सामाजिक

Home सामाजिक Page 5

अवैध शस्त्रधारी जेरबंद! पुण्यातील भवानी पेठेतील मोठा गुन्हा उधळला; पोलिसांची यशस्वी कारवाई

0

पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या चमूने एक मोठा गुन्हा टाळण्यात यश मिळवलं आहे. दि. २९ जुलै २०२५ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, भवानी पेठ परिसरात एक युवक विनापरवाना गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ पावले उचलून कारवाई केली आणि आरोपीस अटक केली. सदर युवकाचं नाव जितु रवि मंडलिक (वय २०, रा. काकडे वस्ती,...

प्रियाताई बेर्डे यांना कसबा संस्कार केंद्र, पुणे परिवाराकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा; सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी गौरव

0

पुणे | कसबा पेठ : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री, भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीच्या महाराष्ट्र राज्य प्रमुख आणि समाजहितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या प्रियाताई बेर्डे यांना कसबा संस्कार केंद्र, पुणे परिवाराच्यावतीने वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. केंद्राच्या हितचिंतक सहकारी आणि मार्गदर्शिका असलेल्या प्रियाताईंनी केवळ कलाक्षेत्रातच नव्हे, तर समाजप्रबोधन, महिला सक्षमीकरण आणि संस्कारमूल्ये जपणाऱ्या उपक्रमांमध्येही मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रातर्फे...

प्रामाणिकपणाचा झळाळता दीपस्तंभ! – अनिल सोनवणे यांनी सापडलेली ५० हजारांची सोन्याची अंगठी केली प्रामाणिकपणे सुपूर्त; सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव

0

शिरूर, पुणे | आजच्या भौतिकवादी युगात स्वार्थी वृत्तीने ग्रासलेल्या समाजात, प्रामाणिकतेचा उजळ व अनुकरणीय आदर्श निर्माण करणारी घटना घडली आहे. शिरूर तालुक्यातील बो-हाडे मळा येथील 'हॉटेल वैभव'चे मालक अनिल सोनवणे यांनी सापडलेली ५० हजार रुपयांची सोन्याची अंगठी आणि महत्वाची कागदपत्रे संबंधित व्यक्तीकडे पोलीसांच्या उपस्थितीत सुपूर्त केली. या प्रामाणिकपणाच्या उदाहरणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाकिट सापडल्यापासून सुपूर्त होईपर्यंतची घटना घटना काही दिवसांपूर्वीची. हॉटेल...

वाघोली पोलीस ठाण्याची कठोर कारवाई – सराईत गुन्हेगार टोळीवर तडीपारीची कारवाई!

0

वाघोली, पुणे – वाघोली पोलीस ठाणे आणि पुणे शहर पोलीस दलाने स्थानिक रहिवाशांना त्रास देणाऱ्या, परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि कायद्याची धज्जी उडवणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाई करत त्यांना दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. गुन्हेगारीला थांबवण्यासाठी पोलिसांची धडाकेबाज मोहीम सुरू असून, यामुळे वाघोली परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तडीपार करण्यात आलेले गुन्हेगार – गुन्हेगारीला पूर्णविराम! वाघोली पोलीस ठाण्याच्या...

चहाच्या टपरीवरचा दीपस्तंभ! जामखेडच्या बंडू ढवळे यांची कहाणी ठरतेय कष्ट, जिद्द आणि यशाची प्रेरणादायी शिदोरी

0

जामखेड (अहमदनगर): आयुष्याच्या रणांगणात जिद्द, कष्ट आणि अपार प्रेमाने आपल्या लेकराच्या स्वप्नांना साकार करणारं एक नाव म्हणजे श्री. बंडू ढवळे. काल जामखेड दौऱ्यावर असताना एका साध्या चहाच्या टपरीवर घेतलेला चहा फक्त चविष्ट नव्हता, तर तो आनंदाचा आणि समाधानाचा घोट होता. कारण त्या चहामागची गोष्ट ही मुळातच अशा एका वडिलांची होती, ज्यांनी स्वतःच्या श्रमाने आपल्या मुलाचं आयुष्य उजळवलं. बापाचं स्वप्न, लेकाचं...

सिद्धिविनायक मंदिरात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नारळ, फुलं, मिठाई यांच्यावर बंदी; भाविकांनी सहकार्याची केली विनंती

0

मुंबई | प्रतिनिधी – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभरात धार्मिक स्थळांना संभाव्य धोका असल्याचा गुप्तचर अहवाल प्राप्त झाल्यानंतर, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षा कारणास्तव मंदिरात नारळ, फुले, हार, प्रसाद (मिठाई) व इतर अर्पणांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी रविवार, ११ मे २०२५ पासून लागू करण्यात आली आहे. डुरवा आणि जाईची फुले...

ढगफुटीमुळे दौंड-बारामतीत पूरस्थिती! नीरा डावा कालवा फुटल्याने घरं, रस्ते जलमय; अजित पवार घटनास्थळी हजर

0

पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातले असून दौंड, बारामती, इंदापूर परिसरात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः बारामती आणि दौंडमध्ये रविवारी एकाच दिवसात अर्धा वर्षभराचा पाऊस पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. यात नीरा डावा कालवा फुटल्याने काटेवाडी, कान्हेरी, पिंपळी, भवानीनगर परिसरात पाणी घरात घुसल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. कालवा फुटल्यामुळे अनेक रस्ते, महामार्ग जलमय झाले असून काटेवाडी-भवानीनगर...

“विठ्ठल भेटीसाठी तुकोबारायांची पालखी निघाली पंढरीच्या दिशेने; देहू नगरीतून टाळ मृदंगाच्या निनादात भव्य प्रस्थान सोहळा संपन्न”

0

देहू | पुणे – भक्तीरसात न्हालेली देहूनगरी, टाळ-मृदंगाच्या निनादाने गजरलेली गल्लीबोळं, आणि "ज्ञानोबा-तुकोबा"चा अखंड जयघोष करत लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे साक्षीदार ठरले. जगद्गुरू तुकोबारायांची पालखी आज विठुरायाच्या भेटीसाठी देहूनगरीहून पंढरपूरकडे निघाली. देवेंद्र फडणवीस आणि अण्णा शेलके यांच्या उपस्थितीत, मोठ्या भक्तिभावाने पालखीचे विधीवत पूजन करण्यात आले. या सोहळ्यात वारकऱ्यांसह वरुणराजानेही हजेरी लावली, त्यामुळे वातावरण अधिकच...

“सीआयएसएफमध्ये देशातील पहिले ‘सर्व महिला बटालियन’ स्थापन; १००० हून अधिक महिला जवानांची नियुक्ती”.

0

नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर २०२४ - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) सर्वप्रथम 'सर्व महिला बटालियन' स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. गृहमंत्रालयाने सोमवारी या बटालियनसाठी १०२५ महिला जवानांची भरती करण्यास मान्यता दिली असून, या विशेष महिला बटालियनचे नेतृत्व वरिष्ठ कमांडंट रँक अधिकारी करतील. महिला बटालियनद्वारे देशाच्या सुरक्षेतील योगदानाला नवी ओळख ही महिला बटालियन तयार करण्यामागे गृह मंत्री अमित शाह यांच्या...

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण : तिसऱ्या आरोपीला २ मेपर्यंत पोलिस कोठडी; तपासात नवे धक्कादायक तपशील उघड

0

पुणे : बोपदेव घाट परिसरात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी सामूहिक बलात्कार प्रकरणातील तिसरा आरोपी, बाप्या उर्फ सोमनाथ उर्फ सूरज दशरथ गोसावी (३३, रा. काटेवाडी, बारामती) याला पुणे ग्रामीण पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथून अटक करून पुणे शहर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्यानंतर शनिवारी रात्री कोंढवा पोलिस ठाण्यात त्याला अटक करण्यात आली. तपासासाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी:रविवारी पुण्यातील न्यायालयात आरोपीला हजर करण्यात...

Copyright ©