सामाजिक

Home सामाजिक Page 152

पुण्यात मोठी कारवाई; १६ बांग्लादेशी घुसखोरांना मायदेशी पाठविण्यात पुणे पोलिसांना यश

0

पुणे शहरात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १६ जणांना त्यांच्या मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये १५ महिला आणि १ पुरुषाचा समावेश असून, ही कारवाई मंगळवारी (दि. २२ जुलै) पार पडली. या कारवाईसाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखा, गुन्हे शाखेच्या दोन पथकांसह पाच परिमंडळातील तपास पथकांनी समन्वयाने कार्यवाही केली. बुधवारी...

मणिपूर पुन्हा पेटले! ६ जणांचे मृतदेह सापडले, मंत्र्यांच्या घरांवर हल्ले; राज्यात तणाव वाढला.

0

इम्फाळ : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराने उग्र रूप धारण केले आहे. आसाम-मणिपूर सीमेवर अपहरण केलेल्या सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. मृतांमध्ये एका ८ महिन्यांच्या बालकासह महिला आणि अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या घटनेनंतर राज्यात संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले असून मंत्र्यांच्या घरांवरही हल्ले करण्यात आले आहेत. घटनाक्रम: अपहरण झालेल्या व्यक्तींमध्ये मेइती समाजातील सदस्यांचा समावेश होता, ज्यांना आसामच्या जिरीबाम जिल्ह्यातून कूकी...

राज्यातील वीज ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय! घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक वीज दरात ५ वर्षांत २६% कपात; मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली मोठी घोषणा

0

मुंबई | राज्यातील वीज ग्राहकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. महावितरणने सादर केलेल्या वीजदर कपातीच्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (MERC) ने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आगामी पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने वीज दरात तब्बल २६ टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे. पहिल्या वर्षातच ग्राहकांना १०% दर कपात मिळणार आहे. घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक या तिन्ही प्रकारच्या ग्राहकांना या निर्णयाचा थेट...

परिमंडळ ६ कडून मोठी कारवाई; ३ सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार

0

पुणे : Maharashtra Police अंतर्गत Pune City Police च्या परिमंडळ ६ कार्यालयाकडून गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ अन्वये एकूण तीन सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे ग्रामीण जिल्हा हद्दीतून दोन वर्षांच्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ६ डॉ. राजकुमार शिंदे (भा.पो.से.) यांच्या आदेशानुसार ही...

“मद्यविक्री शुल्कात वाढ, VAT आणि दरवर्षी परवाना नूतनीकरणाच्या निर्णयाविरोधात हॉटेल व्यावसायिकांचा संताप; परवाने परत करण्याचा इशारा!”

0

नवी मुंबई हॉटेल मालक संघटना (NMHOA) यांनी राज्य सरकारच्या मद्यविक्री शुल्क वाढ, मूल्यवर्धित कर (VAT) आणि दरवर्षी वाढणाऱ्या परवाना नूतनीकरण शुल्काविरोधात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. संघटनेने एका जाहीर प्रसिद्धीपत्रकाद्वारे सरकारच्या या निर्णयांना अन्यायकारक, एकतर्फी आणि मद्यउद्योगासाठी घातक ठरवले आहे.  १) मद्यविक्री शुल्क वाढ – भार वाढतच आहे! राज्य पातळीवरील विविध प्रकल्पांसाठी निधी उभारण्यासाठी आणि निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सरकारने...

पुण्यातील गोखलेनगरमध्ये गंभीर मारहाण: महिलेला आणि तिच्या कुटुंबाला न्यायाची अपेक्षा

0

पुण्यातील गोखलेनगर येथील ओंबाळे मैदानात  सायंकाळी १०.३० वाजता एक गंभीर घटना घडली. यामध्ये एका ३३ वर्षीय महिलेच्या दिराने आणि त्याच्या साथीदारांनी तिच्या दिरावर गंभीर मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी महिलेनं या घटनेविरोधात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी तिच्या दिराला लाथा बुक्यांनी मारले, ज्यामुळे त्याला गंभीर जखम झाली आहे. तसेच,...

ठाणे-बेलापूर महामार्गावरील भीषण अपघात : बसच्या धडकेत दोन पादचारी ठार, तीन जण जखमी.

0

रबाळे, ३० ऑक्टोबर २०२४ : ठाणे-बेलापूर महामार्गावर रबाळे परिसरात एका खासगी बसने नियंत्रण सुटल्याने दोन पादचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेतील मृत पादचाऱ्यांची ओळख विजयमाला साळोबा सुतार (४०) आणि अनीश देव नारायण चौहान (४०) अशी आहे. या अपघातानंतर बस चालक रबी दीपु देब (२३) याला रबाळे MIDC पोलिसांनी दोषी ठरवत त्याच्यावर गुन्हा दाखल...

लातूरमध्ये खळबळजनक घटना! छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अजितदादा समर्थकांकडून बेदम मारहाण; पत्रकार परिषदेनंतर वाढली तणावाची स्थिती

0

महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. लातूर येथील विश्रामगृहात खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर जे काही घडले, ते अत्यंत धक्कादायक होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे काही पदाधिकारी तेथे आले आणि त्यांनी अलीकडील कृषीमंत्री यांच्या कृतीविषयी तटकरे यांना थेट जाब विचारला. या चर्चेने वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले रोष प्रकट केला. मात्र...

हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प — राज्यात १० कोटी झाडांची लागवड, पर्यावरण संतुलनासाठी व्यापक योजना जाहीर

0

मुंबई | प्रतिनिधी :- राज्याला हरित व समृद्ध बनवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचलत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानासाठी १० कोटी वृक्षलागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट जाहीर करण्यात आलं आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आगामी वर्षीही तितक्याच झाडांची लागवड करण्याचा मानस असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. वृक्षारोपण ही लोकचळवळ होण्यासाठी...

जास्तीत जास्त नागरिकांनी 20 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे प्राधिकरणाचे आवाहन

0

नाशिक : श्रद्धा, पावित्र्य आणि अध्यात्माचा संगम असलेला सिंहस्थ कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणार आहे. यानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणातर्फे बोध चिन्ह स्पर्धेचे (लोगो डिझाईन) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी आता अवघे दहा दिवस राहिले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय...

Copyright ©