ईरानचा इजरायलवर जोरदार हल्ला! गृह मंत्रालयाच्या इमारतीवर क्षेपणास्त्रांनी थेट निशाणा; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला
मध्यपूर्वेतील तणाव अधिकच चिघळला आहे. आज सकाळी ईरानने इजरायलच्या गृह मंत्रालयाच्या मुख्य इमारतीवर थेट क्षेपणास्त्र हल्ला करून ती इमारत उध्वस्त केली, अशी माहिती आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिली आहे. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ईरानचा निर्णायक आणि प्रतिशोधात्मक हल्ला 🔹 ईरानकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे इजरायलमध्ये खळबळ उडाली आहे.🔹 "ईरान ही काही खेताची मूळी...
यशाचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर अथक परिश्रम करा-प्रा.नितीन बानुगडे – “आयआयबी” तर्फे आयोजित मार्गदर्शन मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
यशाचे रहस्य म्हणजे मागे हटणे नाही आणि अथक परिश्रम करणे आणि जर तुम्ही त्याचे पालन केले तर डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानिक बनण्याचा तुमचा दृढनिश्चय सार्थकी लागेल. “तुम्ही कोण आहात, यापेक्षा कोण होणार आहात, याचा विचार करा. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि चांगले मार्गदर्शन घेण्यावर भर द्या. जितके जास्त कष्ट घ्याल, तितकेच मोठे यश मिळते. कुठलेही काम लहान, अवघड नसते. मनातून...
८ महिन्यांत ६१ हजारांहून अधिक नागरिकांना उच्च रक्तदाब, तर ३९ हजारांना डायबिटीसचा धक्का!
पुणे: वेगवान जीवनशैली, वाढता ताण आणि अनियमित आहारामुळे पुणेकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या ८ महिन्यांत तब्बल ६१,७३२ नागरिकांना उच्च रक्तदाब असल्याचे निदान झाले आहे. त्याच कालावधीत ३९,९७० नागरिकांना मधुमेह असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे आकडे शहरातील जीवनशैली किती धोकादायक पातळीवर पोहोचली आहे, याचे गंभीर चित्र समोर आणतात. शहरातील ७,२२,३२७ नागरिकांची तपासणी...
जगदाळे यांचे पार्थिव आज पहाटे पुण्यातील कर्वेनगर येथे दाखल
पुणे :- ज्या सहलीसाठी उत्साहाने तयारी केली, ज्याचं स्वप्न अनेक वर्षांनी प्रत्यक्षात उतरवले… तीच सहल त्यांच्या कुटुंबासाठी आजीवन दु:ख घेऊन आली. पुण्यातील कोंढवा-सासवड रोडवरील फर्साण व्यावसायिक कौस्तुभ गणबोटे आणि त्यांचे जिवलग मित्र, इंटेरियर डिझायनर संतोष जगदाळे यांचा काश्मीरमधील पहलगामजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी (२२ एप्रिल) बायसरण, पहलगाम येथील या भीषण हल्ल्यात किमान २६ पर्यटकांचा बळी गेला, ज्यात...
विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन- राज्यपाल आचार्य देवव्रत
पुणे : विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन असून नैसर्गिक व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर येथून ऑनलाइन पद्धतीने वितरण झाले. या कार्यक्रमास कृषी महाविद्यालय पुणे येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे...
मुंबईसाठी २०२६-२७ चे रेडी रेकनर दर ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक – आमदार व खासदारांचा सहभाग
मुंबई: मुंबई शहरासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता बाजार मूल्यांकन दर अर्थात रेडी रेकनर रेट निश्चित करण्याच्या प्रक्रियेसाठी एक महत्त्वपूर्ण बैठक दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, ओल्ड कस्टम हाऊस येथे पार पडली. या बैठकीसाठी मुंबईतील सर्व आमदार व खासदारांना आमंत्रित करण्यात आले होते. रेडी रेकनर दर हे मालमत्तेच्या खरेदी-विक्रीसाठी मार्गदर्शक ठरतात. घर, दुकान, कार्यालय, भूखंड...
चार वर्षांनंतर बीएमसीला लोकनियुक्त सत्ता; रितू तावडे यांच्याकडे महापालिकेची धुरा, भाजप सर्वात मोठा पक्ष
मुंबई : तब्बल चार वर्षे प्रशासकांच्या नियंत्रणाखाली असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) अखेर लोकनियुक्त सत्तेची पुनर्स्थापना झाली असून भाजपच्या रितू तावडे यांनी महापालिकेच्या कारभाराची धुरा स्वीकारली आहे. 2022 पासून निवडून आलेले सभागृह अस्तित्वात नसल्याने प्रशासकीय पातळीवरच कामकाज सुरू होते. आता जानेवारी 15, 2026 रोजी झालेल्या निवडणुकांनंतर मुंबईकरांना पुन्हा लोकप्रतिनिधी मिळाले आहेत. महापालिकेतील मागील नगरसेवकांचा कार्यकाळ मार्च 2022 मध्ये संपला होता. त्यानंतर...
‘वर्षा’ निवासस्थानी शिवजन्मोत्सव विशेषांकाचे प्रकाशन; शिवकालीन वैभवाचा जागतिक गौरव
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुंबई येथील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ‘पुण्यनगरी’ लातूर आवृत्तीच्या ‘शिवजन्मोत्सव’ विशेषांकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न झाले. मा. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या कार्यक्रमामुळे वातावरण शिवमय झाले होते. यावर्षीचा विशेषांक शिवकालीन पराक्रम आणि दुर्गवैभवावर आधारित असून, बारा ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या इतिहासाचा सखोल आढावा यात मांडण्यात आला...
“भगिनी स्व. ऋतुजा राजगे यांना न्याय मिळालाच पाहिजे”; धर्मांतरासाठी दिलेल्या छळामुळे सात महिन्यांच्या गर्भवतीचा आत्महत्या करून अंत
सांगली | संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या गर्भवती स्व. ऋतुजा सुकुमार राजगे आत्महत्या प्रकरणावर आता सामाजिक आणि राजकीय पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भोसरीचे आमदार महेश लांडगे दादा यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दांत म्हटलं की, "भगिनी ऋतुजाला धर्मांतरासाठी छळलं गेलं, हा केवळ कौटुंबिक मुद्दा नाही, तर हा आमच्या संस्कृतीवर घाला आहे. या प्रकरणात कठोरात कठोर शिक्षा झालीच...
पुणेकरांनो लक्ष द्या! कासारसाई धरणाचा विसर्ग वाढणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणे | १९ ऑगस्ट २०२५, रात्री ८:३० :- पुणे जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणक्षेत्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर कासारसाई धरण ९९.२९% भरलेले असून, धरण व्यवस्थापनाने पाणीसाठा नियंत्रणासाठी विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या धरणातून १४८० क्युसेक्स पाणी सोडले जात आहे, मात्र आज रात्री १० वाजल्यापासून हा विसर्ग वाढवून १७७६ क्युसेक्स केला जाणार आहे. पाऊस कायम...












