सामाजिक

Home सामाजिक Page 69

चीन भारताच्या तीन मोठ्या गरजा पूर्ण करणार – द्विपक्षीय संबंधात नवा अध्याय

भारत आणि चीन या आशियातील दोन महासत्ता देशांमध्ये गेल्या काही काळात तणावपूर्ण परिस्थिती होती. मात्र आता या दोन्ही देशांनी पुन्हा एकदा संबंध सुधारण्यासाठी पावले उचलली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताच्या तीन महत्त्वाच्या गरजा चीन पूर्ण करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या तीन गरजांमध्ये प्रामुख्याने आर्थिक सहकार्य, औद्योगिक गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा विकासाचा समावेश असल्याचे सांगितले जाते. भारताला आगामी काळात ऊर्जा, तंत्रज्ञान...

जळगाव अपघात: पुन्हा हिट अँड रन; भरधाव कारने महिलेसह दुचाकीला उडवले, थरारक अपघात CCTVमध्ये कैद

जळगाव: राज्यातील गुन्हेगारीसह हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. जळगाव तालुक्यातील वावडदे ते जळके रस्त्यावर भरधाव कारने दुचाकीस्वार आणि पायी चालणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा पिंगळे (वय २०), मयंक चौधरी...

संत तुकाराम महाराज पालखीचे पिंपरी-चिंचवडमध्ये स्वागतासाठी महापालिकेची जय्यत तयारी! शहरात धार्मिक वातावरणाची अनुभूती

पिंपरी-चिंचवड, दि. १८ जुलै: आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन घेतल्यानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी परतीच्या प्रवासाला निघाली आहे. शनिवारी, १९ जुलै रोजी पालखी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालखीचे भव्य स्वागत, सुरक्षितता व सेवा-सुविधांची तयारी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केली जात आहे.  पालखीचे स्वागत व नियोजन महात्मा फुले महाविद्यालयाजवळ पिंपरी येथे पालखीचे स्वागत करण्यात येणार आहे....

मेरठमध्ये संतापाचा स्फोट! टोल प्लाझावरील गुंडांनी भारतीय जवानाला मारहाण; संतप्त ग्रामीणांनी प्लाझा फोडला

मेरठ : भूनी टोल प्लाझावर घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. काल टोल प्लाझाच्या कर्मचार्‍यांनी व गुंडांनी एका निष्पाप भारतीय जवानाला अमानुष मारहाण केली. हा जवान नुकताच "ऑपरेशन सिंदूर" पूर्ण करून घरासाठी परतला होता. मात्र, सेवेतून परतलेल्या सैनिकाला अशा प्रकारे मारहाण होणे हा अपमान असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. या घटनेची माहिती समजताच आज शेकडो संतप्त ग्रामीण भूनी टोल प्लाझ्यावर जमा...

“बेरजेचे राजकारण हेच यशवंतराव चव्हाण यांचे खरे नेतृत्व” – मोहन जोशी

पुणे, दि. १२ मार्च २०२५ - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मा. आ. मोहन जोशी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. 'बेरजेचे राजकारण' ही खरी प्रेरणा...

विश्रामबाग पोलिसांची धाडसी कारवाई! दोन पिस्तुल आणि एक काडतूस बाळगणारा तरुण अटकेत

पुणे – शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा धागा मजबूत ठेवण्यासाठी पुणे पोलिस सतत दक्ष आहेत. याच सतर्कतेचे उदाहरण म्हणजे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेली अत्यंत यशस्वी कारवाई. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन गावठी पिस्तुलं आणि एक काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला अटक करत मोठा गुन्हा रोखला आहे. विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार आशिष खरात आणि अनिस शेख यांना गोपनीय बातमी मिळाली की,...

नागपूर हिंसाचार: पोलीस उपायुक्तांवर कुऱ्हाडीचा हल्ला, मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे विचारपूस

नागपूर शहर सोमवारी रात्री भीषण दंगलीच्या विळख्यात सापडले. महाल परिसरात औरंगजेबच्या कबरीच्या वादावरून दोन गटांमध्ये निर्माण झालेल्या तणावाने काही वेळातच उग्र स्वरूप धारण केले. या घटनेत मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. जमावाने पोलिसांवरही थेट हल्ले केले, ज्यामध्ये ४० हून अधिक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. विशेषतः, पोलीस उपायुक्त (DCP) निकेतन कदम यांच्या हातावर जमावाने कुऱ्हाडीने हल्ला केला,...

‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; भारताचा ठाम आणि निर्णायक बदला!

नवी दिल्ली | दिनांक – ७ मे २०२५ पहलगाम हल्ल्याचा सर्जिकल प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने इतिहासात अढळ ठसा उमटवणारी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ या गुप्तनामाअंतर्गत भारताने मध्यरात्री पाकिस्तानातील नऊ प्रमुख दहशतवादी तळांवर एकत्रितपणे २४ हवाई हल्ले करत ही ठिकाणे नष्ट केली. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांच्या अड्ड्यांवर ही कारवाई करण्यात आली. सर्जिकल स्ट्राइकची नवी व्याख्या – ‘ऑपरेशन सिंदूर’ पहलगाम येथे...

हिंगोलीतील हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा पुण्यात थरारक शोध – फरासखाना पोलिसांची तत्पर व यशस्वी कारवाई!

पुणे :- हिंगोली जिल्ह्यातून बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी पुण्यात मिळून आली असून, तीला सुखरूप शोधून तिच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात पुणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. फरासखाना पोलीस स्टेशनच्या पथकाने तत्परता, दक्षता आणि संवेदनशीलतेने ही कामगिरी पार पाडली. दिनांक ८ जुलै २०२५ रोजी, पुणे शहरातील रेड अलर्ट एरियामध्ये पायी गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाला दत्त मंदिराजवळ एक अल्पवयीन मुलगी संशयास्पदरीत्या फिरताना दिसली....

जरीन खान यांच्या प्रार्थना सभेत पडले ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र! तुषार कपूरने दिला तब्येतीबाबतचा महत्त्वाचा अपडेट — “बाबा पूर्णपणे ठणठणीत आहेत!”

मुंबई: बॉलिवूड सिनेइंडस्ट्री सध्या दुःखाच्या सावटाखाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री सुलक्षणा पंडित आणि ज्येष्ठ अभिनेत्री जरीन खान यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली होती. त्याच काळात दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी चिंताजनक बातम्या आणि प्रेम चोप्रा यांना रुग्णालयात दाखल केल्याच्या बातम्यांमुळे चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, जरीन खान यांच्या प्रार्थना सभेत सहभागी होण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचा...

Copyright ©