचा नवीन “SIM-बाइंडिंग” नियम लागू; जाणून घ्या काय बदलणार आहेत*
भारत सरकारने 30 नोव्हेंबर 2025 रोजी जारी केलेल्या नवीन निर्देशांनुसार, आता व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, Signal, Snapchat, ShareChat, JioChat आणि इतर मेसेजिंग अॅप्ससाठी “SIM-बाइंडिंग” अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमानुसार, आता एखाद्या मोबाइलवर ते अॅप्स चालवण्यासाठी त्या फोनमध्ये कार्यशील आणि नोंदणीकृत सिम कार्ड असणे आवश्यक आहे. जर सिम नसेल, बदलले असेल किंवा काढले गेले असेल, तर अँप आपोआप बंद होईल. नवीन कायदे...
भाजपा शहर निवडणुकीची कमान आता आमदार अमित गोरखे यांच्या हाती..!
पिंपरी चिंचवड जिल्हा निवडणूक संचालन समितीच्या संयोजक पदी आमदार अमित गोरखे तर सहसंयोजक म्हणून मोरेश्वर शेडगे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्शभूमीवर निवडणूक कालखंडात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबविणे तसेच उमेदवारांच्या मुलाखती त्यासाठी उमेदवार चयन करणे व निवडणूक प्रचार यंत्रणा कार्यान्वित करणे यासाठी जिल्हा निवडणूक संचालन समितीची भूमिका अत्यंत महत्वाची असते. राजकीय व संघटनात्मक दृष्ट्या अशा...
प्रभाग २५ (क) मधून राधिका कुलकर्णी मैदानात; घड्याळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जोरदार प्रचार
पिंपरी-चिंचवड :- आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (क) – सर्वसाधारण ओपन महिला वॉर्ड मधून राधिका उल्हास कुलकर्णी या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. विकास, पारदर्शकता आणि जनहिताच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेणाऱ्या राधिका कुलकर्णी यांनी मतदारांशी थेट संवाद साधत परिवर्तनासाठी संधी देण्याचे आवाहन केले आहे. प्रचारासाठी सादर करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये घड्याळ...
ज्ञानोबा-तुकाराम जयघोषात दुमदुमला टाळगाव-चिखली परिसर महापालिकेच्या शाळेत रंगला भक्ती, एकात्मता आणि परंपरेचा अद्भुत संगम
पिंपरी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५० वी) जयंती वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळेत भक्तिमय वातावरणात भव्य पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने टाळगाव-चिखली परिसरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळा व महाविद्यालय परिसरातून ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत टाळ-मृदुंगाच्या गजरासह टाळ-चिपळ्यांचा नाद आणि विद्यार्थ्यांच्या अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. ‘ज्ञानोबा माऊली’ आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत सहभाग घेतला होता. महिला बचत गटांच्या सदस्यांनी, स्थानिक समाजसेवकांनी, वारकरी बांधवांनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली. वारकरी परंपरेतील पालखी सोहळा जसा श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे, तसाच तो एकात्मता आणि सामाजिक बंध दृढ करणारा सोहळा ठरला. पालखी सोहळ्याचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, समाज विकास विभाग उपायुक्त ममता शिंदे, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण कुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपिठाचे संचालक ह. भ. प. राजू महाराज ढोरे ,डॉ. स्वाती मुळे आणि शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यांच्या नियोजनामुळे आणि समन्वयामुळे संपूर्ण मिरवणूक सोहळा शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.
निवडणूक आचारसंहिता लागू; शहरात महापालिकेची धडक कारवाई, ४,८१९ अनधिकृत राजकीय फ्लेक्स हटवले
पिंपरी-चिंचवड | राज्य निवडणूक आयोगाकडून १५ डिसेंबर २०२५ रोजी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरभरात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली असून, १६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत तब्बल ४,८१९ अनधिकृत व नियमबाह्य राजकीय फ्लेक्स, बॅनर्स आणि जाहिरात साहित्य हटवण्यात आले आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह व...
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या तयारीला वेग! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
नाशिक | १३ नोव्हेंबर २०२५ | दु. २.२० वा. :- आगामी ‘सिंहस्थ कुंभमेळा २०२७’ निमित्त नाशिक शहर आणि परिसरात होणाऱ्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याचा भव्य कार्यक्रम आज पार पडला. या ऐतिहासिक क्षणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादाजी भुसे, मंत्री ॲड. माणिकराव...
भारतीय संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला उतुंग भरारी घेण्याचा अधिकार – ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे
पिंपरी – भारतीय संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला उतुंग भरारी घेण्याचा अधिकार प्राप्त झाला असून भारतीय संविधान म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करणारा मानवमुक्तीचा जाहिरनामा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे यांनी केले. भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित पिंपरी येथील प्रबोधनात्मक कार्यक्रमात ‘भारतीय संविधान -मानवमुक्तीचा जाहिरनामा’ या विषयावर व्याख्यान देताना जोंधळे बोलत होते. या कार्यक्रमास राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य अॅड. गोरक्ष लोखंडे, महापालिका ...
विचारांशी तडजोड नाही! अनेक पक्षांच्या ऑफर धुडकावून प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; टिळक भवनमध्ये भव्य सत्कार सोहळा
पुणे | प्रतिनिधी — पुण्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन येथे हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशांत जगताप यांच्यासोबत पुण्यातील...
जाणीव, प्रशिक्षण आणि संशोधन – समृद्ध लोकशाहीचे त्रिसूत्र : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नागपूर : लोकशाही अधिक बळकट आणि समृद्ध करण्यासाठी जाणीव, प्रशिक्षण आणि संशोधन या तीन घटकांचा समन्वय आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या माध्यमातून राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना विधिमंडळातील प्रशिक्षण मिळते, त्यामुळे कायदे कसे बनतात, संसदीय प्रक्रिया कशा प्रकारे चालतात याचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त होते. अशा उपक्रमांमुळे लोकशाही अधिक समृद्ध...






