0
0
0
0
0

सामाजिक

Home सामाजिक Page 134

महापालिका निवडणुकीपूर्वी पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ‘बचक्या’ टोळीतील कुख्यात सराईत आरोपी जेरबंद

पुणे शहरात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे शहर गुन्हे शाखेकडून जोरदार मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-६ ने दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणारा तसेच जबरी चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला ‘बचक्या’ टोळीतील कुख्यात सराईत आरोपी राजेश उर्फ चौपाट्या बबलू मंगल मंडळ (वय २९) याला अटक करून मोठे यश मिळवले आहे. दिनांक ११ डिसेंबर २०२५...

ठरलं! १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर – ५ फेब्रुवारीला मतदान

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत असतानाच, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, यामुळे ग्रामीण महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार आहे. या घोषणेमुळे गावोगावी प्रचारसभा, बैठका आणि राजकीय हालचालींना वेग येणार आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य...

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची विकासाकडे यशस्वी वाटचाल: आर्थिक विकास, सहकार आणि सामाजिक न्यायात राज्याची आघाडी*

*मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची विकासाकडे यशस्वी वाटचाल: आर्थिक विकास, सहकार आणि सामाजिक न्यायात राज्याची आघाडी* - आमदार अमित गोरखे यांची विधानपरिषदे मध्ये 260 अंतर्गत प्रस्तावावर भाष्य विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांनी सभागृहात बोलताना महायुती सरकारचे आणि मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत राज्याच्या विकासाचा सर्वंकष लेखाजोखा सादर केला. यावेळी सभागृहात बोलताना ते म्हणाले की,  फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने...

“चार दंडके ठोका… नालायक आहे तो!” – डॉ. धनंजय देशपांडे यांचा ‘डिजिटल अरेस्ट’ फ्रॉडवर मार्मिक सल्ला; पोलिस अधिकारीही खळखळून हसले!

सायबर क्राईमसारख्या गंभीर विषयावर देशभरात जनजागृतीची गरज असताना, धुळे शहरात नुकतीच भारतातील पहिली 'सायबर कॉन्क्लेव्ह'- एक राष्ट्रीय परिषद-यशस्वीरीत्या पार पडली. या उपक्रमाचे आयोजन प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ऍड. चैतन्य भंडारी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. सभागृह हाऊसफुल्ल होता, आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमात ऊर्जा आणि उत्सुकता यांचा उत्स्फूर्त संगम पाहायला मिळाला. या कॉन्क्लेव्हमध्ये डॉ. धनंजय देशपांडे (DD) यांचे अनुभव, उपक्रमशील विचार आणि त्यांची...

बीड: सोंडणा गावच्या सरपंचाचा अपघाती मृत्यू; फ्लाय-ॲश माफियाचा संशय?

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात फ्लाय-ॲश वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत सोंडणा गावाचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात शनिवारी रात्री मिरवट फाट्याजवळ घडला. या घटनेमुळे फ्लाय-ॲश वाहतुकीच्या बेकायदेशीर प्रकरणाला पुन्हा उजाळा मिळाला आहे. घटनाक्रम: पोलिसांच्या माहितीनुसार, सरपंच अभिमन्यू क्षीरसागर मोटारसायकलवरून सोंडणा गावाकडे जात असताना फ्लाय-ॲश वाहतूक करणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जबरदस्त...

“आदिवासी सक्षमीकरणासाठी ठोस निर्णयांची बैठक; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात महाअभियानांचा आढावा”

पुणे | दिनांक: २८ जून २०२५ :- पुणे जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान’ आणि ‘प्रधानमंत्री धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत अंमलबजावणीचा सखोल आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी भूषवले. बैठकीत चर्चेचा केंद्रबिंदू – आदिवासी विकासाचा रोडमॅप या बैठकीत शिक्षण,...

गोंदिया जिल्ह्यातील अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

 गोंदिया जिल्ह्यातील सीएमआर तांदूळ जमा करून ठेवल्याप्रकरणी चौकशी करण्यात येईल. तसेच या प्रकरणातील जिल्हा पुरवठा अधिकारी याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. गोंदिया जिल्ह्यातील सीएमआर तांदुळाच्या साठ्याप्रकरणी सदस्य नाना पटोले यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम यांनी माहिती देताना सांगितले की, सन २०२३–२४ या वर्षासाठी आवश्यक...

इंद्रायणी नदीपात्रातील अतिक्रमणावर महापालिकेचा – चिखलीतील २९ अनधिकृत बंगल्यांवर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने कारवाई सुरू

चिखली | १७ मे २०२५ :- पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात इंद्रायणी नदीपात्रात भराव टाकून उभारलेले २९ अनधिकृत बंगले आज पहाटेपासून महापालिकेच्या कारवाईने उद्ध्वस्त होऊ लागले आहेत. सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवाद (NGT) यांच्या स्पष्ट आदेशानंतर अखेर पिंपरी-चिंचवड महापालिकेला कारवाई करावी लागली. पहाटेपासून १० मशीनसह कारवाईला सुरुवात आज (दि. १७) पहाटेपासून महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक १० जेसीबी आणि पोकलनसह या बेकायदेशीर...

वाघोलीत संतापाचा उद्रेक! महापालिका आयुक्तांची गाडी नागरिकांनी केली अडवणूक

पुणे : वाघोली परिसरातील वाढत्या नागरी समस्यांकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष नागरिकांना आता असह्य झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून आज नागरिकांनी संताप व्यक्त करत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या गाडीला अडवून निषेध नोंदवला. वाघोली परिसरात रस्त्यांची दयनीय अवस्था, पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापनाचा अभाव आणि पावसाळ्यात साचणारे पाणी या समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. नागरिकांनी अनेकदा तक्रारी दाखल करूनही काहीच उपाययोजना न...

नाशिक–पुणे उच्चगती रेल प्रकल्प: नाशिकचे खासदार वाजे यांनी थेट मार्ग कायम ठेवण्याची मागणी केली

नाशिक – नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नुकताच केंद्रीय रेल्वा मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आणि नाशिक–पुणे अर्ध-उच्चगती रेल्वे प्रकल्पाच्या नव्या मार्गतोडीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. खासदार वाजे यांनी मागणी केली की, प्रकल्पाची नव्याने घोषित केलेली वळवलेली मार्गतोडी लगेच पुनर्विचारावी आणि नाशिक–पुणे दरम्यान थेट मार्ग कायम ठेवावा, जो सिन्हर–संगमनेर–नरायणगाव–मंचर–चाकण मार्गाने जाणार आहे. दिल्लीतील बैठकीत, खासदार वाजे यांनी लोकांचा भावना...

Copyright ©