राजकीय

Home राजकीय Page 6

नगरसदस्य, नगरसदस्या यांच्या तक्रारींचा प्राधान्याने निपटारा करून जबाबदारीने काम करा; नागरिकांकडून कडून आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यावरही कार्यवाही करा – महापौर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना….

0

पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांनी समन्वयाने काम करणे अत्यावश्यक आहे. शहर स्वच्छ, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख ठेवण्यासाठी प्लास्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी, कचरा टाकल्या जाणाऱ्या ठिकाणांचे सुशोभीकरण, अतिक्रमणांवर कारवाई करताना फेरीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्था तसेच पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसह आवश्यक पायाभूत कामे वेळेत पूर्ण करणे यावर विशेष भर देणे आवश्यक आहे. याशिवाय, नागरिक व नगरसदस्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा विहीत वेळेत निपटारा करून प्रशासनाने...

वॉर्ड क्र. २०१ मध्ये शिवसेनेचा प्रचार शिगेला; रेखा मयुर कांबळे यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

0

आज वॉर्ड क्र. २०१ मधील शिवसेना उमेदवार रेखा मयुर कांबळे यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आणि मा. आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमामुळे संपूर्ण वॉर्डात राजकीय वातावरण तापले असून शिवसैनिकांमध्ये नवे चैतन्य संचारले आहे. उद्घाटनप्रसंगी परिसरातील शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी...

‘करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया!’ – आदित्य ठाकरे यांचे मुंबईकरांना सादरीकरण; “मुंबई अदानीस्तान होऊ देऊ नका” असा थेट इशारा

0

मुंबई | मुंबई महानगरपालिकेत तब्बल २५ वर्षे सत्ताधारी राहून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मुंबईकरांना अभिमान वाटेल अशी भरीव आणि दूरदृष्टीपूर्ण विकासकामे केली असल्याचे ठामपणे मांडत ‘करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया!’ या संकल्पनेअंतर्गत भव्य सादरीकरण आज वरळी येथील एन.एस.सी.आय. डोम येथे पार पडले. हे सादरीकरण युवासेनाप्रमुख आणि शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी सादर केले. या कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या...

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासात पारदर्शकतेची मागणी – लॉटरी प्रक्रिया ठरलेल्या क्रमानेच व्हावी, रहिवाशांचा ठाम आग्रह

0

मुंबई: वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या लॉटरी प्रक्रियेबाबत चाळीतील रहिवाशांनी ठाम भूमिका घेतली असून, ही प्रक्रिया चाळींच्या ठरलेल्या आणि अधिकृत क्रमानेच पार पडावी, अशी जोरदार मागणी ते सातत्याने करत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही संदिग्धता राहू नये, तसेच पूर्ण नियमितता आणि पारदर्शकता राखली जावी, हीच रहिवाशांची प्रमुख मागणी आहे. बी डीडी चाळ पुनर्विकास हा मुंबईतील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी...

लोकशाहीच्या मंदिराचे पिकनिक स्पॉटमध्ये रूपांतर करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध’ – पिंपरी-चिंचवड भाजप आक्रमक…

0

संसदेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आणि इतर खासदारांनी संसदेच्या 'मकर प्रवेशद्वारा'चा वापर 'पिकनिक स्पॉट'प्रमाणे केल्याचा गंभीर आरोप करत आज पिंपरी- चिंचवड भाजपच्या वतीने आक्रमक निदर्शने करण्यात आली. शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. नेमका वाद काय? दिल्लीत सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान...

महिला विश्वचषक उपांत्य सामना: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया — अंतिम फेरीचं तिकीट कोणाच्या नशिबात

0

नवी मुंबई : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना आज (गुरुवार, दि. ३०) नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन दिग्गज संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना दुपारी ३:०० वाजता सुरू होणार असून नाणेफेक दुपारी २:३० वाजता पार पडेल. क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना म्हणजे ‘मिनी फायनल’च आहे. भारतीय महिला संघाला या सामन्यात आपला सर्वोत्तम खेळ करावा...

“गुगल मॅपवर BEST बस मार्गाची माहिती आता तुमच्या बोटांच्या टप्प्यात!” – मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते नव्या युगाची सुरुवात

0

मुंबई | मंत्रालय :- मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि सुविधाजनक अशी योजना आज प्रत्यक्षात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘गुगल मॅपवर बस मार्ग माहिती प्रणाली’चे भव्य उद्‍घाटन मंत्रालयात पार पडले. यामुळे आता BEST बसेसच्या मार्गांची, थांब्यांची आणि वेळापत्रकाची माहिती नागरिकांना थेट गुगल मॅपवर सहज मिळणार आहे. स्मार्ट सिटी आणि डिजिटलीकरणाकडे एक ठोस पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुंबईसारख्या महानगरात नागरिकांचा...

अक्षय कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान केल्यानंतर इंकने चिन्हांकित केलेली बोट दाखवली

0

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार यांनी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबईत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी आपल्या बोटावरील अशुद्ध इंकचे चिन्ह दाखवून मतदान प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित केले. अशुद्ध इंक हे प्रत्येक मतदाराच्या बोटावर लावले जाणारे चिन्ह असून, ते मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे आहे. मतदान प्रक्रियेबद्दल जनजागृती: मतदानानंतर अक्षय कुमार यांनी सोशल मीडियावर एक फोटो...

रहस्यमय मृत्यूचे गूढ उलगडले – भिंतीवरचा अर्धवट पासवर्ड ठरला धागा

0

मुंबई : गोरेगाव ओबेरॉय स्क्वेअर कॉम्प्लेक्समध्ये 14 ऑगस्ट रोजी घडलेल्या 17 वर्षीय प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीच्या मृत्यूने संपूर्ण शहर हादरले होते. 23व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केले जात होते. मात्र, पोलिसांच्या तपासानंतर या मृत्यूचे गूढ उलगडले असून, हा प्रकार आत्महत्या नसून दुर्दैवी अपघात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही तरुणी अकरावीमध्ये शिक्षण घेत होती आणि पुढील उच्च शिक्षणासाठी...

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत सुमारे दोन कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त

0

पुणे : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली "सण महाराष्ट्राचा-संकल्प अन्न सुरक्षिततेचा" या अभियानाअंतर्गत सार्वजनिक आरोग्य व जनहित लक्षात घेता विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेत १ कोटी ९७ लाख ९३ हजार ४२ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत ३५३ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून १९६ आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली...

Copyright ©