महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी वानखेडे स्टेडियम सज्ज; शपथविधी २५ नोव्हेंबर रोजी.
महाराष्ट्राच्या विधानसभेत महायुतीचा दणदणीत विजय; शपथविधी सोहळा वानखेडे स्टेडियमवर २५ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप नेतृत्वाखालील महायुतीने (भाजप, शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी) मोठा विजय मिळवला आहे. यानंतर २५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शपथविधी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्रिपदावर अनिश्चितता कायम; महायुतीत नेतृत्वाचा अंतिम निर्णय प्रलंबित महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवून सरकार स्थापनेसाठी सज्जता दाखवली असली, तरी...
मुंबईत नव्या सायबर पोलिस स्टेशनचे उद्घाटन लवकरच; बांद्रा पश्चिमेला अत्याधुनिक सुविधा, मोठ्या सायबर फसवणुकींचा तपास येथेच
मुंबई | २८ मे २०२५ — मुंबईत सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, बांद्रा पश्चिम येथे एक नविन, पूर्णपणे सुसज्ज आणि स्वतंत्र सायबर पोलिस स्टेशन कार्यान्वित होणार आहे. याआधी बंदोबस्तासाठी बांद्रा-कुर्ला संकुलात (BKC) असलेले सायबर पोलिस पथक आता अधिक चांगल्या सुविधांसह नवे ठिकाण मिळवणार आहे. अत्याधुनिक सायबर पोलिस स्टेशन — पश्चिम विभागासाठी विशेष हे पश्चिम विभाग सायबर पोलिस स्टेशन मुंबई पोलिसांच्या सायबर...
कात्रज–कोंढवा रोडवरील बेशिस्त वाहतुकीचा आणखी एक बळी; अपघाताने नागरिकांमध्ये संताप
पुणे | प्रतिनिधी :- कात्रज–कोंढवा रोडवरील बेशिस्त वाहतूक, वेगमर्यादेचे उल्लंघन आणि अपुऱ्या वाहतूक व्यवस्थेमुळे आज पुन्हा एक दुर्दैवी अपघात घडला असून, यात आणखी एका निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर अपघातांची मालिका सुरू असताना, प्रशासन आणि वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता जणू ‘अपघातप्रवण मार्ग’ बनत चालला आहे, अशी तीव्र भावना स्थानिक नागरिक व्यक्त...
महा हॅकेथॉन चॅलेंज १.० स्पर्धेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. ११ : माहिती तंत्रज्ञान विषयक विविध समस्यांवर उपाय सुचविण्यासाठी ‘महा हॅकेथॉन चॅलेंज १.०’ स्पर्धेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे उद्घाटन झाले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या कार्यक्रमात स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्रिमंडळातील अन्य सदस्य गण आदी उपस्थित होते. राज्य शासनाचा माहिती तंत्रज्ञान विभाग आणि केंद्र सरकारच्या...
पुण्यातील बांधकामाचा भरभराटीचा आलेख; झपाट्याने वाढणारी उंच इमारती आणि अमर्याद वाढणाऱ्या प्रकल्पांमुळे शहरासमोर मोठे आव्हान!
महानगराचा झपाट्याने होणारा विस्तार; वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि नागरी सुविधांवरील ताण चिंतेचा विषय पुणे शहर हे देशातील वेगाने वाढणाऱ्या महानगरांपैकी एक असून, गेल्या काही दशकांत त्याचा विकास झपाट्याने झाला आहे. आयटी उद्योग, उत्पादन क्षेत्र आणि वाणिज्य व्यवसाय यामुळे शहराच्या आर्थिक वाढीला मोठा चालना मिळाला आहे. मात्र, या प्रगतीसह बांधकाम क्षेत्रातही अफाट वाढ झाली असून, त्याचा परिणाम नागरी सुविधांवर होताना दिसत...
पुणे विमानतळावर नवीन टर्मिनलमध्ये ‘DigiYatra’ सेवेचा भव्य शुभारंभ!
पुणे विमानतळावरील प्रवाशांसाठी नवीन डिजिटल युगाची सुरुवात होत आहे! अत्याधुनिक सोयींनी युक्त असलेल्या नवीन टर्मिनलवर ‘DigiYatra’ सेवेचा शुभारंभ शनिवार, ८ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार मंत्री मा. श्री. मुरलीधरजी मोहोळ प्रमुख उपस्थित राहणार आहेत. 🔴 पुणे विमानतळाच्या प्रवाशांसाठी मोठी सुविधा! ‘DigiYatra’ सेवा सुरू झाल्याने पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्वरित...
पुण्यात गर्लफ्रेंडच्या रबडीत मिसळली गर्भपाताची गोळी | महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह!
पुणे – सांस्कृतिक शहरात पुन्हा एकदा नात्याच्या विश्वासावर गदा आणणारी धक्कादायक घटना उघडकीस! हिंजवडी परिसरात एका २८ वर्षीय तरुणाने (आदर्श वाल्मिक मेश्राम) आपल्या गर्लफ्रेंडसोबत विवाहाचे आमिष दाखवत दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवले आणि जेव्हा ती गर्भवती झाली, तेव्हा लग्नास नकार देत तिच्या नकळत रबडीत गर्भपाताची गोळी टाकून गर्भपात घडवून आणला. ही घटना केवळ वैयक्तिक फसवणूक नसून, स्त्रीच्या शरीरावर आणि मानसिकतेवर केलेला...
विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पुढचे पाऊल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पावर गौरवोद्गार
मुंबई:- महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प साकार करण्यासाठी सादर झालेला २०२५-२६ चा अर्थसंकल्प हा लोकाभिमुख आणि संतुलित अर्थसंकल्प असून, तो राज्याच्या प्रगतीस नवी दिशा देणारा ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, उद्योग, शेती, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि सामाजिक विकास या पंचसूत्रीवर हा अर्थसंकल्प आधारित असून, हे पाच घटक राज्याच्या समृद्धीला गती देणार आहेत. महाराष्ट्राचा...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा गौरव – भाजपाच्या ‘संविधान गौरव अभियान’मध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे महत्त्वपूर्ण विधान
पुणे: भारताचे संविधान हे जनतेसाठी प्रेरणा आणि संरक्षणाचा स्त्रोत आहे, असे मत केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुण्यात आयोजित 'संविधान गौरव अभियान' सभेत ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव आणि संविधानाचा सन्मान कायम राखण्याचे काम भाजपाने गेल्या दहा वर्षांत केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संविधानाचा सन्मान आणि भाजपाची भूमिका “डॉ. बाबासाहेब...
फरासखाना पोलीस स्टेशनच्या पथकाची सलग चार दिवसांची मेहनत; शेवटी दोन्ही मुली सुखरूप सापडल्या
पुणे : फरासखाना पोलीस स्टेशनच्या दक्ष आणि तात्काळ कारवाईमुळे दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी तब्बल ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून, चार दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मुलींना शोधून काढले. या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुकास्पद ठरली आहे. दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. १९०/२०२५ भारतीय न्याय संहिता...

















